Sunday 31 March 2019

प्रलय-१०

प्रलय-१०

      आज जलधि राज्याची राज्य सभा भरली होती .  महाराज विक्रम , त्यांची काळी भिंत पाडण्याची आज्ञा ,  अंधभक्त ,  या साऱ्यांवर ती आज निर्णय होणार होता .  राज्यसभेत सर्व मंत्रीगण , राज्यातील काही प्रतिष्ठित लोक , महाराज विश्वकर्मा म्हणजे रक्षक राज्याचे प्रधान ,  त्यांची मुलगी अन्वी ,  युवराज देवव्रत असे सर्व जण जमले होते .

     प्रधानजी जलधि राज्यात पोहोचल्यानंतर कळालेल्या गोष्टींमुळे फारच आश्चर्य चकीत झाले .  अंधभक्तांची गोष्ट त्यांना भयकारक वाटली . अंधभक्तांना काळी भिंत अडवू शकत नाही म्हटल्या नंतर त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला . संशोधन शाळेत झालेला किस्सा व त्यामागे असलेला मारूत राजाचा हात ऐकून त्यांना असुरक्षिततेची भावना दाटून आली , जी त्यांनी त्यांच्या संपूर्ण आयुष्यात कधीच अनुभवली नव्हती .

राज्यसभेत महाराज कैरव बोलत होते....
" काल बोलावलेल्या बैठकीत दोन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत ते म्हणजे कसेही करून काळी भिंत पाण्यापासून महाराज विक्रमांना थांबवायचं व दुसरे म्हणजे बाटी जमातीतील लोकांकडून बासरी बनवून ती धून वाजवायची शिकून घ्यायची.........
       दुसऱ्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झालेली आहे पण पहिला निर्णय कसा अमलात आणावा याबाबत मुख्यत्वे ही राजसभा बोलावलेली आहे . जलधि राज्याने वेळोवेळी घेतलेल्या निर्णयामुळे आज जलधिराज्य या समृद्धीच्या स्थितीला पोहोचले आहे . पण आज आपल्याला एक निर्णय घ्यावा लागणार आहे , तो म्हणजे महाराज विक्रमांना काळी भिंत पडण्यापासून थांबवण्याचा........ आत्ताच कळालेल्या बातमीनुसार महाराज विक्रमांनी त्यांची सर्व सैना काळ्या विहिरीपाशी जमा केली असून ते स्वतः त्या ठिकाणी निघालेले आहेत .  त्यामुळे भिंत पाडण्याचा त्यांचा निर्धार पक्का दिसत आहे . जर आपण भिंत पडण्यापासून त्यांना थांबवलं नाही तर अनर्थ होईल .  ज्या काही भिंती बाबतच्या गोष्टी आजपर्यंत आपण ऐकत आलो आहोत त्या खऱ्या असो की खोट्या .  एक गोष्ट मात्र नक्की आहे ती म्हणजे आतापर्यंत इतकी वर्षे कुणाचीही ती भिंत पाडण्याची हिम्मत झाली नाही .  आपले राज महर्षी सोमदत्त यांनीही याबाबत एक विचार करण्यायोग्य  सल्ला दिलेला आहे ,  त्यामुळे कसेही करून आपल्याला महाराज विक्रमांना ती भिंत पडण्यापासून रोखायलाच हवं......
त्यांना थांबवण्यासाठी आपण एकच गोष्ट करू शकतो ती म्हणजे रक्षक राज्य बरोबर युद्ध.......।

महाराज कौरवांच्या या वाक्याबरोबर संपूर्ण राज्यसभेत कुजबुज वाढली . पुन्हा एकदा लोक रक्षक राज्य ताब्यात घेण्याच्या घोषणा देऊ लागले .  त्यानंतर महाराज कैरव काही क्षण थांबले व बोलू लागले......
" मी जलधी राज्याचा अकरावा सम्राट ,  रक्षक राज्याचा राजा विक्रम याच्या विरोधात युद्ध घोषित करत आहे .  आपले युद्ध हे कुणा व्यक्ती , कुठले राज्य व कुणा राज्यातील जनतेच्या विरुद्ध नाही ,  तर त्या लोकांनी घेतलेल्या निर्णयाविरुद्ध आहे . जेवढं शक्य होईल तेवढी प्राणहानी टाळत आपल्याला फक्त आपला हेतू साध्य करायचा आहे  . तो म्हणजे राजा विक्रमाला कसेही करून ती भिंत पाण्यापासून थांबवायचे........

" मी आदेश देतो की आपले सैन्य गोळा करा , जे सैनिक सुट्टीवर आहेत , त्यांना बोलून घ्या . सर्व सैनिकांना गोळा करून आपण ताबडतोब रक्षक राज्यातील काळ्या विहिरीकडे कूच करणार आहोत.....।

महाराजांच्या ह्या गोष्टीनंतर राज्यसभेत एकच गोंधळ उडाला . जो तो महाराजांचा जयजयकार करत होता .
 जलधी राज्याचा जयजयकार करत होता .

सर्वांना शांत करत महाराज बोलले
" आपला हेतू आहे महाराज विक्रमांना ती भिंत पडण्यापासून थांबवायचा ,.त्यासाठी महाराज विक्रमांना त्यांच्या महाराज पदावरून काढून आपल्याला महाराज विश्वकर्माना रक्षक राज्याचे महाराज बनवावे लागेल..।।।
जे आज आपल्यात याठिकाणी उपस्थित आहेत....।

   मग महाराज कैरवांबरोबर , महाराज विश्वकर्मा यांच्या नावाचा जयजयकार सुरु झाला व जयजयकार करत करत राज्यसभा संपली......

   महाराज विक्रम भल्या मोठ्या रथामध्ये काळ्या विहिरीकडे  निघाले होते . त्यांचा हा रथ ओढण्यासाठी अकरा घोडे होते .  तो रथ एखाद्या बंद आलिशान खोली सारखा होता .  त्या खोलीमध्ये महाराज विक्रमांसाठी सर्व प्रकारची व्यवस्था होती .  त्या बंदिस्त चालत्या फिरत्या एका खोलीच्या राज महालातून महाराज विक्रम राजधानी कडून काळ्या विहीरीकडे कुच करत होते .  त्यांच्या बरोबर पाच हजार सैनिकांचा फौजफाटा होता . अडीच हजार सैनिक पुढे अडीच हजार मागे व मध्ये महाराज विक्रमांचा रथ होता .  हे पाच हजार घोडेस्वार सैनिक युद्धात निपून होते .  काळ्या विहिरीपाशी अजून पाच हजाराच्या आसपास सैनिक जमले होते । एकूण मिळून दहा हजाराची सैना काळी भिंत पाडण्यासाठी एकवटली होती . काळी भिंत आता पडणारच होती आणि आपल्या बरोबर अंधारच घेऊन येणार होती..........

   
   महाराज विक्रम सगळा फौजफाटा फाटा घेऊन काळ्या विहिरीकडे गेल्याने , राजमहालावरती फारसे सैनिक नव्हते . जे काही होते त्यांच्यापासून लपून छपून ,  एखाद-दुसरा सैनिक आला तर त्याचा काटा काढून ,  अधिरथ व सरोज या दोघांनी मिळून अद्वैत व त्याच्या साथीदारांना सोडवले . नंतर ते सगळे उत्तरेकडील जंगलाकडे निघाले . त्याच जंगलाकडे ज्या जंगलात महाराणी शकुंतला व महाराज सत्यवर्मा राहत होते , ज्या जंगलात महाराणी शकुंतलेला काही लोकांनी बेशुद्ध करून पळवलं होतं . त्याच जंगलाकडे ज्या जंगलाकडे भिल्लव , सार्थक आणि त्याचे साथीदार निघाले होते.......

         दूर कुठेतरी , कोणत्या तरी राज्यात , एका अंधाऱ्या जागी , अंधाऱ्या खोलीत , अंधारऱ्या सिंहासनावर ती राजा मारुत बसला होता . त्याचं घडणाऱ्या सर्व घडामोडींवर ती लक्ष होतं व कोणत्या चाली चलायच्या याचा तो विचार करत होता. 

Saturday 30 March 2019

प्रलय-०९

प्रलय-०९

         संसाधन राज्ये .  पृथ्वीतलावरती सर्वात मोठ्या प्रमाणात खनिजाचा साठा असलेली ही पाच राज्ये एकमेकाला लागून मोठ्या प्रदेशावर पसरलेली होती .  सुवर्ण नगर हे सोन्यासाठी प्रसिद्ध होत . लोहगड हे राज्य लोह नि त्यासदृश्य धातूंसाठी व रत्न पंचक हे राज्य रत्नासाठी प्रसिद्ध होते .  अग्नी व ज्वाला  ही राज्ये खनिज तेल व कोळशासारख्या पदार्थांसाठी प्रसिद्ध होती..........
      पृथ्वीतलावरील इतर भागातही खनिज संपत्ती विपुल प्रमाणात सापडत होती .  पण ज्या त्या राज्यात सापडणाऱ्या साधनसंपत्तीवर ज्या त्या राज्याचा अधिकार होता .  पण या पाच राज्यातील संपत्तीवरती संपूर्ण पृथ्वीतलाचा अधिकार होता . प्रत्येक राज्याचा हिस्सा ज्या त्या राज्याला पुरवला जाई . प्रत्येक राज्याची त्याठिकाणी भागीदारी होती . प्रत्येक राज्यातील सैनिकांची तुकडी त्या ठिकाणी उपस्थित होती .  प्रत्येक राज्याचा एक प्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित होता . सर्व राज्यांनी मिळून त्या ठिकाणी असलेली मूळ रहिवाशांना ही  संपत्ती खाणायचा  रोजगार दिला होता .  त्याबदल्यात त्यांना अन्न वस्त्र निवारा या  मूलभूत गरजा पुरवल्या जात होत्या .  ज्या त्या स्वतः पुरूवू शकत नव्हते . तेथील मूळ रहिवाशांना मातीतले  लोक असं म्हटलं जाई .

     पण हे सगळं विद्यार्थीदशेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना सांगण्यासाठी होतं . त्या पाच राज्यात मात्र उलटाच कारभार चालत होता .  जोपर्यंत त्या ठिकाणी कोणीही बाहेरचा माणूस गेला नव्हता तोपर्यंत तेथील  जमात सुखाने त्यांचे त्यांचे जीवन जगत होती .  तेथील मूळ रहिवाशांचे जीवन शिकारीवरती असायचं .  त्यांना शेती माहीत नव्हती व ते टोळ्याटोळ्यांनी नेहमी फिरत राहायचे. जेव्हा हे लोक त्या ठिकाणी गेले त्यावेळी त्यांच्या मागासलेपणाचा फायदा घेऊन त्या सर्वांना शस्त्रांच्या जोरावर खान काम करायला भाग पाडलं .  सर्वांना जुलूम जबरदस्ती ने कामाला लावले .  कितीतरी शतके ही गुलामगिरीत चालू होती .  त्याला कोणी विरोध केला नव्हता .  सर्व राज्यांनी   त्याला मूक संमती दिली होती . वेळोवेळी मूळ रहिवासी या साऱ्याला विरोध करत होते . उठाव करत होते पण त्यांचा उठाव यशस्वी झाला नव्हता . या साऱ्यांमध्ये हाल होते तेथील सामान्य जनतेचे . तेथील मूळ रहिवाशांचे म्हणजेच मातीतल्या लोकांचे .  मातीतल्या लोकांची संख्या कमी नव्हती . पण ती मागासलेली असल्यामुळे त्यांच्यावरती या सर्व राज्यांनी मिळून गुलामगिरी लादली होती . त्यांना दररोज खाणीत काम करावे लागे . अकरा वर्षाच्या मुलापासून मरेपर्यंत प्रत्येकाला काम करावे लागे .  ज्याला कोणालाही काम होत नसे त्याला एक तर मरावं लागे किंवा आपण दुसऱ्या कोणत्यातरी कामाच्या लायक आहोत हे दाखवून द्यावं लागे . हे सर्व  चालू असताना सर्व राजे चूप होते . पण अकराव्या महाराज कैरवांनी , म्हणजे  आता राज्य करत असलेल्या कैरव महाराजांनी  , त्यांच्या आयुष्यातील उमेदीची वर्ष या गुलामांना मूलभूत अधिकार मिळावेत यासाठी घालवली होती . आज त्यांच्या कृपेमुळेच मातीतल्या लोकांचे कामाचे तास कमी झाले होते .  वृद्धांना काम करण्याची गरज नव्हती . लहान मुलांना खेळण्याची परवानगी होते .  विश्रांती , अन्न-वस्त्र-निवारा  व इतर बऱ्याच सुविधा त्यांच्यामुळे मिळाल्या होत्या .  मातीतल्या लोकांना त्यांचे सण-उत्सव साजरे करायची परवानगी नव्हती , पण कैरव महाराजांनी त्यांना तीही उपलब्ध करून दिली . इतर राज्यांनी मात्र कैरवांना याबाबतीत वेड्यात काढलं होतं . या सर्वांच्या बदल्यात कैरव महाराज आपल्यातील खनिज संपत्तीचा बराच भाग इतर राज्यांना देत होते . पण तरीही ती गुलामगिरी होती .  कैरवांनी कधीच गुलामगिरीची भलावण केली नाही , पण संपूर्ण जगाच्या विरोधात ते जाऊ शकत नव्हते . त्यामुळे बळजबरीने का असेना त्यांनी या व्यवस्थेला मान्यता दिली होती .

      या पाच राज्यांसाठी सर्व राज्यांनी मिळून पाच राजे नेमले होते .  ते पाच राजे या ठिकाणी राज्य करत होते व ज्याची त्याची खनिज संपत्ती ज्याच्या त्याच्या कडे पोच करत होते. हे पाच राजे  सुरुवातीला निवडले गेले होते पुढे पिढ्यानपिढ्या तीच  पाच राजघराणी चालत आली होती. या पाच राज्यांची राजसत्ता या संसाधन राज्यावरती होती  .  या पाच राजांकडे स्वतःचं असं सैन्य नव्हतं.  इतर सर्व राज्यांच्या सैन्य व इतर पाठबळ या राज्यांना होतं . त्यांना फक्त एकच गोष्ट करायची होती ती म्हणजे गुलामांना वरती नियंत्रण ठेवायचं त्यांच्याकडून खनिज संपत्ती काढून घ्यायची व जिकडेतिकडे पोच करायची  .

       पण संसाधन राज्यात आता मातीतल्या लोकांची सत्ता होती . मातीतल्या लोकांनी  पाच राजांना तुरुंगात टाकले होते  . मातीतल्या लोकांनी आपला राजा पाच राज्यांच्यासाठी निवडला होता . त्या राजाच्या नेतृत्वाखाली सर्व मातीतल्या लोकांनी मिळून उठाव केला .  सर्व सैनिकी तुकड्या , राजे यांना तुरुंगात बंदी बनवून पाच राज्यांचा कारभार त्यांच्या स्वतःच्या हाती घेतला . सर्व जगाला कळावं म्हणून त्या पाच राजांना मदतीसाठी पत्र पाठवण्याची व्यवस्था करून दिली होती . तेच पत्र घेऊन दूत सर्व राज्यांमध्ये गेला होता .

     रक्षक राज्यात आलेला दूत मृत्युमुखी पडला होता महाराज विक्रमांनी सर्वांना आदेश दिला .
" आपल्या राज्यातील सर्व सैन्य गोळा करा जे सैनिक सुट्टीवर ती असतील त्यांनाही बोलून घ्या , सर्व सैन्यांना गोळा करून काळ्या विहिरीपाशी जमा......
जेवढं लवकर शक्य होईल तेवढं लवकर . आता काळी भिंत पाडल्या वाचून पर्याय नाही .  हे सर्व शत्रू व दहशतवादी तिकडुनच येत आहेत .  काळी भिंत पाडून आपण त्यांच्यावर आक्रमण करुन त्यांना जिंकून घेऊ .   नंतर संसाधन राज्यांकडे जाऊन तीही आपल्या ताब्यात घेऊ . सर्व सैनिक गोळा होऊन काळ्या विहिरीपाशी जमा हा आपला युद्ध काळ आहे... साऱ्या जगाला कळले पाहिजे रक्षक राज्याने जेव्हा रक्षण सोडून आक्रमण केलं त्यावेळी संपूर्ण जग त्याच्या पायापाशी झुकलं.......
ज्यांनी ज्यांनी आपला अपमान केला होता त्या साऱ्यांचा प्रतिशोध घेण्याची वेळ आली आहे..... .....

    आणखी बऱ्याच गोष्टींवरती महाराज विक्रमांनी भाषण केलं . या भाषणानंतर मात्र त्यांचा प्रभाव चांगला पडला . सर्व राज्यांमध्ये एक नवा हुरूप साकारला . जो तो लढाईच्या गोष्टी करू लागला , अपमानाचा प्रतिशोध ,  देशद्रोह्यांना शिक्षा , राष्ट्रभक्ती , देशभक्ती या वरती जो तो बोलू लागला.....

        या राष्ट्रवादाच्या उन्मादात सारेजण काळी भिंत व तिची आख्यायिका विसरून गेले . ती पाडल्यानंतर होणाऱ्या परिणामांचा साऱ्यांना विसर पडला .  राष्ट्रभक्तीचा ताप इतका चढला होता की खऱ्या समस्यांचा साऱ्यांना विसर पडला होता   .  काळ्या विहिरीच्या परिसराला सैनिक छावणीचे रूप आलं होतं . पण सगळेच सैनिक त्या ठिकाणी नव्हते  . काहीजणांचं डोकं ठिकाणावर  होतं . ते डोकं ठिकाणावर असलेल्या सैनिकांपैकी अधिरत  होता .

    सरोज जोपर्यंत माघारी परतून आली होती तोपर्यंत बऱ्याच गोष्टी घडून गेल्या होत्या .  तिचा महालाची  अवस्था झाली होती .  जागोजागी झटपटीची चिन्हे दिसत होती .  आधिरथही सुटून गेला होता . तिची एकही मैत्रीण तिला दिसत नव्हते.  तिने काढायचा तो अर्थ काढला .  तिला वाटलं अधिरथ सुटून गेला ,  नंतर सर्व सैनिकांना आणून त्याने तिच्या मैत्रिणींना बंदी बनवून दिले असावे...... ज्या मैत्रिणीसाठी ती भिल्लवाला सोडून आली होती , त्याच मैत्रिणींना बंदी बनवलं तर तिला या ठिकाणी राहून काहीच उपयोग नव्हता ती बाहेर पडायला निघाली . त्याचवेळी मागून आवाज आला...

