Monday 30 July 2018


         सद्य राजकीय परिस्थितीवर जळजळीत भाष्य करणारी कादंबरी म्हणजेच विजय तेंडुलकर यांची कादंबरी दोन होय.
    कोणत्याही घटनेचा उपयोग राजकरणी आपली राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी कसा करतात ,  सत्ता मिळवण्यासाठी किंवा असलेली सत्ता टिकवण्यासाठी  राजकारणी कोणत्याही थराला कसे जाऊ शकतात याचे इतंभूत वर्णन कादंबरी दोन या विजय तेंडुलकर यांच्या कादंबरीत येते .
         सलग 22 वर्षे नगरावर अधिसत्ता गाजवूनही नगराच्या अडचणी दूर करण्यास अपयशी ठरलेला नगरपाल , नगर पालाला सत्तेतून खाली खेचण्यासाठी कोणत्याही कृत्यासाठी तयार असणारे विरोधक आणि त्यांच्याच ताटाखालील काही चमचे ,  नगरात येऊन एकाच दिवसात नगरातील उंदरांची समस्या निकालात काढणारा उंदीरमाऱ्या किंवा अवलिया , आणि तिथून सुरू होणारा नगरपारालाचा खडतर प्रवास सत्ता मिळवण्यासाठी नगरपाल आने चालवलेले त्याचे डोके नक्कीच अचंबित करून सोडते....
              या कादंबरीत उंदीर हे रूपक  वेगवेगळ्या समस्यांसाठी व ती समस्या निर्माण करणार्‍या लोकांसाठी वापरले असावे .

Sunday 8 July 2018

दशानन


    दशानन ही जयंत जोगळेकर यांनी लिहिलेली एक अतिशय उत्तम कादंबरी आहे .
      या कादंबरीबद्दल एका वाक्यात सांगायचं झालं तर रामाला देव बनवणाऱ्या रावणाची ही गोष्ट आहे
      ही कादंबरी म्हणजे रामायण नाही तर रावणायन आहे .
        या कादंबरीत रामायणाची कथा एका वेगळ्या दृष्टिकोनातून मांडलेली आहे लहानपणापासून आपल्या मनावर असे संस्कार झाले आहेत की रावण म्हणजे दृष्ट रावण म्हणजे पाप रावण म्हणजेच वाईटपणा .आपण असं म्हणू शकतो की काळ्या आणि पांढर यांच्या युद्धात रावण हा पूर्णपणे villain ठरला . पण खरंच तसं होतं का. ?  दशानन या कादंबरीत याचा मागोवा जयंत जोगळेकर यांनी घेतलेला आहे .
   कोणताच व्यक्ती पुर्णपणे चांगला किंवा पूर्णपणे वाईट नसतो . व्यक्ती म्हणजे चांगल्या व वाईट यांचे बेमालूम मिश्रण असते . रावणाने सीतेचे अपहरण  वासनेपोटी केले असं आपल्या मनावर ठसवलं गेलेलंआहे पण ते कितपत खरं होतं ?  रावणाने केलेलं सीतेचं अपहरण हा एक राजकीय डाव होता . पण नंतर त्याच्या मनात सीतेबद्दल प्रेम निर्माण झालं होतं मात्र तरीही त्याने तिच्यावरती जबरदस्ती केली नाही . आपण असे म्हणू शकतो की रावण वाईट होता पण बिभीषणाचा काय ? त्याने स्वतःचीच लंका शत्रूला जिंकून दिली .  पण जिंकणारा च्या बाजूकडे असल्यामुळे त्याचा भगवद्भक्त म्हणून उदोउदो झाला .  ह्या कादंबरीचा मते बिभीषण रामायणाचा मुख्य खलनायक ठरतो . रावण चांगला आहे , चांगला होता ,  असं या कादंबरीत सांगितलेले नाही पण तो श्रेष्ठ पुत्र होता  , भक्त होता आणि शत्रू होता हे सिद्ध केलेलं आहे .