" तुझ्या मैत्रिणींना तू सोडणार नाहीस का ...? हीच का तुझी मैत्री.....
 तो अधीरताचा आवाज होता . ती लढण्याच्या सावध पवित्र्यात आली....
" तू मैत्रीबद्दल बोलू नको .  भिल्लव तुझा मित्र नव्हता तर काय.....?  त्याच्यावरती तलवार घेऊन धावून आला होतास....
" त्यावेळी माझे डोळे झाकले होते . मला खरच वाटलं होतं तो देशद्रोही आहे , पण आता महाराजांनी जे काही चालवलेलं आहे ,  ते पाहून मला भिल्लवाच म्हणंण योग्य वाटतय ,  त्यासाठीच मला तुझी मदत पाहिजे.....

    सरोज वैतागली ,  चिडुन बोलली , "  एक तर माझ्या मैत्रिणींना तू बंदी बनवलं , आणि वरून माझीच मदत मागतोय तुला लाज कशी वाटत नाही.......

" तुला खरंच वाटतं काय मी निष्पाप मुलींना बंदी बनवून तुरुंगात टाकीन . मी त्यांना व्यवस्थित नगराबाहेर सोडलेलं आहे आणि हे  मी सांगते म्हणून विश्वास ठेवू नको ......

त्याने अजून कोणाला तरी बाहेर बोलावलं .  ती शालीनी होती .  तिने सरोजला सांगितलं कि अधिरतने त्यांच्या सर्व मैत्रिणींना नगराबाहेर व्यवस्थित पोच करून ,  तिची वाट पाहतो येथे थांबला होता........

" माझ्याकडून कसली मदत हवी आहे तुला.....
" आपल्याला काही कैद्यांना सोडवायचा आहे तुरुंगातून ......
" पुन्हा त्या तुरुंगात जाणार नाही मी , मागच्या वेळेस कशीतरी वाचले.....
" तू भिल्लावाला बरोबर गेली होतीस .  मला तो भुयारी रस्ता माहित नाही ,  म्हणून मी तुझी मदत मागत आहे.... आणि तुरुंगात आहे ते माझे खास मित्र आहेत .  अद्वैत आणि त्याचे साथीदार .  त्यांना बऱ्याच गोष्टी माहीत आहेत ज्या भिल्लवाला ही माहित असायला पाहिजेत..... तू त्यांना सोडवायला माझी मदत कर मी तुला  भिल्लवापर्यंत पोहोचायला मदत करीन......
    सरोजला आता नगरात राहण्याचे काही प्रयोजन नव्हते . तिच्या सर्व मैत्रिणी सुखरूप होत्या .  तिला आता भिल्लावा बरोबर जायचे होते . त्यामुळे अधिरताला मदत करायला तयार झाली .  दोघांनी अद्वैत व त्याच्या मित्रांना सोडवायची जबाबदारी घेतली.....

      तो सिंह आणि तो रेडा  दोघेही जागेला स्तब्ध झाले होते .  आकाशातून आलेल्या गरुडाने त्या लहान मुलाला व्यवस्थितपणे खाली ठेवलं होतं , आणि तेव्हाच मागून घोडा येत असल्याचा आवाज आला . त्या घोड्यावर तीच होती जिला त्यांनी माघारी पाठवलं होतं . ती कधी माघारी गेलीच नव्हती ,  त्यांच्यामागून येत होती , इतक्या गुपचूपपणे की त्या दोघांनाही समजले नव्हते .....

    घोड्यावरून उतरला ती म्हणाली
   " म्हणून मी म्हणत होते , मला बरोबर येऊ द्या . माझी गरज आहे तुम्हाला . तुमचा प्रवास सुखाचा झाला असता.....
   आयुष्यमानला तिला पाहून खरंतर आनंद झाला होता .  पण कुठे तरी त्याचा पुरुषी स्वाभिमान दुखावला गेला होता . तो हे सर्व काही करू शकत होता , किंवा नव्हता .  तरीही एका स्त्रीने येऊन त्याला मदत करावी व शब्द सुनाववे हे त्याच्या पुरुषी मनाला न पटणारे होता.....

तो तिच्यावर ती ओरडत म्हणाला

    " तू इथं काय करतेस .....? आम्ही तुला माघारी जायला सांगितलं होतं . तू आमच्या मागे मागे येऊन नकोस . आम्ही आमची काळजी घ्यायला समर्थ आहोत .  तू तुझी शक्ती तुझ्यापाशी ठेव . आम्हाला त्याची गरज नाही . आम्ही वारसदार आहोत आणि आम्ही आमचं कार्य कोणत्याही शक्ती विना करू शकतो......
    तो हे सर्व खूप मोठ्या आवाजात एका दमात बोलून गेला . पण दुसर्‍या क्षणी त्याला वाटलं की हे सर्व ऐकून तिला वाईट वाटेल ,  म्हणून झालेली चूक सावरत काळजीच्या सुरात तिला म्हणाला....
" मला तुझं नाव नाही माहित नाही .  पण जेव्हा पासून मी तुला पाहिले तेव्हा पासून तु मला मोहित करून घेतले आहेस . आतापर्यंत मी कितीतरी रूपवती पाहिल्या पण मी त्यांच्यावर ती कधीच मोहित झालो नाही  .   कधी नव्हे ते माझ्या आयुष्यात एखादिने मला मोहित करावे आणि मी तिला गमावून बसावे हे मला आवडणार नाही .  म्हणून तू घरी जा , जेव्हा मी माघारी परतून येईल व ही सर्व ठीक होईल तेव्हा आपण सुखाने राहू......
" मोहिनी माझं नाव मोहिनी आहे . आणि  मी तुला मोहित केलं नाही , तर तू मला मोहित केला आहे . बाबा बऱ्याच वेळा बऱ्याच गोष्टी बोलत असतात , पण मी सर्व गोष्टी ऐकून कुठेही धावत फिरत  नाही . बाबांनी जेव्हा तुझ्याबद्दल बोललं ,  त्यावेळी मला राहवले नाही म्हणून मी तुझ्या मागे आले . मला वाटलं तुला सांगून कार्यापासून  परावृत्त करावे , मलाही तुला गमवायचं नव्हतं . त्याचासाठीच हा अट्टहास होता . पण तु मला बरोबर येऊ दिलं नाही व माघारी पाठवले . पण मी तुला सोडू शकत नव्हते .  माझं कर्तव्य होतं म्हणून मी तुझ्या मागे मागे येत राहिले......
एवढं बोलल्यानंतर मोहिन्याच्या डोळ्यात अश्रू गोळा झाले . ती  रडू लागली .  आयुष्मानने जवळ जात तिला त्याच्या मिठीत घेतले......
बराच वेळ दोघे एकमेकांच्या मिठीत होते .  एकमेकांना अनुभवत होते .
 " अरे त्या रेड्याला आणि त्या सिंहाला मोकळं करा... किती वेळ झालं ते तिथेच स्तब्ध आहेत....?
 भरत्या म्हणाला .  भरत्याचा आवाज ऐकून मोहिनी आयुष्यमानच्या मिठीतून बाजूला झाली . तिने काही क्षण डोळे झाकून उघडले ,  त्यावेळी तो  सिंह   निघून गेला . रेडा शांत होऊन त्या ठिकाणी उभारला . भरताने जाऊन ते लहान मूल उचलून आणले . तोपर्यंत तो माणूसही शुद्धीवर आला होता.....

Friday 29 March 2019

प्रलय-०८

प्रलय-०८

     रक्षक राज्याची राज्यसभा आज बर्‍याच दिवसांनी भरली होती .  महाराज राजसिंहासनावरती आपल्या हातात सुवर्णपात्र घेऊन मदिरापान करत बसले होते .   प्रधानजींना कारागृहात टाकल्यापासून प्रधान पदाचा भार सेनापतीकडे सोपवण्यात आला होता . सेनापती अंबरीश बोलत होते...
" महाराज आपल्या सैन्याची जी पहिली तुकडी आपण काळ्या भिंतीपलीकडे पाठवली होती त्याबाबत एक बातमी आहे.....
" कोणती बातमी आहे अंबरीश....
    अलीकडे महाराज थोरामोठ्यांचा मान ठेवायचा विसरत होते. ते सर्रास सर्वांना एकेरी नावाने संबोधत होते .  बऱ्याच जणांची फरफट होत होती पण महाराज पुढे कोणी काही बोलत नसे .  जेव्हा सेनापती अंबरीशजींना महाराजांनी  अंबरीश असे संबोधले तेव्हा   त्यांना राग अनावर झाला  , कारण जेव्हा महाराज  जन्मलेही नव्हते तेव्हापासून सेनापती अंबरीश हे रक्षक राज्याच्या सेवेत होते . त्यांना राग येणे सहाजिकच होते, पण महाराजांपुढे त्यांनी नमते घेत . पुढे बोलायला सुरुवात केली....
"  महाराज आपल्या राज्यातील सैन्यातील ती सर्वात  धाडसी , पराक्रमी आणि कधीही न हरवली जाण्यासारखी तुकडी होती.....
" एवढी प्रस्तावना कशाला करताय अंबरीश ...? सरळ सांगा बातमी काय आहे....? उगाच आमच्या वेळेचा अपव्यय करू नका.....
" महाराज भिंतीकडे गेलेल्या आपल्या तुकडीतील फक्त पाच सैनिक शिल्लक आहेत . ते माघारी परतले आहेत .  बाकी सर्वांना शत्रूने मृत्यूच्या दारी पोचवलं आहे....
" कोण आहे हा शत्रू ....? जो आपल्या राज्याबरोबर युद्ध करण्याच्या तयारीत आहे.....
" महाराज आपले सैनिक व त्या तुकडीचा प्रमुख  अभिजीत अद्वैत जे काही सांगत होता त्यावरून हे साधंसुधं नाही . तुम्ही स्वतः ऐका ......
राज्यसभेत एका बाजूला उभा असलेल्या अद्वैतकडे सेनापतीने पाहिले . अभिजीत अद्वैत पुढे येऊन बोलू लागला....
" महाराज आम्ही काळ्या भिंतीपासून अर्ध्या कोसावर ते असू . दिवसभराच्या प्रवासानंतर सैनिक दमले होते .  आम्ही त्या ठिकाणी मुक्काम करायचं ठरवलं . सर्वांनी आपापले घोडे बांधून दिले व शेकोटी पेटवून त्या ठिकाणी बसले .  मी माझ्या काही मित्रांबरोबर फेरफटका मारण्यासाठी गेलो होतो . जेव्हा परत आलो तेव्हा मी जे दृश्य पाहिले ते फारच भयानक होतं..... महाराज आपले सर्व सैनिक त्या ठिकाणी मृत्युमुखी पडले होते  .  शेकोटीभोवती पंधरा माणसे बसली होती .  ती माणसे विचित्र आवाजात काहीतरी ओरडत होती व  आपल्या सैनिकांचे मांस खात होती.....।
      हे ऐकल्यानंतर महाराज विक्रम मूर्खासारखे मोठमोठ्याने हसत सुटले . त्यांच्या हसण्याच्या आवाजाने संपुर्ण  राज्यसभा भरून गेली .  बऱ्याच वेळ हसल्यानंतर त्यांनी अद्वैत व त्याचा साथीदार मित्रांना पकडून तुरुंगात टाकण्याचा आदेश दिला....
    त्यावेळी सेनापती म्हणाले " महाराज अद्वैत हा विश्वासू तुकडी प्रमुख आहे . त्याला तुरुंगात टाकण्याचे कारण मला समजले नाही.....?
" अंबरीश एवढी साधी गोष्ट कळत नाही का....?  अद्वैत व त्याचे साथीदार मित्र जेव्हा बाहेर गेले तेव्हा हल्ला झाला , याचा अर्थ काय होतो....? याचा अर्थ एकच होतो अंबरिष . तो म्हणजे अद्वैत व त्याचे मित्र हे शत्रूला मिळाले आहेत . त्यांनी शत्रूला त्यांचा ठावठिकाणा दिला व वेळही दिली .  जेव्हा सैनिक बेसावध होते तेव्हा त्यांनी शत्रूला आपल्या सैन्यावर आक्रमण करू दिले . व स्वतः जाऊन लपून बसले . नंतर ही बनावट कथा आपल्याला सांगत आहेत.....
" महाराज मी बनावट कथा का सांगेन ....? मी माझ्यासाठी साथीदार सैनिकांचा ,   मित्रांचा असा सौदा करू शकत नाही . ते माझ्या तुकडीतील सैनिक नव्हते ते माझे बंधू होते .  त्यांच्या जीवाशी खेळ मी कधीच करणार नाही....
    अद्वैतला तुरुंगात जातोय ,  याचं दुःख वाटत नव्हतं .  पण जो गुन्हा त्याने केला नव्हता , जो गुन्हा त्याच्या ध्यानीमनी नव्हता  , त्या गुन्ह्याचे पातक त्याच्या माथी लावले जात होते .  तो रडवेला झाला होता . त्याच्या डोळ्यातून अश्रू येत होते .  ज्या राज्याच्या प्रति तो इतका विश्वासू व प्रामाणिक राहिला त्याच राजाने त्याच्या माथी देशद्रोहाचे इतके मोठे पातक लावावे हे त्याला सहन झाले नाही.......
" महाराज असे करू नका असे केले तर आपल्या सैन्याचे मनोबल खच्ची होईल.........."सेनापती शेवटची विनवणी करत म्हणाले
     इतर मंत्र्यांनी सेनापतीच्या बोलण्याला दुजोरा दिला तेव्हा महाराज ओरडून म्हणाले
" मी या राज्याचा राजा आहे आणि मी आदेश दिला आहे या सैनिकांना आताच्या आता तुरुंगात टाका अन्यथा त्यांच्याबरोबर तुम्हालाही तुरुंगात जावे लागेल.......
सर्व गप्प झाले अद्वैत व त्याच्या साथीदारांना पकडून तुरुंगात नेण्यात आले.....
" अंबरीश अजून काही आहे का ....? आम्हाला आमच्या कक्षात जायची घाई आहे......
" महाराज विश्वकर्मा तुरुंगातून निसटला आहे......
     या वाक्यावर ती महाराज विश्व महाराज विक्रम एकदम शांत झाले . त्यांचा चेहरा क्रोधाने पूर्ण भरून गेला .  डोळे इतके मोठे झाले होते की ती बाहेर पडतील की काय असे वाटत होते .  त्यांनी त्यांच्या हातातील सुवर्णपात्र अंबरीश यांच्यावर फेकून मारले.....
" तुम्ही सेनापती आहात आणि प्रधानजीही.... काय करत आहात तुम्ही .....? आपल्या सैन्याची एक तुकडी होत्याची नव्हती झाली .  देशद्रोही विश्वकर्मा पळून गेला आणि तुम्ही आम्हाला तोंड वर करून सांगताय......?
" महाराज काल रात्रीपासून विश्वकर्मा च्या शोधात चारी दिशांना सैनिकांच्या तुकड्या गेलेल्या आहेत.....
" झालं ,  झालं ना , एवढच होताना ....? का अजून काही बातमी द्यायची आहे......? "  महाराज विक्रम वैतागून आणि ओरडून बोलत होते
    त्यावेळी परराष्ट्र व्यवहार सांभाळणारे वृद्ध मंत्री उठून उभा राहिले. महाराजांच्या भितीमुळे ते वृद्ध मंत्री थरथरत होते . थरथरतच त्यांनी बोलायला सुरुवात केली....
" महाराज संसाधन समूहाच्या राज्यातून दूत आलेला आहे.....
पूर्वेकडे असलेली पाच राज्य ही संसाधन समुहाची राज्य म्हणून प्रसिद्ध होती .या पाच राज्यातून मिळणारी खनिज संपत्ती ही मौल्यवान होती . ती खनिज संपत्ती संपूर्ण पृथ्वीतलावर ती वापरली जात होती.....
" बोलवा त्याला पुढे , तो काय भेट घेऊन आला आहे काय आपल्यासाठी .....? महाराज म्हणाले
" नाही महाराज .....असं म्हणण्याचे त्या वृद्ध मंत्राचे धाडस झालं नाही . तो दूत एक पत्र घेऊन आला होता .  महाराजांनी बोलल्यानंतर तो पत्र वाचू लागला.....


" प्रति रक्षक राज्याचे महाराज विक्रम यांस सप्रेम नमस्कार.......

   महाराज संसाधन समूहाच्या पाच राज्यावर आक्रमण करून मातीतल्या लोकांनी  राज्ये त्यांच्या ताब्यात घेतली आहेत . पाचही राजांना बंदी बनवून कारागृहात टाकले आहे . आम्हाला मदतीची पुकार करण्यासाठी हे पत्र लिहिण्याची संधी दिली आहे . परंपरेने चालत आलेल्या आपल्या सहयोगी राज्यांना आम्ही पत्र लिहीत आहोत . इतकी वर्षे आम्ही तुम्हाला खनिजसंपत्ती पुरवत आलो आहोत , आता आम्हाला तुमच्या मदतीची गरज आहे .  ती भिंत पाडण्याची आज्ञा तुम्ही दिली आहे ,  भिंत पाडण्याच्या ऐवजी इकडे येऊन आमची राज्य आम्हाला प्राप्त करून द्यावीत . भिंत काय कोणीही पाडू शकतो .  भिंत पाडण्यात कसले आले आहे मोठे राजेपण .... तुम्ही खरेच राजा व मर्द  असाल तर संसाधन समूहातील पाचही  राज्य  त्या लोकांपासून  सोडूवून आमच्या ताब्यात द्या......

     त्या दुतांने पुढचं वाचायच्या अगोदरच महाराजांनी त्यांची तलवार घेत त्या दुताच्या जवळ जात , त्याचं मस्तक त्याच्या धडापासून वेगळे केलं .  संपूर्ण राज्यसभेत रक्ताचे शिंतोडे उडाले......

         आयुष्मान व भरत या दोघांना मिळून बाराशे पन्नास व  चैतन्य आणि कनिष्का या दोघांना मिळून बाराशे पन्नास असे चौघांना मिळून  पंचवीसशे कोसाचं अंतर पार करायचं होतं . प्रत्येक पाव कोसांवर असलेल्या खड्ड्यांमध्ये बी टाकत चौघेही  निघाले होते .  भरत व कनिष्क दक्षिणेकडे बरेच अंतर पार करून भरपूर पुढे गेले होते , कारण दक्षिणेकडे फार काही जंगले नव्हती . रस्ते होते . फक्त प्रवास करायचा होता .  मात्र उत्तरेकडे रस्ते व्यवस्थित नव्हते . बऱ्याच वेळा घोड्यावरुन उतरून पायी चालत जावं लागायचं . त्यामुळे आयुष्मान व भरत यांची चाल जरा मंद होती .  त्यांनी आतापर्यंत फक्त दीडशे कोसाचं अंतर पार केलं होतं . एवढे अंतर पार केलं पण त्यांना एकही मनुष्याची वस्ती दिसले नाही , किंवा एकही जंगली प्राणी त्यांच्या वाटेत आला नाही .  आकाशात उंचावर ती उडणारा एक गरुड मात्र त्यांना दिसला होता....

" आयुष्यमान तुला जर वाटत होतं , तर तू तिला बरोबर घेऊ शकला असता .  तसेही सभेचा प्रमुख होता तू , तू घेतलेल्या निर्णयाला कोणी विरोध केला नसता .   आपण कोणाला सांगितलंही नसतं....
     जेव्हा पासून ते तिला मागे सोडून आले होते तेव्हापासून आयुष्यमान गप्प गप्पच होता . त्यामुळे भरत आयुष्यमान ला म्हणाला....
" भरत्या मी कुणाला सांगितलं नाही , पण मला ती खूप आवडते . आतापर्यंत मी इतका फिरलो.  इतक्या स्त्रिया बघितल्या . तिच्या होऊनही कैक पटीने सुंदर , रूपवती पण माझं मन कधीच मोहित झालं नाही.....
" मग काय आता पुढचा वारसदार निवडून संसार थाटायचा विचार दिसतोय.....?
" नाही भरत्या , अरे हा काळ फार विचित्र आहे . महाराज विक्रमने भिंत पाडण्याचे आज्ञा दिली आहे . त्याबरोबर सर्वत्र कोलाहल माजलेला आहे . भिंत पडल्यानंतर काय होईल काही सांगता येत नाही .  आणखी बऱ्याच गोष्टी आहेत . त्यामुळे याच वेळेला जर मी वारसदारांच्या सभेचा त्याग केला तर ते योग्य ठरणार नाही.....
" तेही आहेच म्हणा आणि अचानक ओरडला
" अरे तो बघ ....केवढा मोठा रेडा आहे तो..... "  भरत एका मोठ्या रेड्या कडे बोट करत म्हणाला . तो खरच खूप मोठा ,  काळा रेडा होता . साधारणपणे अडीच तीन हात लांब आणि तेवढ्याच उंच . वजनात कमीत कमी पाच ते सहा मणाचा (१मण=१६०किलो)तर नक्की असेल.....

" अरे भरत्या त्यावरती कुणीतरी बसल्यासारखं वाटतंय बघ......
    रेडा संथ गतीने चालला होता त्या . रेड्या वरती टाकलेल्या कापडाच्या झोळीत एक लहान मुल , व रेड्यावरती एक माणूस बेशुद्ध पडल्यासारखा वाटत होता .  दोघांनी आपल्या घोड्याची गती वाढवली .  रेड्याच्या बाजूला गेले  . त्यांनी त्याला थांबवलं . वरती बसलेल्या माणसाला त्यांनी खाली उतरवले . ते त्या झोळीतील मुलाला उतरून काढणार होते पण जंगलातून सिंहाची गर्जना ऐकू आली .गर्जना ऐकल्यानंतर तो रेडा जरा  हालचाल करू लागला . भरताने त्याची येसन (येसन म्हणजे रेड्याच्या नाकातून आरपार काढलेले दावे ) धरत त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला , पण आता सिंहाची गर्जना फार जवळून येत होती.  तो रेडा भारताच्या हातून सुटून पळाला.  तो रेडा वेड्यावाकड्या उड्या मारत फिरत होता . त्याच्यावरच असलेली झोळीही हलत होती . ती झोळी कोणत्याही क्षणी खाली पडू शकत होती व त्यातील मुलाला  मार बसून ते मुल दगावण्याची होण्याची शक्यता होती . इकडे सिंह गर्जना करत आयुष्यमान च्या अंगावर धावून येत होता . " भरत्या तु जा आणि त्या झोळीतील मुलाला कसेही करून वाचवा , मी या माणसाकडे बघतो ...........
       त्याच वेळी रेड्याने उंच उडी मारली ,  त्याच्यावर असलेली झोळी उंच उडाली आणि खाली दगडावर आपटणारच होती तेव्हाच इकडे  सिंहाने आयुष्यमान वरती धाव घेतली........
       पुन्हा एकदा तो सिंह आणि रेडा जागीच स्तब्ध झाले . उंच उडालेली झोळी गरुडाने त्याच्या चोचीत पकडून व्यवस्थितपणे खाली ठेवली .........

         जलधि राज्याच्या युद्ध कक्षात भरलेल्या तात्काळ बैठकीचा निर्णय झाला होता . बाटी जमातीच्या लोकांना जलधी राज्यात आश्रय दिला जाणार होता . त्या लोकांनी   सैनिकांना फक्त त्या विशिष्ट प्रकारच्या बासर्‍या कशा बनवायच्या व ती धून कशी वाजवायची हे शिकवायचे होते . त्याचबरोबर कसेही करून महाराज विक्रमांना ती भिंत पाडण्यापासून थांबवायचे असाही निर्णय झाला होता . बैठक संपल्याची घोषणा झाली होती पण  हेर पथकाचा प्रमुख कौशिक म्हणाला.....
" महाराज अजून एक गोष्ट आपल्या निदर्शनास आणुन देऊ इच्छितो , ती म्हणजे काल आपल्या संशोधन शाळेत झालेला हल्ला मारुत राजाच्या आज्ञेवरून झाला होता .....
     मारूत राजाचे नाव ऐकल्यानंतर कैरव महाराजांच्या कपाळावर आठ्या पडल्या ....
"  इतक्या वर्षात मारूत राजांची खबरबात नव्हती अचानक हे कसे उद्भवले .......
" ज्या  व्यक्तीने हल्ला केला होता , तो मनुष्य अजूनही फरार आहे . त्याला शोधण्याचे प्रयत्न चालू आहेत . तू सापडल्यानंतर आपल्याला याबाबत अजून माहिती कळू शकेल . पण आता अशाप्रकारचे हल्ले होणार नाहीत असं  आपण म्हणू शकत नाही , आपल्याला आपली सुरक्षा वाढवावी लागेल..........

" व्यतयाबद्दल क्षमस्व ,  पण रक्षक राज्याचे प्रधान विश्वकर्मा , राजकुमारी अन्वी आणि राजकुमार देवव्रत जलधि राज्याच्या सीमेत आलेले आहेत..... पुढच्या काही तासाच ते राजमहली असतील.....
कौशिका चा विश्वासू हेर भार्गव आत येत  बोलला....।.

Thursday 28 March 2019

प्रलय-०७

प्रलय-०७

      त्या गोल वर्तुळाकार नकाशा भोवती सर्व जण जमले होते . जलधि राज्यात आज कितीतरी वर्षांनी त्या युद्ध कक्षात ही तात्काळ  बैठक बोलावली  होती .  काही विशेष मंत्रीगण , हेर पथकाचे प्रमुख ,  सेनाप्रमुख प्रमुख सल्लागार आणि स्वतः महाराज कैरव त्या ठिकाणी उपस्थित होते . महाराज कैरव बोलत होते ,
" आपल्या राज्यसभेत आणि संशोधन शाळेत ज्या काही गोष्टी झाल्या त्या तुम्ही पाहिल्या . तो माणूस आणि त्याचे ते विचित्र शब्द , हे आपण सर्वांनी ऐकलं आणि पाहिलं आहे . तो काय करू शकतो हे ही आपल्याला ज्ञात आहे  .  आपला शत्रू त्या काळ्याभिंतीपलीकडे आहे आणि त्यांची संख्या जरी कमी असली तरी ते आपल्यापेक्षा खूप शक्तिशाली आहेत आणि महाराज विक्रमांनी ती भिंत पाडण्याची आज्ञा दिली आहेत .  त्यांच्या काही सैन्याच्या तुकड्या त्यांचं कार्य पूर्ण करण्यासाठी पश्चिमेकडे निघाल्या आहेत . आपल्या राज्याची पुढची दिशा काय असावी ? आणि पुढे कोणती पावले उचलावीत यासाठी ही बैठक तात्काळ बोलावलेली आहे . कारण आपण लवकर कृती केली नाही तर त्याची फळे आपल्या संपूर्ण राज्याला , राज्यातील  सामान्य जनतेला भोगावी लागतील . एक जबाबदार राजा म्हणून राज्यातील प्रमुखांचे मते घ्यावीत असं मला वाटलं , म्हणून या ठिकाणी तुम्हाला बोललेलं आहे . यशवंत जी तुम्ही राज्याचे सेनाप्रमुख आहात , तुम्ही या समस्येकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहता....
" महाराज कैरव आपली सेना कोणत्याही क्षणी युद्ध लढण्यास तयार आहे आपण फक्त आदेश द्यावा....
" यशवंतजी मी तुमचं मत विचारले आहे....?
" महाराज खरं बोलायचं झालं तर या पृथ्वीतलावर ती आपले राज्य सर्वात शक्तिशाली व सामर्थ्यशाली आहे  .  आपल्या राज्यातील सैन्य व सैनिक सर्व बाजूनी इतर सर्व राज्यांपेक्षा उजवे आहेत . त्यांची प्रशिक्षण पद्धती त्यांच्याकडे असणारी हत्यारे त्यांना पुरवले जाणारे चिलखत , टोप हे सर्व उच्च प्रतीच्या संशोधनातून तयार केले जातात . त्यांना सहजासहजी हरवने कोणालाही शक्य नाही...... काळी भिंत जरी पाडली तरीही आपल्याला काही फरक पडत नाही  . कारण राज्यसभेत आणि संशोधन शाळेत जे काही अवतरलं होतं त्याला काळी भिंत थांबवू शकली नाही ,  त्यामुळे ती पडली तरी काही हरकत नाही . उलट आपण त्या बाटी जमातीकडून त्या बासऱ्या व त्यांची वाजवण्याची पद्धत शिकून घेतली पाहिजे .  त्या बासऱ्याचं उत्पादन सुरू करून आपल्या सैनिकांना त्याच पद्धतीने वाजवायला शिकवलं पाहिजे .  जेणेकरून आपण त्या तसल्या व्यक्तींवर ती त्याचा वापर करू शकतो....
" त्यांना दक्षिणेकडच्या देवाचे पुजारी किंवा अंधभक्त असे म्हणतात .  बाटी जमातीचा नायक ही त्या सभेसाठी उपस्थित होता .  त्याने सेनाप्रमुखांना सांगितले ,
"  आमच्या पारंपरिक कथेमध्ये या अंधभक्तांचा उल्लेख आहे ,  ज्यावेळी दक्षिणेकडील देव जागृत होईल त्यावेळी जागोजाग असे अंधभक्त उद्भवतील , ही खरे तर सामान्य माणसे असतात . पण या सामान्य माणसांना जेव्हा दक्षिणेकडचा देव  त्याच्या सेवेत घेतो , त्यावेळी हे लोक अंधभक्त बनतात . त्यांना काही दिसत नाही ,  त्यांना फक्त तेच दिसते जे त्यांचा देव दाखवतो .  त्यांना स्वतःचं मत नसतं , ना व्यक्तित्व असतं , ना ते विचार करू शकतात , ना स्वतः कोणती कृती शकतात . त्यांना कोणतीच जाणीव नसते . ज्यावेळी एखादा माणूस अंधभक्त होतो त्यावेळी आपण समजून जायचं की तो मृत आहे  आणि सर्वशक्तिमान आहे ....
" पण तुम्हाला ती बासरी आणि त्या बासरीची धून याबाबत माहिती कशी झाली ...?  महाराज कैरवांनी आणि त्या नायकाला विचारले
" आमच्या सर्व जमातीचे त्या भिंतीपलीकडे एक प्रार्थना स्थळ होतं .  त्याठिकाणी आमच्या त्या प्रार्थनास्थळांची मुख्य पुजारीन ,  जिला आम्ही राणी देवालिका असं संबोधतो , ती आम्हाला कथा सांगते , भविष्य सांगते आणि भूतकाळही सांगते..... राणी देवालिका  पद हे परंपरेने चालत आलेले असतं . ज्या राणीनेच आम्हाला बासरी विषयी सांगितलं , ती अकरावी राणी देवालिका होती , मी लहान होतो तेव्हापासून तीच राणी देवालीका होती ,  तिने आम्हाला हे सर्व सांगितले...
" मग या रानी देवालिकेला भेटणं शक्य आहे का...?  महाराजांनी विचारलं
" ज्यावेळी दक्षिणेकडचा देव जागृत झाला त्यावेळी पहिल्यांदा आमचं प्रार्थनास्थळ त्याच्या प्रकोपाने नष्ट झालं  . नष्ट झालं म्हणण्यापेक्षा  आमच्या स्वतःच्या लोकांनीच ते नष्ट केलं  अंधभक्त पहिल्यांदा बाटी समाजात उद्भवले . त्यावेळी त्या ठिकाणी असलेल्या आमच्या जमातीचे सर्व लोक मिळूनही त्या अंध भक्तांना थांबवू शकले नाहीत . त्यावेळी ही बासरी ची संकल्पना कोणाच्याच लक्षात आली नाही . नंतर जेव्हा ही घटना सगळीकडे पसरली त्यावेळपासून आम्ही सर्वजण स्वतःजवळ बासरी बाळगू लागलो ....
" या अंध भक्तांविषयी तुम्हाला अजून काय माहित आहे...?  त्यांना कशाप्रकारे मारू शकतो आणि त्यांच्या अजून कोणत्या कमकुवत जागा आहेत....?  महाराज कैरवांनी त्याला विचारले....
" मला फक्त त्या बासरी विषयी माहित आहे आमच्या कबील्याचीही  एक पुजारीन आहे,  तिला या जुन्या पुराण्या बऱ्याच गोष्टी माहित आहेत .  तुम्ही तिला विचारू शकता ,
 तो बाटी जमातीचा नायक म्हणत होता...
" मी लहानपणापासून बऱ्याच गोष्टी ऐकत आलो आहे ,पण त्या फक्त गोष्टी म्हणूनच मी मानत होतो . मात्र या गोष्टी खऱ्या होत आहेत,  एकूण एक , एकापाठोपाठ एक . त्यामुळे आम्हाला आमचे मूळ घर सोडून स्थलांतरित व्हावे लागत आहे.....
महाराज कैरवानी कौशिककडे पाहिले ,
कौशिक म्हणाले....
" महाराज मी अगोदरच त्यांच्या संर्व कबिल्याना आपल्या राज्यात स्थलांतरित करण्यासाठी आपली सैनिकांची तुकडी पाठवलेली आहे .  यांच्यापैकी यांचे बरेच कबीले आपल्या राज्यात आलेले आहेत , तर काही कबीले अजून येत आहेत . नायकांनी आत्ताच ज्या पूजारनीचा  उल्लेख केला , त्या पूजारनीला आणण्यासाठी आत्ताच सैनिकांची एक तुकडी पाठवतो ......

पुढे सेनाप्रमुख , कौशिक व इतर मंत्र्यांनी आपले विचार मांडले .  त्यांचा निष्कर्ष एकच निघत होता . महाराज विक्रमांनी भिंत पाडायची ठरवली आहे तर त्यांना पाडू दे त्याचा आपल्याला काही फरक पडत नाही , आपण आपल्या राज्यातील लोकांचा विचार करून त्यांच्या साठी जे काही उपाययोजना करायच्या आहेत त्या करू .

बऱ्याच वेळानंतर राज्याचे प्रमुख सल्लागार महर्षी सोमदत्त बोलले...
" महाराज कैरव जेव्हा तुमचे वडील हयात होते त्या वेळेपासून मी या राज्याचा महर्षी म्हणून सेवा करत आहे .  काळ्या भिंतीपलीकडे जे काही आहे , त्याने एकेकाळी या संपूर्ण पृथ्वीतलावर हाहाकार माजवला होता . काळ्या भिंतीपलीकडील सम्राटाने पृथ्वीवरती प्रलय आणला होता .  त्या प्रलयानंतर  एका नवीन युगाची सुरुवात झाली . त्या सम्राटाला हरवण्यासाठी पृथ्वीतलावरील सर्व राज्ये एकत्रित झाली होती .  अजूनही त्यांना सहयोगी राज्ये म्हणून संबोधले जाते .  त्या सर्व राजांनी मिळून त्याला त्या भिंतीपलीकडे बंदिस्त करून , ती भिंत बांधली. इतकी वर्ष झाली तरी अजूनही ती जमीन , तो भाग राहण्यालायक  नाही , तिकडे जीवन नाही... मागच्या वेळी जेव्हा काही मूर्ख लोकांनी त्या काळ्या  भिंती पलीकडील मदतीने जेव्हा पृथ्वीतलावरचे राज्य ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला होता ,  त्यावेळी  भिंतीच्या अलीकडील सहयोगी राज्यांनी मिळून त्या मुर्खांना मृत्युदंड दिला होता...... अधूनमधून असे लोक उद्भवताच जे काळ्या भिंतीपलीकडील मदतीने पृथ्वीवरचे साम्राज्य ताब्यात घ्यायचा प्रयत्न करतात... पण इतकी वर्षे झाली एकदाही ती भिंत पाडण्याचा प्रयत्न झाला नाही . कुणाचीही भिंत पडण्याची हिंमत झाली नाही . आणि आत्ताच असे काय झाले महाराज कि विक्रमांनी हा आदेश दिला.....? खरेतर त्या मूर्ख विक्रमला महाराज म्हणायला माझी जीभ लवत नाही . ज्यावेळी महाराज विक्रमाचा राज्याभिषेक होणार होता व सर्वांना निमंत्रणे गेली होती  ;  त्यावेळेस मी आपल्याला सल्ला दिला होता ,   विक्रम एवजी महाराज विश्वकर्मा ना रक्षक राज्याचे राजा बनवावे.... मला विक्रम मध्ये पूर्वीपासूनच काहीतरी विचित्र दिसत होतं . तो रक्षकाचा वंश असू शकत नाही .  महाराज सत्यवर्मा व महाराणी शकुंतलेचा पुत्र असू शकत नाही . त्याने भिंत पाडण्याचे आज्ञा दिली आहे म्हटल्यानंतर त्यामागे नक्कीच काहीतरी मोठी गोष्ट असणार आहे ,  जी आपल्याला दिसत नाही . आपण त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही .  महाराज माझं मत विचाराल तर मी प्रामाणिकपणे सांगतो की कसंही करून त्या मूर्ख विक्रमाला ती भिंत पाडण्यापासून थांबवायलाच हवं . एक मिथक व अंधश्रद्धा म्हणून जर आपण त्याकडे बघत असाल तर आपलं चुकत आहे . महाराज जर ती भिंत पडली तर आपल्याला , आपल्या सर्वांना , सर्व मानव जातीला फार मोठे बलिदान द्यावे लागेल.....
" पण महर्षी कितीतरी शतकात आपण त्या भिंती मुळे आपले रक्षण झालय अशा गोष्टी ऐकल्याच नाहीत...
उलट ती भिंत आपले अस्तित्व दाखवून देत आपल्याला त्यापलीकडे जाण्यापासून थांबवण्याचा आलेली आहे .  त्या पलीकडे असलेली  खनिज संपत्ती जर आपल्या राज्यात आली तर आपल्या राज्यात, व इतरही अनेक राज्यात  अजून मोठ्या प्रमाणावर सुख-समृद्धी येऊ शकते..... सेनाप्रमुख यशवंतजी महर्षींना विचारत होते....
" सेनाप्रमुखजी काही गोष्टींचे अस्तित्व जरी दिसत नसले तरी त्या असतात .  आपण त्यांचं अस्तित्व नाकारू शकत नाही . एखादी गोष्ट दिसत नाही म्हणून ती नाही असे नसते .  एखादी गोष्ट आपल्याला जाणवत नाही म्हणून ती नाही असे नसते . एखादी गोष्ट आपल्याला समजत नाही म्हणून ती नाही असेही नसते . बऱ्याच वेळा बऱ्याच गोष्टी अशा असतात ज्या आपल्याला कुठेही दिसत नाहीत जाणवत नाहीत पण वेळ आल्यावरती आपले अस्तित्व दाखवून देतात......
महर्षींच्या या वाक्यांवरती संपूर्ण सभा विचार मग्न झाली....
क्रमःश

Wednesday 27 March 2019

प्रलय-०६

प्रलय-०६

    " तू इथे काय करतेस ....? आयुष्यमानने तिला विचारलं ......
       आयुष्यमान व भरत तिला त्या ठिकाणी पाहून  आश्चर्यचकीत झाले होते . ती त्याठिकाणी कशासाठी आली असावी याचा विचार करत आयुष्यमान मनोमन आनंदित होत होता . त्याला वाटत होतं कि ती त्याच्यासाठीच तिथे आली असावी .

" मी कसं सांगू हे मला कळत नाही , खरंच.....
तिला काहीतरी सांगायचं होतं , पण ती संकोचत होती . आयुष्यमानच्या मनात लाडू फुटत होते .
" तुम्हाला काही सांगायचं असेल तर निसंकोच बोला , तुम्हाला मदत करायला आम्ही केव्हाही तयार आहोत ......"  आयुष्यमानच्या मनातले वाक्य भरत बोलला , त्यामुळे आयुष्यमान मनात  चरफडला .हळूच त्याने भरत्याला गुद्दा घातला...
" इसाटीकोपा मिसाटीकोपा .....
ती स्त्री म्हणाली
" तुम्हाला हे वाक्य कसं माहित.....? , ते अधिक सावध झाले.......
" मीही एक वारसदारच आहे . माझ्या वडिलांनी माझी निवड केली होती....
" पण गेल्या आठवड्यात झालेल्या वारसदारांच्या सभेला तुम्ही उपस्थित नव्हता..... आणि तसेही आपल्या स्वतःच्या नातलगास वारसदार म्हणून निवड करण्याची बंदी आहे , मुळात वारसदाराला  तोपर्यंत स्वतःचा संसार थाटता येत नाही जोपर्यंत तो पुढचा योग्य वारसदार निवडत नाही  . त्यामुळे तुमची वारसदार म्हणून निवड होणे अशक्यच आहे...... आयुष्यमान म्हणाला .
" म्हणूनच वारसदाराच्या सभेने बाबांच्या निर्णयाला त्यावेळी मान्यता दिली नव्हती . पण नंतर काळ बदलत गेला ,  ज्यावेळी विश्वनाथ वारसदाराच्या सभेचे प्रमुख झाले , त्यावेळी त्यांनी या निर्णयाला मान्यता दिली . माझं काम माझ्या क्षेत्रातपुरतंच मर्यादित होतं , मला कुठे फिरायची मुभा नव्हती . त्यामुळे मला  वारसदारांच्या सभेत जायलाही बंदी होती .
"  विश्वनाथांनी मला याबद्दल कधीच काही सांगितलं नाही , ज्यावेळी माजी सभेचा प्रमुख म्हणून निवड झाली त्यावेळी विश्वनाथांनी याबाबतीत सांगने क्रमप्राप्त होतं...... ते असो पण तुम्ही इथे काय करताय.....?
" बाबांची वारसदार म्हणून निवड होण्यामागचे एक प्रमुख कारण होतं  , ते म्हणजे बऱ्याच वेळा त्यांना काही घटनांचं पूर्वज्ञान व्हायचं , स्वप्नातून  किंवा अंतर जाणिवेतून , त्यांना पुढे घडणाऱ्या घटना कधी कधी समजायच्या..... पण बाबा एकदा काळ्या भिंतीपलीकडे गेले होते .  वारसदारांच्या सभेत काहीतरी निर्णय झाला होता .  बाबांना काहीतरी समजलं होतं . त्यासाठी ते काळ्या भिंतीपलीकडे गेले .  तेव्हापासूनच त्यांची मानसिक स्थिती ढासळत गेली..... जेव्हा त्यांना व्यवस्थित समजत होतं , त्या वेळीच त्यांनी पुढचा वारसदार म्हणून माझी निवड केली होती.....
" ते असू द्या हो पण तुम्ही इथे काय करताय हे तुमच्यासाठी धोकादायक असू शकतं..... भरत म्हणाला.....
" जरी त्यांची मानसिक स्थिती ढासळली असली तरी अजूनही त्यांना काही घटनांचे पूर्वज्ञान होतं . तुम्ही त्या बिया घेऊन गेल्यानंतर बाबासारखे पळत होते ....' काळी भिंत , बिया , आयुष्यमान धोका......'  मला वाटतं ते म्हणत होते की आयुष्यमानला काळ्या भिंतीपासून व बियांपासून धोका आहे.....
" पण हे कसं शक्य आहे ....?मधूनच भरत म्हणाला.....
" मी बरेच धोके पचवलेले आहेत , तुम्ही माझी काळजी करू नका ,  तुम्ही परतून घरी जा त्या ठिकाणी तुमचे बाबा एकटे असतील..... आयुष्यमान असं म्हणत असतानाच त्याच्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या .  कारण तिला आयुष्यमानची काळजी वाटत होती  आणि तिला त्याची काळजी वाटत असल्याने त्याला मनोमन आनंद झाला होता....
" मी बाबांना शेजारच्या गावात असलेल्या धर्मशाळेत बाबांना सोडून आलेली आहे , मी तुमच्याबरोबर उत्तरेकडे येणार आहे.....
" आयुष्यमान ती तुझी काळजी घेण्यासाठी उत्तरेकडे येणार आहे .....भरत आयुष्यमान च्या कानात कुजबुजला व नंतर तिच्याकडे वळून म्हणाला " अहो तुम्ही आमची काळजी घेण्यापेक्षा आम्हाला तुमची जास्त काळजी घ्यावी लागेल.....! "
 आयुष्यमानला मनोमन वाटत होते कि तिला बरोबर घेऊन जावे . पण तो तसं करू शकत नव्हता , कारण झालेल्या निर्णयानुसार त्या दोघांनाच उत्तरेकडे जाणे भाग होते . भरतचं म्हणही बरोबर होतं तिचीच अधिक काळजी घ्यायला लागणार होती ,  आणि ती बरोबर असल्यामुळे त्यांचा वेगही मंदावणार होता .
" तुम्ही आमच्यासाठी तुमच्या बाबांना  धर्मशाळेत सोडून येऊ नका .  आम्ही आमचं कार्य करू शकतो , आणि काळजीही घेऊ शकतो.....
" माझा निर्णय झालेला आहे आणि तुझा ही झालेला आहे . आयुष्यमान  तुला वाटत नाही का मी तुझ्याबरोबर यावं.....
" इथं मला काय वाटतं याचा प्रश्न नाही निर्णय काय झालाय याचा प्रश्न आहे....? सभेने घेतलेल्या निर्णयाविरुद्ध जाणं हे योग्य नाही.....
" बरं मग मला सांगा ,  उत्तरेकडच्या जंगलात भरपूर जंगली प्राणी आहेत  . जर एकाच वेळी तुमच्यावरती चार-पाच वाघांनी धावा बोलला तर काय कराल.....
" आम्ही काहीतरी करू शकतो , पण जर तू आमच्या बरोबर असली तर आम्ही काहीच करू शकणार नाही .  कारण तुझ्या सुरक्षेसाठी आम्हाला वेगळी कसरत करावी लागेल.....
" फार लांब कशाला आत्ताच पाहूया ,  समजा मी इथे नाही आहे आणि या वाघांनी तुमच्यावरती धावा बोललेला आहे ........" जेव्हा तिनं हे वाक्य संपलं तेव्हा त्यांच्या मागून वाघाची डरकाळी ऐकू आली.....

   आयुष्यमान मागं वळून पाहिलं त्या ठिकाणी तीन वाघ आक्रमकतेचा पवित्रा घेऊन कोणत्याही क्षणी उडी मारायच्या बेतात उभे होते . ते वाघ साधेसुधे नव्हते . त्या जंगलातील वाघाचा आकार साधारणपणे असलेल्या वाघाच्या आकारापेक्षा दुप्पट होता . असे ते विचित्र आणि  पूर्ण वाढ झालेले मोठे व एका माणसाला सहजपणे त्यांच्या नाश्त्याला पचवणारे वाघ होते  . त्यांची तलवार त्यांच्याजवळ नव्हती . त्यांचे घोडे त्यांच्यापासून काही पावलांच्या अंतरावर होते .  पण त्यांनी हालचाल केली असती तर वाघाने त्यांच्यावरती धाव घेतली असती .  आयुष्यमान तसाच थांबला  . वाघ ही तसेच स्थिर होते . हळूहळू करत तो घोड्याकडे जात होता . भरत ही हळूहळू घोडा कडे सरकत होता .  दोघेही घोड्यापाशी पोहोचले . त्यांनी त्यांच्या तलवारी हातात घेतल्या .  त्याच वेळी एका वाघाने भरत वरती तर दुसऱ्या वाघाने आयुष्यमान वरती उडी घेतली . भरतने बाजूला सरत तलवार  अशी धरली जेणेकरून वाघाने उडी घेतली तरी ती तलवार सरळ वाघाच्या काळजात आरपार जाणार होती .  पण वाघाने खूपच उंच उडी घेत मागच्या पायाने भरतला तोंडावरती पाडले . आयुष्यमानच्या खांद्यावरती पंजा मारत त्या वाघाने आयुष्यमानलाही खाली पाडले . आयुष्यमाने त्याच्या हातातली तलवार पडू दिली नाही .  दुसऱ्या वेळी तो वाघ त्याच्यावरती उडी घेत पंजे मारायला येत असतानाच आयुष्यमाने तलवार चालवत त्याच्या पुढच्या एका पायाचा पंजा कापून टाकला.....       
त्यामुळे वाघ अधिकच चवताळला , त्याने लंगडत लंगडत येत  आयुष्यमानच्या पायाला धरले व त्याला भिरकाउन दिले .  आयुष्यमान जोरात जाऊन झाडाला आपटला .  उभा असलेला तिसरा वाघ चवताळून जाउन आयुष्यमानवरती उडी घेतली . त्याच्या गळ्याचा घोट जाणारच होता , पण तीनही वाघ एकाच वेळी स्तब्ध झाले , पुतळ्या प्रमाणे.....
 
        तिन्ही वाघ एखादा पुतळा  असावा तसेच  होते  . ते सजीव आहेत  हे अजिबात जाणवत नव्हते .  त्या दोघांनाही नक्कीच भास होत असावा ,
" बघितली मी तुमची शक्ती साधे वाघ तुमच्यावरती धावून आले तर तुमचा जीव जाणार होता , आणि उत्तरेच्या जंगलात वाघापेक्षा बरेच चित्रविचित्र प्राणी सुद्धा आहेत हे माहित नाही वाटतं तुम्हाला......?
" काय ....? काय केलस तू हे......  हे वाघ असे का स्तब्ध झाले आहेत......?
" म्हणूनच मी म्हणते मला तुमच्या बरोबर येऊ द्या तुम्हाला माझी गरज आहे.....
    ते दोघेही वाघापासून दूर झाले . त्यावेळी घोड्यावर बसून तिने डोळे झाकून काही क्षण थांबली. ते वाघ गपचूप जंगलात निघून गेले ....
" तुम्ही हे नक्की कसं केलं  ..... ?आश्चर्यचकित झाला होता .
" अरे भरत्या ती सर्व प्राण्यांच्या मनावर नियंत्रण करू शकते.....! आयुष्यमान म्हणाला.....
" तरीही तू आमच्या सोबत येणार नाही , कारण सभेच्या विरुद्ध कोणताही निर्णय आचरणात आणला जाऊ शकत नाही . तू आताच्या आता माघारी जा.....
    आयुष्यमानला जरी मनातून वाटत असले तिने त्याच्याबरोबर यावं,  पण सभेच्या निर्णयाविरुद्ध जाणे त्याच्या मनाला पटणारे नव्हते . तो कर्तव्यनिष्ठ होता.....

    ते दोघेही घोड्यावरती बसले  व उत्तरेकडे निघाले .  त्याने तिच्याकडे वळूनही पाहिले नाही  . आयुष्यमानला मनोमन खूप वाईट वाटत होतं . त्याने मनातल्या मनात तिची क्षमायाचना केली . जाता जाता शेवटचा पहावं म्हणून त्यांनी मागं वळून पाहिलं पण ती तिथे नव्हतीच .
तिचा घोडा दक्षिणेकडे चाललेला दिसत होता . त्याने मनातल्या  स्वतःला दोष देत घोड्याला टाच  दिली व तो पुढच्या खड्ड्याकडे निघाला .

       प्रधानजी , अन्वी , देवव्रत प्रधानजीसाठी लढलेले आठ सैनिक , भिल्लव नि सरोज प्रधानजींच्या मागोमग त्या भुयारातून नगराबाहेर पोहोचले . नगराच्या तटबंदी बाहेर दोन कोसावर असलेल्या जलधि राज्याच्या पहारा  कक्षाकडे जायचा त्यांचा बेत होता . काही काळ विश्रांतीसाठी ते त्या ठिकाणी थांबले होते . रात्रीचा अंधार पडला होता . दुसऱ्या दिवशी सकाळी  प्रधानजीला फाशी देण्यात येणार होती . चौथ्या प्रहराला बदली सैनिक त्याठिकाणी येणार होते .  त्यावेळी  तळघरातील तुरुंगात पडलेली प्रेते पाहून प्रधानजींचा कसून शोध घेतला जाणार होता . त्यामुळे लवकरात लवकर पुढे जाणे गरजेचे होते . पण सरोज नगराकडे निघून गेली होती .  तिच्या सखी त्या वेश्यालयात होत्या   त्यांना एकटे सोडून ती जाऊ शकत नव्हती . भिल्लवाला तिला सोडून पुढे जाणे जिवावर आले होते . तो उदास होऊन एका बाजूला बसला होता .
" भिल्लवा तुला आमच्याबरोबर येण्याची गरज नाही ,  तू   या आठ सैनिकांना घेऊन उत्तरेच्या जंगलात जा .... उत्तरेच्या जंगलात असलेले सैन्य गोळा कर  . पुढचे आदेश मी तुला पाठवेनच ......
      सार्थक व त्याच्या  साथीदार सैनिकांबरोबर  तो  नगराच्या बाजूने उत्तरेकडे च्या जंगलात निघाला .
इकडे अन्वी , देवव्रत व प्रधानजी जलधि राज्याच्या पहारा कक्षाकडे निघाले.....

Tuesday 26 March 2019

प्रलय-०५

प्रलय-०५

   " आता काय करायचं भिल्लवा , "  सरोज वैतागून भिल्लवाला म्हणाली  .  त्यांच्यासमोर वीस सैनिक व मागच्या बाजूला पाच सैनिक ,  असं त्यांच्या भोवती पंचवीस सैनिकांचा गराडा पडला होता .   महाराज विक्रम त्यांना देशद्रोही ठरवून फाशी द्यायला कमी करणार नव्हते . कसेही करून त्यांना प्रधानजींना घेऊन थेट तिथून जायलाच हवे होते . चौघेही लढायला सिद्ध झाले .  सैनिक त्यांच्यावर चाल करून येणार त्या अगोदरच त्यातील काही सैनिकांनी इतर सैनिकांना मारायला सुरुवात केली . सैनिका सैनिकांमध्ये लढाई सुरू झाली होती . या चौघांना काहीच कळेना हे काय चाललं होतं .  मागून आलेल्या सहा सैनिकांना या चौघांनी मिळून जागीच ठार केलं।   आणि सैनिका सैनिकांमध्ये झालेल्या लढाईत आठ सैनिक जिवंत राहिले .
" अरे वा प्रधानजीनी त्यांची व्यवस्था अगोदरच केलीय म्हणायची ,  भिल्लव त्या आठ सैनिकांकडे पाहत म्हणाला . " आमच्या अगोदरही प्रधानजजीला कोणीतरी सोडवायला आले म्हणायचे..... , चला आपल्याला आता गडबड केली पाहिजे.....
" भिल्लवा ओळखलं नाहीस का मला....?  त्या आठ सैनिकातला सगळ्यात हट्टाकट्टा व पहिलवान सैनिक त्याला म्हणाला ,
" अरे हा तर देशद्रोह्यांच्या टोळीचा प्रमुख योद्धा दिसतोय....
"  काय भिल्लवा तुही असच बोलतोयस , तुला माहितीये सारं काही , आणि तु ही आम्हाला देशद्रोही म्हणतोयस.....
"  अरे सर्थक चेष्टा करतोय मी .....
असं म्हणत भिल्लवाने सार्थक ला मिठी मारली ....
"  तुमचा बंधू मिलाफ झाला असेल तर मला सोडवाल का......?
 प्रधानजी बाजूच्या तुरुंगातून म्हणत होते
 " क्षमा असावी प्रधानजी लगेच सोडवतो ,
 असं म्हणत सार्थक व ते सात सैनिक पुढे झाले . त्यांनी तुरुंगाचे दार तोडून काढले . आत जात प्रधानजीच्या हाताला बांधलेल्या साखळ्या त्यांनी तोडून काढल्या .  अन्वी ने पळत जाऊन तिच्या बाबांना मिठी मारली .
" अन्वी बाळा तुला किती वेळा सांगितले ,  नसते पराक्रम करत जाऊ नकोस  .....
" बाबा मी तुम्हाला फाशी जाताना कसं पाहू शकत होते....?
"  तुला असं वाटलं का , कि  मी गपचुप फाशी गेलो असतो....? , देवव्रत तू तरी कमीत कमी आन्वीला समजवायचं होतं ....?
" हा कसला समजावतोय , हाच तिला घेऊन आलाय.....
 सरोज प्रधानजीला म्हणाली , देवव्रताने सरोज कडे रागाने बघितलं , त्याच्या नजरेत एका युवराजचा अपमान झाल्या सारखा भाव  होता . मात्र प्रधानजीना अन्वी बरोबर संभाषणात असल्याने सरोजजचं हे वाक्य त्यांना ऐकू गेलं नाही .
 " आपण त्या भुयारी मार्गाने जाऊ म्हणजे सैनिकाची आपल्यावर नजर पडणार नाही .....
" अरे भिल्लवा तुझ्या मार्गाने गेलो   तर आपण नगरातच पोहोचू ,  आपल्याला लवकरात लवकर नगराबाहेर जायला हवं . त्यासाठी मला एक गुप्त मार्ग माहित आहे ......
" काय बोलत आहात प्रधानजी , मी हेरखात्याचा प्रमुख असून मलाही तो गुप्त मार्ग माहित नाही ......
" अरे भिल्लवा काही गोष्टी फारच गुप्त ठेवाव्या लागतात....
"  चला लवकर.....
   प्रधानजी पुढे ,  बाकी त्यांच्या मागे निघाले......

    जलधि राज्याच्या संशोधन शाळेत जेव्हा दारात उभ्या असलेल्या इसमाने बासरी वाजणाऱ्या दोन बाटी जमातीच्या लोकांना ठार केले व नायका वरती बाण सोडला , त्यावेळी कौशिकाने नायका वरती उडी घेत बाटी समाजाच्या नायकाला वाचवले . पण संगीत बंद झाल्यामुळे इतका वेळ शांत असलेला तो हेर पुन्हा आक्रमकपणे ओरडत त्याच्या क्रिया करू लागला.....

" सैनिकांनो महाराजांना व सर्व मंत्रीगनांना सुरक्षितपणे येथून बाहेर घेऊन जा ,  आणि काही जण  ज्यानं बाण मारला त्याच्या मागे जा.......
       कौशिकाने सर्व सैनिकांना आदेश दिला . पण त्या हेराने ' सिरकोडा इसाड कोते ' असं ओरडत बाजूला पडलेले भाले घेऊन एकापाठोपाठ एक सैनिकांवर ती फेकायला सुरुवात केली . तेथील भाले संपल्यानंतर ,  कोपऱ्यात पडलेला धनुष्यबाणाकडे तो पळाला . मात्र त्याआधीच कौशिकने तलवार फेकून त्याचा पाय जायबंदी करायचा प्रयत्न केला , पण त्याने चपळतेने ती तलवार चुकवली व तेथील धनुष्यबाण त्याच्या हाती घेतला . ज्यावेळी त्याने धनुष्यबाण हाती घेतला , त्याच वेळी कौशिकने सर्व सैनिकांना त्यांच्या ढाली महाराजांच्या व मंत्री यांच्या रक्षणासाठी समोर धरायला सांगितल्या  . मात्र त्याआधीच त्या हेराने ' सिरकोडा इसाड कोते '   असे  ओरडत महाराजांवर ती एक बाण चालवला . आलेला बाण चुकवण्यासाठी महाराज खाली वाकले ,  तेव्हा त्याने दुसरा बाण चालवला .  तो बाण महाराजांना लागणार , मात्र एका शिपायाने पुढे होत तो बांध त्याच्या ह्रुदया वरती झेलला . ढालीच्या सुरक्षीततेखाली सर्व सैनिकांनी महाराजांना व मंत्रीगनांना बाहेर नेले .  त्यापाठोपाठ कौशिक बाहेर पडत , त्याने संशोधन शाळेच्या दाराला कुलूप घातले तो हेर एकटाच आत मध्ये ओरडत नासधूस करत बसला .

   आयुष्यमान  व भारत उत्तरेकडे निघाले होते . प्रत्येक पावकोसा वरती असलेल्या गोल खड्ड्यांमध्ये एक काळा व त्यापुढील खंडांमध्ये पांढरा असे बी टाकत त्यांची यात्रा चालू होती .  आतापर्यंत त्यांनी 22 खड्डे संपवले होते . पुढच्या खड्ड्याकडे जात असताना भरत्या म्हणाला
" आयुष्यमान तुला काय वाटतं वेड्या आबाजीला खरंच आपल्या कार्याची माहिती असेल का ....? आपण त्याचं ऐकून काही चूक तर करत नाही ना....?
" तुला माहित आहे का ज्यावेळी आपल्या अगोदरच्या वारसदारांनी आपली निवड केली त्यावेळी आपल्याला एक वाक्य सांगितलं होतं  ' इसाटीकोपा मिसाटीकोपा ' म्हणजेच " मार्ग एकच आहे,  लक्ष एकच आहे " आणि हेच वाक्य तुम्हाला तुम्हाला पुढे मदत करेल असेही ते म्हणाले होते.....
" ते माझ्याही लक्षात आहे पण मला त्या वेड्या आबाजीचा विश्वास वाटत नाही .  मला वाटतं तो वेडेपणाच सोंग करतोय त्याच्या मागं नक्कीच काहीतरी गोम आहे.....
" भरत तू फारच विचार करतोयस , ज्यावेळी त्याची व माझी पहिली भेट झाली होती त्यावेळी तोच मला म्हणाला ,  ' इसाटीकोपा मिसाटीकोपा ' आणि हे वाक्य फक्त वारसदारांनाच माहीत असतं.....
" पण आयुष्यमान तू हे विसरतो की एकदा वारसदाराने पुढचा वारसदार निवडल्यानंतर त्याला मागच्या सर्व गोष्टी विसरून आपल्या दैनंदिन आयुष्य जगायचं असतं , आणि कोणत्याही परिस्थितीत नव्या वारसदाराशी संपर्क साधायचा नसतो....
" अरे भरत हे नियम मोडण्यासाठीच असतात .  आता त्या मूर्ख विक्रमाने काळी भिंत पाडण्याची आज्ञा दिली आहे , आणि तसं जर झालं तर जो आहाकार माजेल तो थांबवण्यासाठी हे असले फालतू नियम कामाचे नाहीत....

ते बोलत बोलत पुढच्या खड्ड्या पाशी आले होते .  आयुष्यमाने पिशवीतून एक काळा बी काढला व त्या खड्ड्यामध्ये टाकला , ज्यावेळी बी खड्ड्यांमध्ये पडला त्यावेळी तो जमिनीत रुतायला लागला व त्यातून छोटासा काळा अंकुर बाहेर पडला.....

    त्याच वेळी भरत व आयुष्यमान दोघांच्याही कानावरती कुणीतरी हाक मारत असल्यासारखा आवाज पडला . त्यांनी मागे वळून पाहिले दुरून एक घोडेस्वार त्यांच्याकडे येत होता . अंधार पडायला आला असल्याने त्याचा चेहरा नीट दिसत नव्हता , पण ज्यावेळी तो जवळ आला त्यावेळी आयुष्यमानला एक सुखद धक्काच बसला . तो घोडेस्वार नव्हता ,  ती एक स्त्री होती .  ती तीच होती जिच्याकडून आयुष्यमानाने त्या बिया घेतल्या होत्या . जिच्या आठवणीत तो रमला होता.....

   महाराणी शकुंतला छोट्या राजकुमारांना घेऊन घोड्यावरती स्वार होऊन निघाल्या खऱ्या , पण दोन-तीन कोसाच्या अंतरावर जाताच घनदाट अंधार पडला . जंगली श्वापदांचा ओरडण्याचा आवाज येऊ लागला .  इतक्या दिवस जंगलात राहत असूनही त्यांना त्या आवाजाची अजिबात सवय झाली नव्हती . त्या जरा घाबरल्याच . इतका घनदाट अंधार पडला होता की हात भरा वरचे डोळ्याने नीट दिसत नव्हते आणि यात भर म्हणून त्यांच्याकडे मशाल ही नव्हती . नाईलाजाने त्यांनी माघारी जायचं ठरवलं....

    माघारी जाण्यासाठी त्या वळल्या खऱ्या पण त्यांच्या मागे सात-आठ घोडेस्वार उभे होते . त्यांनी त्यांची तोंड काळ्या कापडाने झाकली होती .  त्यांच्या खांद्यावरती धनुष्यबान व कमरेला तलवार लटकत होती .  ते घोडेस्वार कोण होते ? त्यांना काय होतं ? याची जराही कल्पना महाराणींना नव्हती . मुळात त्यांना लढाई अजिबात येत नव्हती पण तरीही त्यांनी बरोबर घेतलेल्या तलवारीला हात घातला . त्याचवेळी मागून कुणीतरी त्यांच्या तोंडावरती कापड टाकले , त्याला कसला तरी विचित्र गंध होता हळूहळू त्यांना जाणीव झाली त्यांच्या सर्व संवेदना बधीर होत आहेत . शेवटी त्या बेशुद्ध झाल्या व घोड्यावरून खाली पडल्या......

   काळी भिंत पडण्यासाठी निघालेल्या पहिल्या शिपाई तुकडीचा प्रमुख अभिजीत अद्वैत आजूबाजूच्या परिसराचा फेरफटका मारण्यासाठी त्याच्या विश्वासू सैनिकांबरोबर गेला होता , इकडे सैनिक शेकोटी पेटवून बसले होते . ज्यावेळी तो परतून माघारी आला , त्यावेळी त्याला जे दृष्य दिसले ते त्याच्या हृदयाचा थरकाप उडवणारं होतं . त्याच्या सर्व सैनिकांची हत्या झाली होती .  आता शेकोटीभोवती  पंधरा मनुष्य बसले होते . मारलेल्या सैनिकांची माणूस त्यांच्या हातात होते ते चवीने ते मांस खात होते व मधुनच ओरडत होते
 " सिरकोडा इसाड कोते ......
    अभिजीत अद्वैत त्याच्या विश्वासू सैनिकांबरोबर तिथून पळाला . तो कितीही शूर आणि वीर असला तरीही मूर्ख नव्हता. त्याचे दीडशे ते दोनशे सैनिक फारच पराक्रमी होते . त्याच्या तुकडीला त्याच्या राज्यातील सर्वात उच्च बहुमान मिळाला होता .  त्याची तुकडीही कधीही न हारनारी होती ..... आणि त्या संपूर्ण तुकडीच्या विनाश फक्त पंधरा लोकांनी केला होता ........

 कौशिक त्याच्या कक्षामध्ये विचारमग्न परिस्थितीत बसला होता .  जे काही झालं होतं ते नक्कीच विचार करायला लावणारं होतं . जो कोणी इसम होता आणि ज्याने ते बाण मारले होते , त्याचा नक्की हेतू काय होता हे कळणं आवश्यक होतं . त्यामागे त्याचा सर्वात विश्वासू हेर भार्गव गेला होता . तो कोणत्याही क्षणी परतून त्या इसमाला बरोबर घेऊन येणारच  याची त्याला खात्री होती. मनातल्या मनात तो लवकर येऊ दे अशी कौशिक प्रार्थना करीत होता , आणि दारात भार्गव आला . त्याने आल्या आल्या कौशिकची क्षमायाचना केली .  भार्गव त्या मनुष्याला पकडू शकला नव्हता . पण त्याला एक कळाले होते , ते म्हणजे तो मनुष्य मारुत राजाच्या आज्ञेवरुन हे सारं करत होता.....

Monday 25 March 2019

प्रलय-०४

प्रलय-०४

       ते चार घोडेस्वार होते . त्यांच्या पोषाखावरून ते योद्धा असावेत असे वाटत होते .  काळ्या भिंतीकडे निघाले होते .
" चैत्या तुला वाटत नाही का आपला आयुष्यमान जेव्हापासून त्या मुलीकडून या बिया घेऊन आलाय तेव्हापासून जरा शांत शांतच आहे ..... " भरत हा आयुष्यमानचा मित्र आणि साथीदार होता . चैतन्य , कनिष्क , भरत आणि आयुष्यमान या चौघांनी शपथ घेतली होती .  आणि या चौघांची निवड झाली होती .
" होय रे लगा भरत्या , मला पण तसंच वाटतंय , कन्या तुला काय वाटतंय रे ....?  आयुष्मान आपला शांत शांत झालाय जणू हरवलाय कुणाच्या तरी आठवणीत......
" आयुष्मान आहेत ते , आठवणीत रामतील किंवा ज्यांची आठवण येते त्यांच्याकडे जातील , त्यांना कोण अडवणार...... " कनिष्क ही आयुष्यमान ला चिडवत म्हणाला .
     आयुष्मान शांत होता. तो खरंच तिच्या आठवणीत रमला होता .  तिचं ते रूप , तिचं ते दिसणं , तिचं ते हसणं , तिचं बोलणं ,  तिचं ते चालणं ,  सारं काही त्यानं त्याच्या डोळ्यांमध्ये साठवलं होतं . तो तिला पुन्हा पुन्हा आठवत होता . तो तिला पुन्हा पुन्हा पाहत होता .
" आता कशाला मित्रांची गरज लागते ..? आता आम्हाला विसरणार हो तुम्ही...? " पुन्हा एकदा चैत्या त्याला म्हणाला...
" चला रे गुपचूप , समोर भिंत दिसायला लागलीय , आता आपल्याला सुटे व्हावे लागणार आहे , दोघांना दक्षिणेकडे दोघांना उत्तरेकडे जावे लागणार आहे.....
" ते करु हो आपलं रोजच काम आहे , पण आम्ही काय म्हणतोय.....भरत म्हणाला
" कुणीही काहीही म्हणू नका , कामाच बघा आपल्या , ते महत्त्वाचं..... असं म्हणत आयुष्यमान ने घोड्याला टाच  दिली व तो सगळ्यांच्या पुढे निघाला.....
तिघांनी बरोबर ओळखलं . तेही त्याच्या पाठोपाठ निघाले .  म्हणजे आयुष्यमानला ती खरेच आवडली होती .

   ते चौघेही काळ्या भिंतीपाशी पोहोचले . कितीतरी पिढ्यांपासून ती काळी भिंत त्याठिकाणी तशीच होती .  तिच्याबाबत कितीतरी आख्यायिका सांगितल्या जात होत्या . त्यातल्या किती खरे किती खोटे हेच या भिंतीलाच माहित.... ती भिंत काळ्याकुट्ट पाषाणापासून बांधली होती . 10 ते 12 फूट उंच आणि पाच-सहा फूट रुंद अशी ती भिंत होती .  रक्षक राज्याच्या पश्चिम सीमेवरती ती भिंत बांधलेली होती .  उत्तरेपासून दक्षिणेकडे संपूर्ण भूखंडावर  5000 मैलाहून अधिक लांब असलेली ती भिंत उभी होती .......
" त्याठिकाणी गोल खड्डा दिसतोय का....? " आयुष्यमानने भिंतीस समोर एक दहा फूट अंतरावर असलेल्या छोट्या गोल  खड्ड्याकडे बोट करत सगळ्यांना विचारले....
" असेच  खड्डे प्रत्येक अर्ध्या मैलावरती उत्तरेकडे आणि दक्षिणेकडे आहेत..... त्या प्रत्येक खड्ड्यामध्ये हा एक एक बी टाकायचा आहे.... पहिल्या खड्ड्यामध्ये काळा बी टाकल्या नंतर दुसरा खड्ड्यांमध्ये पांढरा , त्याच्यापुढे काळा असे बी टाकत जायचे आहेत.....
" मी आणि कन्या दक्षिणेकडे जातो,  तू भरत्याला घेऊन उत्तरेकडे जा..... चैत्या म्हणाला
" चैत्या गडबड करू नकोस ,  इतकी साधी सोपी गोष्ट नाही ही  ,हजारो मैलांचा प्रवास आहे .  बऱ्याच ठिकाणी तुम्हाला मानवी वस्ती भेटणार नाही.  खाण्याची पिण्याची सुद्धा व्यवस्था नसेल . त्यामुळे सगळी तयारी करूनच निघूया.....

      ज्या गुप्त भुयारी मार्गाने सरोज अन्वी देवव्रत आणि भिल्लव निघाले होते . तो गुप्त मार्ग शस्त्रागारात निघत होता .
" काय म्हणतोयस हा मार्ग शस्त्रागारात जातो , अरे त्या ठिकाणी तर  चोवीस तास पहारा असतो..... "
" मी त्या पाहऱ्याची व्यवस्था केली आहे सरोज ,"
     त्याने त्याच्या खिशातून वाळूचे काळमापक यंत्र काढले.  त्यातील एका बाजूची वाळू संपूर्णपणे रिकाम्या होण्याच्या बेतात आली होती.  अजून काही काळ गेल्यानंतर एका बाजूची वाळू पूर्ण रिकामी झाली . त्यावेळी एका मोठ्या स्फोटाचा आवाज ऐकू आला....
" हे काय होतं ?  भिल्लवकाका तुम्ही महालामध्ये स्फोट घडवून आणला की काय.....? " अन्वी
" त्याशिवाय सैनिकांचे लक्ष विचलित होणार नाही ,  नाहीतर आपल्याला प्रत्येक सैनिकाला सामोरं जावं लागलं असतं....... भिल्लव
" काही काळ थांबू ,  मग आपण शास्त्रागारातून बाहेर पडू , शस्त्रागारातून पुढे गेल्यानंतर थोड्याच अंतरावर तळघराला जाणारा रस्ता आहे , त्या तळघरातच प्रधानजी असतील......
   सैनिकांच्या पावलांचा आवाज त्यांना जाणवला , हळूहळू कमी झाला . सैनिक निघून गेल्यानंतर,  काहीवेळ थांबून ते शास्त्रागारात आले .  शस्त्रागारात एकही सैनिक नव्हता . भिल्लवाने दोन तलवारी घेतल्या . सरोज ने तिच्यासाठी दोन छोटे खंजीर व  एक तलवार घेतली .  अन्वी नेही एक तलवार घेतली .  देवव्रताने एक तलवार व धनुष्यबान घेतला .        शस्त्रागाराच्या दारातून बाहेर पडल्यानंतर दोन्ही बाजूला दोन रस्ते जात होते . उजव्या बाजूचा रस्ता वर महालाकडे तर डाव्या बाजूचा रस्ता तळघराकडे जात होता . डाव्या बाजूच्या रस्त्याच्या शेवटला चार शिपाई तैनात होते .
   " कोण म्हणत होतं मी सैनिकाचा निकाल लावला आहे......? देवव्रत भिल्लवाला चिडवत म्हणाला
    देवव्रताने पुढे होत एकापाठोपाठ एक तीन बाण चालवत तीन शिपायाच्या कंठाचा वेध घेतला ,  तर सरोज ने एक खंजीर फेकून एका सैनिकाला घायल केले . पण तो सैनिक तळघराचे दार उघडुन तळघरात पळत गेला . त्याच्यापाठोपाठ हे चौघेही पळाले पण त्या तळघराच्या दारापर्यंत  पोहोचतायेत त्या अगोदरच  मागुन  महाला कडून येणाऱ्या वाटेने पाच-सहा शिपायांचा घोळका चालत येत होता . त्या घोळक्याने या चौघांना व पडलेल्या तीन शिपायांच्या प्रेतांना पाहिले , तो घोळका त्वेषाने यांच्यावर ती चालून आला . चौघेही पटपट त्या तळघरात गेले . पण मघाशी तळघरात गेलेल्या शिपायाने तळघरातील सैनिकांना एकत्र केले होते .  त्या ठिकाणी पंधरा ते वीस सैनिक व वरून पाच ते सहा सैनिक या चौघांच्या मागावर होते . काही झालं तरी आता या चौघांचं काम अवघड होतं चौघे विरुद्ध पंचवीस असा हा मुकाबला होता......

           जलधि राज्याच्या संशोधन शाळेत सर्व मंत्रीगण जमले होते  . कौशिक त्यांना काही सांगत होता .  तो गुप्तहेर ज्याने काही काळापूर्वी राज्यसभेत रक्ताचे शिंतोडे उडवले होते ,  अजूनही " सिरकोडा इसाड कोते " असं बडबडतच होता . पण आता त्याचा आवाज मंदावला होता . त्याला तेथील पलंगावरती झोपवले होते व त्याचे हात पाय बांधले होते .

 " महाराज काळ्या भिंतीपलीकडील आपल्या मोहिमा कितीतरी वर्षापासून चालू आहेत , पण हा असा अनुभव पहिल्यांदाच आला आहे . काळ्या भिंती पलीकडील महालाच्या परिसरात असलेली दुर्मिळ खनिजे आपण वेळोवेळी आणत असतो ; पण इतक्या वर्षात हा असा अनुभव आपल्याला कधीच आलेला नाही . आपल्याला हे सारं कळालंही नसतं जर योगायोगाने बाटी या फिरत्या जमातीचा कबिला त्या ठिकाणी थांबला नसता... .

      कौशिकने त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या एका इसमाकडे बोट करून सांगितले की
 " हे  बाटी जमातीच्या त्या कबिल्याचे नायक आहेत . त्यांनीच आपल्या हेराला पकडलं व ज्यावेळी आपण दुसरे हेर पाठवले होते त्यावेळी त्यांच्या हाती सुपूर्द केलं . पण त्यांच्यामार्फत आपल्याला बऱ्याच बहुमूल्य गोष्टी कळल्या आहेत महाराज.......

" हे फार विलक्षण आहे कौशिक , इतक्या वर्षात आपल्याला त्या काळ्या भिंतीपलीकडे कोणताही अनुभव आलेला नाही . अचानक हे कसं उद्भवलं असावं ,  यामागे नक्कीच काहीतरी मोठं षडयंत्र असण्याची संभाव्यता नाकारता येत नाही , तुम्हाला कोणत्या गोष्टी कळल्या आहेत...

" सर बाटी ही जमात काळी भिंत बांधण्याच्या अगोदर पासून काळ्या भिंतीपलीकडे राहत आलेली आहे , काळी भिंत बांधल्यानंतरही ज्या काही घटना घडल्या त्या घटना घडत असतानाही , त्या ठिकाणीच राहत होती . असं म्हणतात काळ्या  महालाच्या पहिल्या सम्राटाने बाटी जमातीला अभय दिलं होतं . पण जेव्हा पहीला सम्राटाचा अस्त झाला व काळी भिंत बांधली गेली , त्यानंतरच्या काळात देखीलही बाटी जमात तिथेच राहत आली आहे .  पण आता असे काहीतरी घडत आहे की बाटी जमात स्वतः स्थलांतर करत आहे . त्यांचे बरेच कबिले भिंतीला पार करून रक्षक राज्यात किंवा जलधि राज्यात येताना दिसत आहेत.......

" या सगळ्याचं कारण काय असावं कौशिक.....?
" या सगळ्याचं कारण ,  महाराज एकच आहे ,  ते म्हणजे ' सिरकोडा इसाड कोते '
" म्हणजे नक्की काय म्हणत आहात ....?
" महाराज आपल्या या हेरासारखे अनेक जण त्या काळ्या भिंतीपलीकडे आहेत....
" पण हा तर आपल्या नियंत्रणात वाटतो आहे .....?
" महाराज तो आपल्या नाही या बासरीच्या नियंत्रणात आहे , ज्यावेळी तो तुरुंग तोडून बाहेर पडला त्यावेळी बाटी जमातीच्या लोकांनी बासरी वाजवायला सुरुवात केली होती   ते बासरीचे स्वर कानी पडताच तो एका जागी बसून बडबडत बसला......
" अजूनही तिथे कोपऱ्यात बसलेल्या  बाटी जमातीचे लोक बासरी वाजवत आहेत म्हणून हा आपला हेर शांत आहे अन्यथा....
" अन्यथा काय होऊ शकतं कौशिक.......?
" हे होऊ शकतं " असं म्हणत संशोधन शाळेच्या दारावरती उभ्या असलेल्या एका इसमाने त्या दोन बाटी जमातीच्या लोकांना एका बाणात मारून टाकलं व त्या बाटी जमातीच्या नायकावरती  ही  बाण सोडला.......

     काळी भिंत पाडण्याची आज्ञा दिल्यानंतर सर्वात पहिल्यांदा जी तुकडी काळ्या भिंतीकडे चालू लागली होती त्या तुकडीचा प्रमुख होता अद्वैत . अद्वैत हा रक्षक राज्यात असलेल्या  नामांकित योद्ध्यांपैकी एक योद्धा होता . काळी भिंत बांधल्यानंतर  प्रत्येक राज्यातील योद्ध्यांना काळ्या भिंतीपलीकडे जाऊन  आपली तयारी सिद्ध करण्याची नवीन पद्धत चालू झाली . जो कोणी काळ्या भिंतीपलीकडे जाऊन कोणतीही फार मोठी दुखापत न होता परत येत असे त्याला अभिजीत ही उपाधी बहाल केली जात असे . अद्वैत हाही एक अभिजीत होता . तो बऱ्याच वेळा काळ्या भिंतीपलीकडे जाऊन आला होता . काळ्या भिंतीपलीकडे आलेल्या अनुभवाचे व्रण त्याच्या संपूर्ण शरीरावरती होते . आता तोच अद्वैत काळी भिंत पाडण्यासाठी निघाला होता . काळ्या भिंतीपासून काही मैलांच्या अंतरावरती त्यांची तुकडी विश्रांतीसाठी थांबले होती .
             मध्यभागी पेटवलेल्या शेकोटीभोवती दिवसभर प्रवास करून थकलेले सैनिक , जिव्हाळ्याच्या गप्पागोष्टी करत बसले होते . आजूबाजूच्या परिसरात स्मशानासारखी किर्रररर शांतता होती . रात्र असूनही रातकिड्यांच्या ओरडण्याचा आवाज अजिबात येत नव्हता .

     आणि अचानक चहूबाजूने मोठमोठ्याने
  " सिरकोडा इसाड कोते " असं ओरडल्याचा आवाज येऊ लागला
 

Sunday 24 March 2019

प्रलय-०३

प्रलय -०३

     जलधि राज्याचे अधिपती राज्यांची निर्मिती झाल्यापासून कैरव राजे होते  . सध्या अकरावे कैरव महाराज राज्य करत होते. महाराज वृद्ध होते . शुभ्र पांढऱ्या केसांवरती सोनेरी मुकुट होता. वृद्धत्व आलेलं असूनही चेहऱ्यावरती एकही सुरकुती नव्हती .  राज्याला दोन बाजूंनी समुद्राच्या सीमा असल्यामुळे त्याचं नाव जलधि पडलं होतं. जलधि हे राज्य इतर सर्व राज्यांपेक्षा भरभराटीचे राज्य होतं . असं म्हणतात जलधि मधील भिकारी हे बाकीच्या जगातील श्रीमंतपेक्षा श्रीमंत असतात. त्याच जलधि राज्याच्या राजमहालात आज ही राज्य सभा भरली होती . राजमहाल किती आलिशान होता .  त्या ठिकाणी सिंहासने नव्हती तर कमलासने होते .  शुभ्र पांढऱ्या संगमरवरी दगडापासून बनवलेल्या कमळाच्या आकाराच्या आसना वरती कैरव महाराज आसनस्थ झाले होते.  बाकीच्या मंत्रीगणांसाठी ही कमळाची आसने होती  . ती राज्यसभा अर्धवर्तुळाकार होती . वर्तुळाच्या केंद्रस्थानी महाराज होते व वर्तुळाच्या परिघावर ती मंत्रीगणांसाठी आसने होती.  महाराजांच्या बरोबर समोरून राज्यसभेत येण्याचा मार्ग होता . आसनांच्या आजूबाजूला इतर प्रजाजनांसाठी बसण्याची सुविधा केली होती. आज ही राज्यसभा काठोकाठ गच्च भरली होती.  विषयही तितकाच गंभीर होता. हेर पथकाचे प्रमुख कौशिक समोर येऊन महाराजांना सांगत होते.....
   " महाराज सर्वांनाच ज्ञात आहे पश्चिमेच्या रक्षक राज्याची तेव्हाच अधोगती सुरू झाली जेव्हा महाराज सत्यवर्मांनी ते अघोर कर्म केले ,पण आता त्यांचा पुत्र महाराज विक्रमांनी जे काही चालवले आहे त्याची फळे आपल्यालासुद्धा भोगावी लागणार आहेत. महाराज विक्रमांनी काळी भिंत पाडण्याचे आदेश दिले आहेत.......

कौशिका च्या या वाक्यासरशी संपूर्ण राज्यसभेत कुजबूज सुरू झाली . कौशिक पुढे बोलू लागला....
 " त्यांच्या काही मंत्रीगणांनी त्यांच्या या निर्णयाचा विरोध केला , तर महाराजांनी त्यांना  बंदी बनवून फाशी देण्याची शिक्षा सुनावली आहे  .  यामध्ये त्यांच्या प्रधानजींचा आणि समावेश आहे . रक्षक राज्याचे सैन्य काळ्या भिंतीकडे रवाना झालेले आहे .  कोणत्याही दिवशी ते काळ्या भिंतीपाशी पोहोचून ती भिंत पाडण्याची प्रक्रिया सुरू करेल......

या वाक्यानंतर पुन्हा एकदा कुजबुज सुरू झाली . मधूनच आवाज येऊ लागले.....
" रक्षक राज्यावर स्वारी करा.... "रक्षक राज्य ताब्यात घ्या...... विक्रमांचा वध करा.... रक्षक राज्य ताब्यात घ्या......

तेव्हा महाराज कैरव म्हणाले , " शांत व्हा , कोणताही निर्णय विचार न करता घेतल्यास त्याची फळे आपल्याला भोगावी लागू शकतात .......काळ्या भिंतीच्या अनेक गोष्टी आपण ऐकल्या आहेत  ,पण त्या फक्त गोष्टी म्हणूनच ऐकल्या आहेत . त्याची शहानिशा करण्यासाठी कौशिक यांनी आपले काही निष्णात हेर काळ्या भिंतीपलीकडे पाठवले होते . कौशिक त्यांची काही खबर आली आहे का....?

" होय महाराज आपण एकूण चार हेर काळ्या भिंतीपलीकडे पाठवले होते . त्यातील फक्त एकालाच माघारी आणण्यात यश आलं आहे .
त्याच वेळी सभेतून आश्चर्यकारक उद्गार बाहेर पडले.
   "  तुमच्या संमतीने त्या हेराला तुमच्या समोर आणू इच्छितो.....

" संमती आहे कौशिक , लवकरात लवकर त्या हेराला राज्यसभेत उपस्थित करा....
" महाराज तो हेर बोलण्याच्या परिस्थितीत नव्हता ,  वेड्यासारखा  काहीही बोलत होता . आपल्याला  राजवैद्यांनी त्याला औषधी देऊन निद्रिस्त केलं आहे .....

कौशिक आणि त्यांच्या सैनिकाला त्या हेराला आणण्याची आज्ञा दिली . एक चालता-फिरता तुरुंग , एका   खोली एवढा तो तुरुंग  मोठा होता . त्या तुरुंगामध्ये मध्ये दोन संपूर्ण वाढ झालेले मोठे वाघ डरकाळ्या फोडत इकडे तिकडे फिरत होते . त्या तुरंग्याच्या मधोमध एका छोट्याश्या पिंजरात त्या हेराला साखळदंडांनी बांधून ठेवले होते . तो तुरुंग दहा हट्ट्याकट्ट्या मल्लांनी ओढत राज्यसभेत आणला .
"  कौशिक हे काय चालवलय,  आपल्याच हेरास पिंजऱ्यात का म्हणून कोंडलं आहे ....? आणि ते वाघ कशासाठी आणले आहेत  ? आपलाच माणूस  वाघाच्या भक्ष्यस्थानी द्यायची हिंमत तरी कशी झाली तुझी ,  मोकळं करा त्याला आत्ताच्या आत्ता.....!
कैरव महाराज रागा रागाने बोलले..
" महाराजांनी गैरसमज करून घेऊ नये . आपल्या सर्वांच्या संरक्षणासाठीच त्याला पिंजऱ्यामध्ये कोंडलं आहे महाराज......
" म्हणजे काय म्हणायचं आहे नक्की तुम्हाला.....?
" महाराज मी सांगत बसायला जास्त वेळ घालवत नाही तुम्ही स्वतः पहा........
कौशिकाने एका सैनिकाला काहीतरी सूचना दिली . तो सैनिक पळत जाऊन त्या तुरुंगाच्या वर चढला .  तुरुंगाच्या वर  बरोबर मध्यभागी जात त्याने एक पाण्याची बादली घेतली व त्या हेरावरती मोकळी केली .
तो जागा झाला.  तो सामान्य माणसा सारखा दिसत होता .  पण जेव्हा त्याला शुद्ध आली तो ओरडू लागला....
" सिरकोडा इसाड कोते ......
" सिरकोडा इसाड कोते ........
तो मोठ्या आवाजात ओरडत होता .  ओरडतच त्याने त्याच्या पिंजऱ्याचे गज त्याच्या हाताने सहजपणे उपटून बाजूला फेकायला सुरुवात केली . तो पिंज-यातून बाहेर आल्यावर डरकाळ्या फोडणारे वाघ  त्याच्यावरती धावून गेले . तो हेर चपळतेने त्या वाघाचा हल्ला चुकवत होता . जेव्हा एका वाघाने त्याचा पाय पकडून त्याला ओढून खाली पडले त्याचवेळी दुसरा वाघाने त्याच्या दंडाचा लचका तोडला . संपूर्ण सभेतून विविध आश्चर्यकारक उद्गार येत होते .  त्याच्या दंडाचा मांसाचा तुकडा निघाला होता तरी त्याच्या चेहऱ्यावर वेदनेचा एकही अंश दिसत नव्हता   .  उलट तो जोरजोराने ओरडत होता ,

" सिरकोडा इसाड कोते ......, सिरकोडा इसाड कोते ......सिरकोडा इसाड कोते ......

ज्या वाघाने त्याच्या दंडाचा लचका तोडला होता त्या वाघाचे पुढचे दोन पाय धरून , गोल गोल फिरवत त्याला तुरुंगाच्या सळ्यावरती आपटले . जोरात आपटल्यामुळे त्या वाघाच्या मांसाचे शितोडे संपूर्ण राज्यसभेत उडाले .  त्याबरोबर सभेतून भयकारक उद्गार निघाले . दुसरा वाघ घाबरून एका कोपर्‍यात जाऊन लहान आवाजात गुरगुरत मुडपून बसला . तो हेर अजूनही
" सिरकोडा इसाड कोते ......
सिरकोडा इसाड कोते ......"
असं ओरडतच होता . त्या बसलेल्या वाघाकडे जात त्या वाघाचे मस्तक त्याने आपल्या हाताने सहज धडावेगळे केले.  आता तो मुख्य तुरुंगाच्या सळ्या तोडायला बघत होता.   राज्यसभेतील लोकांमध्ये भीतीची लहर उसळली .  लोक घाबरून पळू लागले . त्या हेराने मुख्य तुरुंगाच्या सळ्या तोडल्या व बाहेर पडून महाराज कैरवाकडे  जाउ लागला . त्याबरोबर संपूर्ण राज्यसभा घाबरून पांगू लागली . सैनिक महाराज कैरवांकडे धावू लागले . पण काही अंतरावर जाताच तो हेर जागेला थांबला आणि पुन्हा मोठमोठ्या आवाजात ओरडू लागला
" सिरकोडा इसाड कोते ......
" सिरकोडा इसाड कोते ......

" ही राज्यसभा आत्ताच भंग होत आहे...."  महाराज कैरवांनी मोठ्या आवाजात आदेश दिला  " कौशिक त्या हेराला आपल्या संशोधन शाळेत घेऊन या .    बाकीच्या मंत्रिमंडळींनीही   त्या ठिकाणी उपस्थित रहावे . आपल्याला लवकरच काही ना काही निर्णय घ्यावा लागणार आहे . रक्षक राज्यातील आपल्या हेरांना व सैनिक पथकाला सूचना पाठवा , युवराजांना घेऊन ताबडतोब जलद इकडे निघायला सांगा...... ....


      सरोज व भिल्लव सैनिकांच्या वेशात गुप्त भुयारी मार्गाने प्रधानजींची सुटका करायला तळघरातील तुंरूगा कडे निघाले होते .
   " भिल्लवा आपण त्या अधिरताला  मारून  टाकायला हवं होतं ,  तो सुटला तर....
  " सरोज तू घाबरू नको आतापर्यंत माझ्याकडून कोणीही सुटले नाही ,
 " काय बोलतो आहेस , ज्यावेळी पहिल्यांदा  तू मला आणत होता ,  त्यावेळी मी तीनदा सुटले होते ,
" त्यावेळी मी नवखा होतो , आता माझ्याकडे अनेक क्लुप्त्या आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यावेळी मी तुझ्यावरती मोहित झालो होतो.....
  दोघेही भुयारी मार्गातून जात होते . सात ते साडेसात फूट व्यासाचा वर्तुळाकार भुयारी मार्ग होता तो . तो नेहमीच्या वापरातील नसल्यामुळे ना तिथे दिवाबत्तीची सोय होती ,  ना चालायला  येत होते . दोघे धडपडत पुढे सरत होते . भिल्लवाच्या हातात मशाल होती .  त्या मशालीच्या उजेडात ते दोघे पुढे सरकत होते  .

  भुयार पुढे सरकत होते . एके ठिकाणी भुयाराला दोन्ही बाजूनी अजून दोन मार्ग येऊन जुळत होते  . त्यांच्या उजव्या बाजूच्या मार्गावरून त्यांना कुजबुज ऐकू येत होती आणि मशालीचा उजेडही येत होता .
सरोजने भिल्लावाच्या डोक्यात जोरात मारले " तू तर म्हणाला होतास कि हा मार्ग कुणालाही माहित नाही ,  मग ते कोण आहेत पहाऱ्याचे सैनिक......?
दोघेही सावधानतेचा पवित्रा घेऊन हल्ला करण्याच्या तयारीत उभे राहिले . भिल्लव एका बाजूला व सरोज दुसऱ्या बाजूला उभी होती .  भिल्लवाच्या हातातील मशाल त्याने विजवून टाकली होती .  सरोजने हातात तेथीलच एक दगड उचलला होता . त्यांची कुजबुज ऐकू येत होती .
" अन्वी तुला नक्की खात्री आहे ना हाच तो भुयारी मार्ग आहे ते....
" होय देवव्रत मी बाबांबरोबर बऱ्याच वेळा या ठिकाणी आली आहे.....
" अग सरोजज या तर राजकुमारी अन्वी आहेत , टाक तो दगड खाली.....
 भिल्लव समोर जात म्हणाला ,
" राजकुमारी अन्वी तुम्ही या ठिकाणी काय करत आहात तुमच्या साठी हे बरोबर नाही.....
अचानक समोर आलेल्या भिल्लवला पाहून राजकुमार देवव्रताने तलवार काढून भिल्लवावरती उगारली ...
" देवव्रता ते भिल्लवकाका  आहेत हेरपथकाचे प्रमुख.
" तुम्हाला किती वेळा सांगितलं आहे मला राजकुमारी म्हणत जाऊ नका मला म्हटलेलं आवडत नाही....
" पण तुम्ही या ठिकाणी काय करत आहात...
राजकुमारी बोलण्या अगोदरच देवव्रत म्हणाला
" आम्ही महाराज विश्वकर्मा यांना सोडवायला जात आहोत.....
" युवराज देवव्रत प्रधानजींचा महाराज विश्वकर्मा असा उल्लेख देशद्रोह आहे . सर्वांदेखत असा उल्लेख करत जाऊ नका अन्यथा तुम्हाला ही त्याच तुरुंगात राहावे लागेल .
"  राजकुमारी आपण हे संकट पत्करू नका , तुम्ही जा .  मी व सरोज प्रधानजींना सोडवायला जात आहोत आणि युवराज देवव्रतांना ताबडतोब जलधि राज्यात परतण्याचे आदेश आहेत .
" युवराजाला कोणाकडूनही आदेश घेण्याची गरज नाही
" युवराज आपले पिताश्री महाराज कैरव यांनी हा आदेश दिला आहे . वर नगरांमध्ये तुमचा शोध सर्वत्र सुरू आहे ....
" परंतु महाराज विश्वकर्मा यांना याठिकाणी सोडून जाणं युवराजाला शोभणारं नाही..... देवव्रत ठाम होता
" भिल्लव काका आम्ही ठरवलेलं आहे , पिताश्रींची सुटका करून त्यांना घेऊन आम्ही जलधिराज्यामध्ये जाणार आहोत.....
" पोरगी हट्टी दिसते , येऊ दे तिला पण बरोबर , उशीर करायला नको आपण जाऊया पटपट.....
सरोज विझलेली मशाल पेटवून म्हणाली...
शेवटी चौघांचा ताफा त्या तळघरातील तुंरूगाकडे निघाला....
 
  उत्तरेच्या जंगलात महाराज सत्यवर्मा व महाराणी शकुंतला अजूनही राहत होते .  ठराविक विश्वासू लोकांनाच त्यांचा हा ठिकाणा माहीत होता . त्या छोट्याशा पर्णकुटीत ते दोघे व त्यांच्या साठी लागणारी दुभती जनावरे होती . त्या छोट्याशा पर्णकुटी मागे त्यांना लागणारी कंदमुळे होते . बाकीचा ऐवज वेळोवेळी नगरातून पाठवला जात असे . 
रोज रात्री जेवणानंतर महाराज सत्यवर्मा ध्यान-धारणा करीत असत  . आजही ते ध्यानधारणेसाठी मृगचर्मा वर बसलेले असताना महाराणी शकुंतलेला ते सहन झाले नाही .
   " दुपारी नगरातून दूत आला होता .  विक्रमाने काळी भिंत पाडायची आज्ञा दिली आहे . विश्वकर्म्यालाही तुरुंगात टाकून फाशीची शिक्षा सुनावली आहे . तुम्ही किती काळ असेच गप्प बसणार आहात ? तुम्ही काहीतरी करायलाच हवं ...! राज्य व राज्याची जबाबदारी टाकून ,  तुमचं कर्तव्य सोडून  , तपश्चर्या केली तरीही काही प्राप्त होणार नाही . कारण जो आपले कर्तव्य पूर्ण करत नाही त्याला ईश्वर सुद्धा प्रसन्न होत नाही .....
    महाराज  सत्यवर्मांनी डोळे देखील उघडले नाहीत .  त्याची चीड येऊन महाराणी शकुंतला त्या पर्णकुटीतून बाहेर पडल्या , बरोबर त्यांनी छोट्या राजकुमारांनाही घेतले . हा राजकुमार सत्यवर्मा व शकुंतला यांचा दुसरा मुलगा होता .   विक्रम हा शकुंतला व '_त्याचा_' पुत्र होता .  हे फक्त महाराणी शकुंतलेला माहित होते .  बाकी सर्व जनता असेच समजत होते की महाराज विक्रम हे  सत्यवर्माचेच पुत्र आहेत . पाठीवरती खऱ्या राजकुमारांना घेऊन घोड्यावरती बसून त्या नगराच्या दिशेने निघाल्या .....

Saturday 23 March 2019

प्रलय-०२

प्रलय-०२


       भिल्लवाच्या भोवती वर्तुळाकार करून ते सैनिक भाला घेऊन उभे होते  . भिल्लव आता पूर्णपणे त्यांच्या ताब्यात सापडला होता .  त्या सैनिक पथकाचा प्रमुख ,  अधीरत होता , तो म्हणाला "  भिल्वावा आता तुझा खेळ संपला ,  उद्या सूर्योदयाबरोबर प्रधानजी सोबत तुलाही फाशी दिली जाईल......

" काय प्रधानजीला फाशी दिली जाणार आहे.....?
" होय आणि त्यांच्याबरोबर तुलाही तुम्ही दोघांनी देशद्रोहाचा मोठा गुन्हा केला आहे.....
" अरे अधिरथ तुझ्या डोळ्यांवरती पट्टी बांधली आहे का...?  तुला माहित नाही का काळी भिंत पडली तर काय होईल ....? अरे प्रधानजी खरच राज्याचे सेवक आहेत आणि तू ही हो.....
" राज्याचे सेवक राजाच्या आज्ञेबाहेर नसतात . राजाच्या आज्ञा विरुद्ध जर कोणी वागत असेल तर तो देशद्रोही असतो......
" अधिरथ राजाचे काम आहे राज्याची सेवा करणे जर राजाचा निर्णय चुकीचा असेल तर त्या निर्णयाची साथ न देता त्या निर्णयाच्या विरुद्ध जाणं हेच राज्याच्या खऱ्या सेवकाचा काम असतं.......
" तू मला देशसेवेचा धडा शिकवू नकोस भिल्लवा . मला माहितीये काय करायचं आणि काय नाही ते , गुमान तुझी तलवार आमच्या स्वाधीन करून गपचूप आमच्याबरोबर चल.....
" ते शक्य नाही.....
" तू माझ्या विरुद्ध लढणार ,  फुकट मरशील भिल्लवा , गुमान चला आमच्याबरोबर......
     भिल्लवाने म्यानातून त्याची तलवार काढली त्याबरोबर त्याच्या भोवती उभे असलेले आठ ही सैनिक भाले सरसावून पुढे झाले . त्या सैनिकांना बाजूला सारत अधिरथ पुढे आला .

" ये रा* बाहेर हो गपचूप , तू एका देशद्रोह्याला तुझ्या वेश्यालयात लपवून ठेवले ,  नाही तुझा धंदा बंद केला तर नावाचा अधिरत नाही
" जा रे जा तुझ्यासारखे छप्पन्न येऊन गेले या सरोजचा एक केसही कोण वाकड करू शकले नाही अजून.....
" आता सारे काही होईल पण पहिल्यांदा भिल्लव मग बाकीचे , हो बाजूला गपचुप.....
सरोज बाजूला सरली  . त्याबरोबर अधिरथ  ने भिल्लवावर तलवारीचा वार केला . त्यांचे द्वंद्व चालू झाले .  अधिरत हा कसेही केले तरी  कसलेला सैनिक होता , आणि तलवारबाजीत त्या संपूर्ण राज्यात त्याचा हात धरू शकेल असा कोणीही तलवारबाज नव्हता .  त्यामुळे भिल्लवाचा  निभाव लागणे शक्य नव्हते , याची जाणीव सरोजला ही होती .  सरोजनी बाजूला जाता जाता नेहमी तिच्या जवळ बाळगीत असलेला छोटे दोन खंजीर काढले व भाला घेऊन सरसावलेल्या सैनिकांवरती चपळतेने वार केला . दोन सैनिकांच्या गळ्यात तिने दोन खंजीर खुपसले व क्षणात ते दोन सैनिक जागीच ठार झाले .  मग बाकीचे सैनिक ही एक एक करत तिच्या वरती चालून येऊ लागले .  तिकडे अधिरथ  भिल्लवाला भारी पडत होता . मात्र सरोज या सहा सैनिकांना भारी पडत होती . एकापाठोपाठ एक तिने सहाच्या सहा सैनिकांना मारून टाकले .  अधिरथ इकडे भिल्लवाला  मारण्याच्या तयारीत असतानाच त्याच्या हातावरती चाकू फेकून त्याला निशस्त्र केले . निशस्त्र केल्याबरोबर भिल्लवाने  त्याच्या गळ्यावर तलवार ठेवत त्याचे दोन्ही हात बांधून , त्याला एका खांबाला  बांधून टाकले....
 " बेइमानीने लढलास तू भिल्लवा .....
" फार बोलतो नाही हा अधिरथ....  बाजूला पडलेले एक कापड घेऊन त्या कापडाने अधिरतचे तोंड बांधून टाकले व सरोजकडे वळत तो म्हणाला

" बापरे सरोज काय भयानक खंजीर चालवतेस तू ...कधी पाहीलच नाही मी.....
" तू अजून बऱ्याच गोष्टी पाहिल्या नाहीत.....
" सरोज चल लवकर आपल्याला कसेही करून प्रधानजींना सोडवलंचच पाहिजे.....

" थांब जरा मी मागच्या खोलीत जाऊन सगळ्यांना  सांगते मी चालले आहे ते ...मगाशी म्हणलं होतं ना मी ज्यावेळी मी तुला मदत करते त्यावेळी माझं नुकसानच होतं....

सरोज एक पंचविशीतली तरुणी होती . दिसायला अतिशय सुंदर , कोणताही पुरुष सहजपणे तिच्याकडे आकर्षित व्हावा इतकी .  त्याबरोबरच ती अनेक कलांमध्ये पटाईत होती .

 महाराजांनी सेनापतीला त्यांच्या वैयक्तिक कक्षात बोलावले होते  . "सेनापती आपली सेना काळ्या भिंतीकडे कधी रवाना होणार आहे ....? लवकरात लवकर ती भिंत पाडून टाका .....
"  महाराज सेना सकाळीच रवाना झालेल्या आहेत , पण तुमचा विचार नक्की आहे का...?  काळ्या  भिंतीबद्दल मीही बऱ्याच गोष्टी ऐकल्या आहेत .  महाराज सर्व जाणकार लोक म्हणताहेत भिंत पाडणं बरोबर नाही.....

" मग त्या सर्व जाणकार लोकांनाही उद्या प्रधानजी बरोबर फाशी देऊन टाकायची का...?  , माझा निर्णय झालाय प्रधानजी ,  मला शिकवू नका राज्यकारभार कसा करायचा ते......
" जी महाराज ,  माफी असावी ..." असं म्हणत सेनापती बाहेर निघून गेले
     तो लुकड्या शरीरयष्टीचा , खोबणीत खोल गेलेले डोळे ,  अर्धवट टक्कल आणि अर्धवट लांब वाढलेले केस ,  हातात सदानकदा ते सुवर्णपात्र व त्यात त्याची विशिष्ट मदिरा , चेहऱ्यावरती नेहमी त्रासिक भाव ....या महाराजाला पाहून पाहून मंत्रीगणही  त्याच्या वागण्याला मनातल्या मनात वैतागले होते...


" आता प्रलय येणार , हाss हाss हाss
 सगळ्यांना बुडवून नेणार , हाs हाs हाs
 आता प्रलय येणार , सगळ्यांना बुडवून नेणार
 आता प्रलय येणार , सगळ्यांना बुडवून नेणार.......

  काळ्या भिंतीपासून मैल दीड मैलावर असलेल्या एकमेव घराबाहेर उभा असलेला , विक्षिप्त कपडे घातलेला आणि विक्षिप्त दिसणारा , म्हातारा माणूस असं गोल गोल फिरत ओरडत होता . ओरडत ओरडतच त्याने अंगावरती असलेले कपडे काढून दिले व त्याच्या घरासमोर असलेल्या गढूळ पाण्याने भरलेल्या डबक्यात उडी मारली . आतून एक सुंदर तरुणी बाहेर आली .
" बाबा हे काय करताय तुम्ही , निघा बर बाहेर ....किती वेळा सांगितले मी तुम्हाला असं बाहेर फिरत जाऊ नका म्हणून......
" अग माझ्या शान्या बाळा तू पण या काळ या भिंती पासून लांब जा , नाहीतर  प्रलय येइल आणि तुला पण घेऊन जाइल , लवकर जा , लवकर जा ....नाहीतर प्रलय येईल आणि आपल्याला पण घेऊन जाईल.....
" बाबा वर या बरं . तुमची काढा घेण्याची वेळ झालीय  उगाच काही बरळू नका , त्या डबक्यातून बाहेर या.....

  ती तरुणी खरच सुंदर होती .  वडिलांना बाहेर काढण्यासाठी त्यांच्या हाताला धरून ओढायचा प्रयत्न करत होती . पण वडील तिच्या हातून निसटून त्या गढूळ पाण्यात डुबक्या मारण्यातच व्यस्त होते . ते खाली बुडत होते आणि खालचा चिखल घेऊन स्वतःच्या अंगाला फासत होते. तरीही ती मुलगी प्रयत्न करीतच होती . पण वडील काही तिच्या हाताला येत नव्हते . तिच्या त्या चेहऱ्यावरती जरा त्रासिकपणाचा भाव आला होता.

" मी मदत केली तर चालेल का ...? अचानक आलेल्या आवाजाने ती तरुणी जरा दचकलीच
घोड्यावरती बसलेला , खांद्यापर्यंत लांब केस असलेला ,  कमरेला तलवार नि खंजीर असलेला , अंगावरती चिलखत आणि डोक्यावरती टोप , असलेला तो नक्कीच कुणीतरी योद्धा होता.....
   घोड्यावरून खाली उतरत त्याने त्याचा टोप काढून बाजुला ठेवला ,  वाहणाऱ्या वाऱ्याबरोबर त्याचे काळे कुळकुळीत केस हवेत उडाले क्षणभरासाठी का असेना ती तरुणी त्याच्याकडे पाहतच राहिली.... त्यांची नजरानजर झाली . त्याच्या नजरेत तिच्याबद्दल आदर होता नि कोपऱ्यात कुठेतरी प्रेम होतं आणि तिच्या नजरेत त्याच्याबद्दल निवळ कुतूहल होतं . त्याच्या बरोबर असलेला दोर त्याने घेतला व एक गाठ मारत गोल फिरवून  तिच्या वडिलांभोवती फेकला व एका झटक्यात ओढून त्याने तिच्या वडिलांना बाहेर काढले...

 " मी तुमची आभारी आहे , थोडावेळ थांबून तुम्ही आमचा पाहुणचार का घेत नाही ...? संध्याकाळची वेळ झाली आहे तुम्ही जेवण करून तुमच्या पुढच्या प्रवासाला निघू शकता.....

" नाही पुन्हा कधीतरी मला खूप लांबच्या प्रवासाला जायचं आहे.....

" पश्चिमेकडचे प्रवास फार दिवस चालत नाहीत . तुम्ही योद्धा दिसत आहात . भले तुम्ही योद्धा असा,  पश्चिमेकडे जाऊ नका त्या काळ्या भिंतीपलिकडे जे काही आहे ,  ते सगळ्याला वरचढ आहे .....

" तुमची नजर फारच तीक्ष्ण आहे..... तुम्हाला कसं कळलं की मी काळ्या भिंतीपलीकडे चाललोय ते.....?

" माझी नजर आणि  आठवणीही तीक्ष्ण आहेत . काही वर्षांपूर्वी एक म्हातारा साधू , साधू म्हणता येणार नाही त्याला . इतर म्हाताऱ्या माणसाला सारखा असतो तसाच म्हातारा या ठिकाणाहून गेला . जाताना मला त्याने एक थैली दिली . काहीतरी होतं त्यात  .  दुसरी एक थैली दिली,  त्यात सोन्याच्या मुद्रा होत्या .  तो मला म्हणाला काही वर्षानंतर या ठिकाणाहून चिलखत घातलेला , कमरेला तलवार व खंजीर असलेला ,  डोक्यावरती टोप असलेला ,  खांद्यापर्यंत लांब काळे कुळकुळीत केस असलेला , घोड्यावरती स्वार होऊन एक योद्धा येईल . तो स्वतःहून तुला त्याची मदत देऊ करेल , त्या योद्ध्याला  त्याने ती थैली द्यायला सांगितली होती......

ती तरुणी तिच्या वडिलांना एका बाजूला बसवत , आत गेली व काळ्या कपड्यात गुंडाळून ठेवलेली पांढरी व धूळ बसून मळकट झालेली थैली तिने आणून त्या तरुणाच्या हातात सुपूर्त केली.....

" हा माझा हक्क नाही , पण मी विचारू शकते का , कि या थैली मध्ये काय आहे.....

 त्या तरुणाने थैलीची गाठ सोडत तिला त्यात असलेल्या काळ्या पांढऱ्या बिया दाखवल्या व म्हणाला " तुझे बाबा बरोबर बोलत आहेत , तुम्हाला काळ्या भिंतींपासून दूर जावंच लागणार आहे .

   तो आयुष्यमान होता . काळी भिंत पाडल्यानंतर जे काही संकट येणार होतं .  त्या संकटापासून रक्षण करण्यासाठी जे काही करावे लागणार होतं ते करण्याची शपथ त्याने व त्याच्या साथीदारांनी घेतली होती.


क्रमःश ....

Friday 22 March 2019

प्रलय-०१





                     उपोद्घात

  " विनाश मला विनाश दिसत आहे राजन ज्या वेळी आकाशात चंद्र आणि सूर्य दोन्ही उपस्थित असतील , अर्धे आकाश काळेकुट्ट  आणि अर्धे आकाश लाल रंगाचे  असेल ; त्यावेळी जे मूल जन्माला येईल ते तुझ्या वंशाचा निर्वंश करेल . राजेन तुझा निर्वंश फार दूर नाही ....!ती  तुझ्या राजघराण्याचा समूळ नाश करण्यासाठी जन्माला येत आहे.......!

  " महर्षी , कोण ' ती '....?  तुम्ही कोणाबद्दल बोलत आहात....?  आणि हे कधी , कधी होणार आहे ?   मला फार चिंता वाटत आहे ...?

  " फार दूर नाही राजन .  तुझा मृत्यू , लवकरच तुझा मृत्यू होईल . आणि तुझा पुत्र तुझे राज्य जेव्हा चालवायला घेईल त्या वेळी  त्याच्या हातातून अधम व घोर पापकर्मे घडतील . त्याच कर्माचे फळ म्हणजे तिचा जन्म आणि जेव्हा ती जन्माला येईल त्या क्षणापासून तुझा वंशाचा अंतःकाळ काळ सुरू होईल .  तुझा निर्वंश होण्याचा काळ सुरू होईल.....

  " महर्षी तुम्ही थोर आहात , तुम्ही महान आहात , तुम्हाला काहीही अशक्य नाही , यातून वाचायचा काहीतरी उपाय असेलच ,  तुम्हीच मला सुचवा ,  महर्षी मी काय करू सांगा ? तुम्ही सांगा , तुम्ही सांगाल तसे मी करायला  तयार आहे ?  महर्षी मला वाचवा ,  महर्षी माझ्या वंशाला वाचवा , महर्षी हे राज्य वाचवा , सर्व काही तुमच्या हातात आहे....?

  राजाने महर्षी च्या पायावर लोळण घेतली . तो हीनदीन झाला होता .  त्याच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते .  त्याच्या वस्त्राचे  त्याला भान नव्हते . त्याची अवस्था दयनीय होती.....!

 " या सार्‍या घटना जर टाळायच्या असतील तर त्याला एकच उपाय आहे राजन ,  या घटनांची सुरुवात ज्या ठिकाणाहून होते , ज्य घटनेपासून होते , ज्या व्यक्ती पासून होते ज्या  स्थळापासून होते , त्या सर्वांचा नाश...

 " राजा समजूनही न समजल्या सारखे म्हणाला "  म्हणजे ,  म्हणजे काय म्हणायचे तुम्हाला महर्षी ....?  "  त्याला हुंदका दाटून आला . तो मुसमुसून रडू लागला . त्याला महर्षीच्या बोलण्याचा अर्थ कळला होता......

    राज्यावर येणारे संकट टाळण्यासाठी राजाने आपल्या राजपुत्राला राजमहालात झोपवून तो संपूर्ण राज महाल पेटवून दिला .  संपूर्ण महाल जळून खाक होईपर्यंत ,  त्याची राख आसमंतात विखरून जाईपर्यंत राजा व राणी दोघे ते दृश्य पहात राहिले . त्यांचा मुलगा त्यांच्यासमोर जळून राख झाला होता. त्याचा किंचाळण्याचा आवाज त्यांच्या कानात भरून राहिला होता . त्याच्या जळालेल्या मांसाचा वास त्याच्या नाकात रुतून बसला होता  त्या घटनेने राजावर फार मोठा आघात केला.....

   राजाचे संसारावरून , राज्यकारभारावरून मन उडाले .  त्याने वानप्रस्थाश्रम स्वीकारूला .  जंगलात एका बाजूला आश्रम बांधून तो राणीसह त्या ठिकाणी राहायला गेला .  प्रधान मंडळ कसेतरी राज्य कारभार सांभाळत होते . पण जनतेला त्यांचा राजा हवा होता ..  राजा विना राज्य पोरके झाले . राणीला सर्व काही समजत होते .  राणीने राजाचे मन वळवायचे प्रयत्न केले पण तिला ते शक्य नव्हते.  राज्याची संसारावर ची वासना उडाली होती . त्याच्या सर्वच वासना नष्ट झाल्या होत्या .  तो दगडासारखा निश्चल असायचा .  तो असुनही नसल्यासारखा होता . त्याच वेळी राणीच्या आयुष्यात तो आला .  त्याने राणीला विश्वास दिला . स्थैर्य दिले . सुख दिले आणि राज्याला नवा राजपुत्र दिला .  तो फक्त तिलाच दिसायचा . तिलाच जाणवायचा .   साऱ्यांना वाटलं  हा आपला खरा राजपुत्र ,  पण तिलाच माहीत होतं तो खरा राजपुत्र नव्हता.  त्या  राजपुत्राचा राज्याभिषेक सोहळा झाला .  त्या नव्या राजपुत्राच्या नावाखाली राज्यांमध्ये राज्य सुरू झाले . पण ते राज्य ना राजपुत्राचे होते , ना जुन्या राजाचे होते , ना राणीचे होते . ते राज्य होते त्याचे . तो त्याच्या मनाप्रमाणे चालवत होता  .  राणी त्याच्या प्रभावाखाली होती ...

काही वर्षानंतर

      सोनेरी नक्षीकाम केलेल्या त्या दारासमोर दोन बलदंड द्वारपाल उभे होते . एक माणूस त्या दारातून पुढे जाताना त्या दोन द्वारपालानी  भाले आडवे लावून त्याला जाण्यास मज्जाव केला .

" मला कळत नाही , प्रधानजी तुमच्या सारखे मूर्ख द्वारपाल का म्हणून त्यांच्या सेवेत ठेवतात ?  कधी कळणार तुम्हाला काय माहित ....? अरे मी आहे मी ,  मी हेर पथकाचा प्रमुख ,साधीसुधी वेशभूषा केलेले देखील तुम्हाला कळत नाही ......

तो हेर पथकाचा प्रमुख भिल्लव होता ,  तो आत गेला .  प्रधानजी त्यांच्या मंचका वरती बसून काहीतरी वाचण्यात व्यस्त होते .

"  क्षमा असावी प्रधानजी , एक महत्त्वाची बातमी आहे त्यामुळे आपणास व्यत्यय  आणत आहे.....

" अरे राजाने हेर पथकाकडून आलेली बातमी अर्ध्या रात्री ही ऐकायला तयार असावं  , बोल भिल्लवा तू काय बातमी आणली आहेस..?

" महाराजांनी पश्चिमेकडील काळी भिंत पाडण्याची आज्ञा दिली आहे .......

" काय म्हणतोयस भिल्लवा तू ,  महाराज म्हणजे आपले जुने महाराज  की राजकुमार......?

" प्रधानजी सत्य कितीही कटू असले तरी ते पचवायलाच हवे .  राजकुमार आता राजकुमार राहिले नाहीत ते महाराज आहेत आणि त्याच महाराजांनी पश्चिमेकडील काळी भिंत पाडण्याचा आदेश दिला आहे.......

" भिल्लवा साऱ्यांना माहित आहे , ती काळी भिंत कशासाठी कधी आणि का बांधली गेली होती ते ?  महाराजांनाही या गोष्टी माहीत आहेतच .  आपल्या राज्याचा जो कुणी राजा होतो त्या राजाला या सार्‍या गोष्टी माहीत असतात  ,  आणि त्या भिंतीपलीकडील शत्रूपासून रक्षण करण्याची जबाबदारी राजाची असते.  आणि तोच राजा जर असे कृत्य करायला जात असेल तर जनतेने काय करावे......?

" प्रधान जी महाराजांचे म्हणणं आहे की या जुन्या गोष्टी आहेत , आणि या सर्व अंधश्रद्धा आहेत . कितीतरी वर्षापासून ती भिंत तिथेच आहे . त्या भिंतीपासून ,  भिंतीपलीकडील शत्रूकडून आपल्याला कधीच कोणताच अपाय झाला नाही  . एखाद्या वेळेस ती एखादी अख्यायिका असू शकेल , जी कुणीतरी मुद्दाम तयार केलेली असेल.....?

" भिल्लवा काही गोष्टी असतातच आख्यायिकेसारख्या . ज्या गोष्टी हजारो वर्षापासून चालत आलेल्या असतात त्या गोष्टी मागे खरंच काहीतरी गूढ असतं उगाच तळाची माहिती न घेता विहिरीत बुडी मारू नये.....

" भिल्लवा काही जरी झालं तरी या आदेशाचं पालन होता कामा नये , आपल्याला कसेही करूण ती भिंत पडण्यापासून महाराजांना रोखलंच पाहिजे . एक तर महाराज वाईट संगतीत असतील किंवा विचार करण्याची त्यांची क्षमता राहिलेली नसेल , काहीही करून हा निर्णय आपल्याला थोपवला पाहिजे . अन्यथा राज्यावर येणारे संकट थांबवायला कोणी समर्थ असणार नाही.....

" प्रधानजी मला वाटतं यात चिंता करण्यासारखे काही नाही  .  माझे बरेच हेर त्या भिंतीपलीकडे जाऊन आले आहेत ,  आणि मीही बऱ्याच वेळा त्या भिंती पलीकडे जाऊन आलो आहे . त्याठिकाणी उजाड जमिनी शिवाय काहीच नाही . ना कोणती वनस्पती आहे , ना कोणता प्राणी आहे , ना कोणती जीव आहे . जीवन नावाची गोष्ट त्या भिंतीपलीकडे अस्तित्वातच नाही . मग आपल्याला कशापासून भीती आहे.....?

" त्यापासूनच आपल्याला खरी भीती आहे भिल्लवा भिंतीपलीकडे जीवन नाही जर ती भिंत पडली तर अलीकडेही पलीकडच्या सारखीच स्थिती व्हायला वेळ लागणार नाही.....!


" ते सर्वथैव अशक्य आहे महाराज भिंतीपलीकडे ना कोणती नदी आहे पाण्यासाठी , ना जमीन सुपीक आहे पीक घेण्यासाठी , त्यामुळे त्या ठिकाणी कोणताच प्राणी किंवा जीवन आपल्याला दिसत नाही . मात्र उलट आपल्याकडे सर्व प्रकारची सुबत्ता आहे त्यामुळे आपली स्थिती तशी कधीच होणार नाही.....!

" भिल्लवा तुला बऱ्याच गोष्टी माहीत नाहीत  एकेकाळी तो भागही आपल्यासारखा किंबहुना आपल्याहून अधिक सुबत्ता असलेला होता पण......

प्रधानजींचे वाक्य अर्धवटच राहिलं . मुख्य द्वारा बाहेर तलवारीचा आवाज येत होता . त्या पाठोपाठ दोन किंकाळी ऐकू आल्या . दारावर काहीतरी आपटलं आणि द्वार जोरात उघडले गेले .....

ते राजाचे निवडलेले खास अंगरक्षक होते.
"  भिल्लवा पळू नकोस , तू राज्याशी द्रोह केला आहे ....

" भिल्लवा तू इथून निघून जा , तुला कसेही करून ती भिंत पडण्यापासून रोखलंच पाहिजे , अन्यथा मोठा अनर्थ होईल .  मी कसेही करून त्यांना थांबवतो , तू निघ पटकन  लाखो जणांचे जीवन तुझ्यावरच अवलंबून आहे.....

   मागच्या बाजूला असलेल्या द्वाराकडे भिल्लवाने जोरात धाव घेतली . त्याच्या पाठोपाठ एक सैनिक ही गेला .  घरातून बाहेर पडत असताना त्या सैनिकाने भिल्लवाच्या पायाला धरून जोरात ओढलं , त्यामुळे भिल्लव खाली आपटला , त्याच वेळी प्रधानजींनी बाजूलाच असलेला भाला घेऊन त्या सैनिकाच्या ह्रदयाचा वेध घेत मारला .   त्या सैनिकांने जागेलाच प्राण सोडला .  उरलेले चार सैनिक तलवार काढून त्वेषाने प्रधानजी वरती धावून गेले प्रधानजींनीही आपली तलवार काढून त्यांच्याबरोबर युद्ध करण्यास उभे ठाकले.....

उरलेल्या एका सैनिकाने कमरेला अडकवलेला शंख काढून जोरात शंखनाद केला . त्याबरोबर बाहेर पडून घोड्यावर स्वार झालेल्या भिल्लावाच्या मागे तीस चाळीस  घोडेस्वार लागले............


भिल्लव हा पट्टीचा घोडेस्वार होता . त्याने मुद्दाम हून अरुंद रस्त्यांतून व गर्दीच्या ठिकाणातून त्याचा घोडा घातला,  त्यामुळे त्याच्या मागे लागलेल्या घोडेस्वारांना त्याचा पाठलाग करता येणे जवळपास अशक्य होतं . पण ते घोडेस्वार ही काही कमी नव्हते त्यांनीही भिल्लावाचा पाठलाग सुरुच ठेवला पण त्या दोघांमध्ये बरेच अंतर पडले.  भिल्लव नगराच्या मुख्य द्वारा पर्यंत पोहोचला .  पण मुख्य द्वारही बंद होते .  त्या ठिकाणी असलेले सैनिक हे भिल्लवाची वाटच पाहत होते .  भिल्लव दिसल्याबरोबर ते सैनिकहीनही मागे लागले .  भिल्लवाला सर्वत्र सैनिक दिसत होते .  त्याने मुख्य बाजाराच्या दिशेने घोडा वळवला व त्याला टाच दिली .  काही क्षणातच तो मुख्य बाजारात पोहोचला . त्या ठिकाणी कायम गर्दी असायची . त्याने घोडा सोडून दिला व तो पायउतार होऊन गर्दीत मिसळला .  सैनिकांना घोड्यावरून मुख्य बाजारात फिरता येणे शक्य नव्हते . त्यांनीही घोडा सोडून दिला व ते ही भिल्लवाला शोधायला बाजारात फिरू लागले . भिल्लव वेशभूषा करायला पटाईत होता . एका रेशमी कापड दुकानापुढे तो स्त्रीची वेशभूषा करून कापड पाहण्यात दंग झाला होता.  कुणाही सामान्य माणसाला एखादी सुंदर स्त्री कापड घेण्यात व्यस्त आहे असेच वाटले असते . पण त्या सैनिकांना खास प्रशिक्षण दिलेले होते . ते राजाच्या खास तुकडीतील खास सैनिक होते . त्यातील एका सैनिकाने भिल्लवाला ओळखले व तो त्याच्याकडे धावू लागला.....

भिल्लवाला त्याच्याकडे येणारा सैनिक दिसला . त्याने त्याच्या डोक्यावर घेतलेले रेशमी कापड तिथेच फेकून दिले व जोरात धाव घेतली . तो पुन्हा एकदा गर्दीमध्ये मिसळा पण तो सैनिकही त्याच्या मागे धावत होता .  त्या सैनिकाने भिल्लवाला एका महालात जाताना पाहिले होते तो सैनिकही त्या महालात घुसला.... पण आत गेल्याबरोबरच त्याला कोणाची तरी मिठी पडली ,

" आमच्या येथे किनइ सैनिकांना खास सूट देण्यात येते ,

  तो एक किन्नर आणि त्याने सैनिकाला मिठी मारली होती आणि तो सैनिक एका वेश्यालयात घुसला होता .  सैनिकाने किन्नराला जोरात धुडकावून लावले ,  तो किनऱ्या आवाजात ओरडत सैनिकाला शिव्या देत मागे पडला ,

" तू कोणाला येताना पाहिले का.....?

" पाहिले ना आत्ताच तर तुला पाहिले , तो किन्नर पुन्हा एकदा लाडिक नखर्‍यात येत त्याच्याजवळ जात बोलला....

सैनिकाने त्या किन्नर च्या श्रीमुखात भडकावुन दिली तो किन्नर त्याच्या त्याच्या लाडिक शैलीमध्ये रडू लागला.....

" राज्याच्या हिताचा प्रश्न आहे , तुला मी शेवटचं विचारतो या दारातून कोणी आत आलं होतं का आणि ते कुठे गेलं ....?
     किन्नराने मागच्या बाजूच्या एका दरवाज्याकडे बोट करून सांगितलं त्या तिथे एक वेंधळा माणूस गेलाय... बघा सापडतो का ....?

तो सैनिक त्या दाराकडे पळत निघाला .

आता त्या किनाऱ्याला मागून कोणाची तरी मिठी पडली होती .  " वा भिल्लवा वा , वेशांतर करायला शिकावं तर ते तुझ्याकडूनच ....

" आणि मी कशाचाही वेषांतर केलं तरी ते ओळखायला शिकाव तुझ्याकडूनच , सरोज "  भिल्लवाणने सरोजला पुढे ओढून घेत त्याच्या मिठीत घेतले......

" आज कसं काय हेर पथकाचा प्रमुख या ठिकाणी अवतरला......
" तुला माहित नाही सरोज पश्चिमेकडची काळी भिंत पाडायचा आदेश दिलाय महाराजांनी.....
" पण हे  सैनिक तुझ्या का मागे लागलं होते.....?
" प्रधानजीनी मला कसंही करून ती भिंत पाडण्यापासून थांबवायचा आदेश दिलाय....
" म्हणजे देशद्रोही झाला म्हणायचा की तू ....?ते असो काहीतरी ,  या देशद्रोहाची शिक्षा तुला मिळायलाच पाहिजे.....
सरोज त्याला ओढत खोलीकडे नेऊ लागली .
" सरोज ही वेळ नाही , आता क्षणाक्षणाची किंमत  आहे . मी जर गडबड केली नाही तर लाखो जणांचा जीव जाण्याची शक्यता आहे , मला निघायलाच हवं आणि तू मला मदत करणार आहेस.....
   " मी आणि तुला मदत हे शक्य नाही भिल्लव ,  ज्या ज्या वेळी तु माझी मदत मागतो आणि ज्यावेळी मी तुला मदत करते त्यावेळी मला नुकसानच होतं....
" सरोज तुझं नुकसान लाखो जीवांच्या किमती एवढं मोठं आहे का....?

पुन्हा एकदा दारावर थाप पडली . दार उघडलं गेलं नाही .  पुढच्या वेळेस दारावर जोरजोरात झाडल्याचा आवाज होऊन , शेवटी दार उघडल्याचा आवाज झाला . दार उघडल्याबरोबर  सात-आठ सैनिकांची एक टोळी आली व त्या टोळीने भिल्लवाला  घेरले.....

इकडे प्रधानजीना बेड्या घालून राजासमोर उभं केलं होतं .

   " महाराज तुम्ही लहान असल्यापासून किंबहुना तुमच्या जन्माच्या पूर्वीपासून मी या राज्याच्या सेवेत आहे . या राज्याचं भलं व्हावं अशीच माझी इच्छा आहे . म्हणूनच मी तुम्हाला सल्ला दिला होता की ती काळी भिंत पाडू नका... कृपा करा…..

राजा त्याच्या वैयक्तिक कक्षात होता .  सुवर्ण पात्रात त्याच्यासाठी खास बनवलेली मदिरा प्राशन करत होता .  राजा अजून किशोरवयीन होता , त्याला अजून धड मिसरूडही फुटलेलं नव्हतं .

" बस करा प्रधानजी मला तुमच्या या खोट्या वागण्याचा वैताग आलाय ...!किती दिवस चांगल्यापणाचं पांघरून घेऊन तुम्ही या राज्याच्या विरोधात कट कारस्थान करणार आहात.....  मला माहित आहे भिंतीपलीकडे असलेल्या देशद्रोह्यांच्या गटाला तुम्ही रसद पुरवत आहात आणि त्या काळ्या भिंतीचा तुम्ही एक ढाल म्हणून वापर करत आहात . आता हे फार काळ चालणार नाही ती भिंत पाडून त्या पलीकडे असलेल्या देशद्रोह्यांना कंठस्नान घालण्याची वेळ आली आहे आणि सुरुवात तुमच्या पासून होणार आहे ....

  " सैनिकांनो घेऊन जा यांना आणि उद्या सकाळी सूर्योदयाबरोबर फाशी देऊन टाका यांना.......