Saturday 21 September 2019

प्रलय-२३

प्रलय-२३

    " मला वाटलंच होतं असं काहीतरी होणार , म्हणूनच हे बुटके पाठवली होते तुझ्यासोबत , त्यांनाही त्याचं काम पूर्ण करून दिलेलं नाहीस .  अरे तुझ्या एकट्याच्या स्वार्थासाठी संपूर्ण जगाचा विनाश केलास की तू...."  तो म्हातारा वैतागून आयुष्यमानला बोलत होता ...
   "  आता आत्मबलिदानाचा विधी पूर्ण झाला म्हटल्यावर ,  ती संपूर्ण शक्तिशाली झाली . तिला आडवणे आता सर्वथैव अशक्य आहे . ... आता तो म्हातारा पुढे आयुष्यमान आहे हेही विसरला व स्वतःशीच बडबडत सुटला....
  "  आता काही खरं नाही . तिला कोण थांबवणार...?  विनाश कोण रोखणार ....? याचे उत्तर कोणाला माहित आहे.....?  कोण ..? कोण ..? कोण...?
     तो वेड्यासारखा पळत सुटला...
    " हा सापडला.....  तंत्रज्ञ मंदार रक्षक राज्यातील उत्तरेच्या जंगलात असलेल्या गुप्त तळावरती आहे तो......  चल लवकर आपल्याला तिथे जायचं आहे.... सुरुकुला  बोलव..... लवकर ....प्रलयकारीका कुठे गेली काय माहित......
भिल्लव सार्थक सरोज व उत्तरेच्या तळावरती असलेले सैनिक रक्षक राज्याच्या महाला वरती चालून निघाले होते .  सर्व सैनिक काळी भिंत पाडण्यात व्यस्त असल्याने महालाच्या संरक्षणासाठी कमी सैनिक होते .  त्याच संधीचा फायदा घेऊन सर्वांनी आक्रमण करण्याचे ठरवले होतं . महाराणी शकुंतलेला याबाबतीत सांगितलं होतं पण त्यांचं कुठेच लक्ष नव्हतं . त्यांचा मुलगा साऱ्यांच्या नजरेदेखत भरदिवसा पळवला होता व कोणीच काही करू शकलं नव्हतं .  त्यात अधिक भर म्हणून तंत्रज्ञ मंदार यांनी आत्म बलिदानाचा विधी व त्यासाठी बळी म्हणून राजकुमाराना पळवलं असावं असं सांगितल्यावर तर महाराणी अधिकच निराश झाल्या . सर्व सैनिक दक्षिणेकडे कूच करायला तयार असतानाच आयुष्यमान तो म्हातारा व दोन बुटके त्याठिकाणी सुरुकु सोबत आले .  त्यांना व सुरुकु ला पाहून सार्‍यांनी शस्त्रे उगारली . तंत्रज्ञ मंदारची तब्येत आता बऱ्यापैकी सुधारली होती . तोही घोड्यावरती स्वार झालेला होता .  सुरुकुला पाहिल्यावर  तो बोलला ...
   " अरे हे आपल्या बाजूने आहेत .  प्रलयकारिकेला थांबवायचं असेल तर सुरुकु आणि त्याचा मालक लागणारच ना....
  " अरे मंदार अगदी तसाच दिसतोय , अजिबात फरक नाही ....." तो म्हातारा मंदारला म्हणाला
"  मग तंत्रज्ञ उगाच म्हणतात का लोक मला .... तू मात्र दिवसेंदिवस अधिकच म्हातारा होत आहेस.....
" अरे हा आयुष्यमान , वारसदारांच्या सभेचा प्रमुख .  प्रलयकारिकेचा प्रियकर . त्याला जमले नाही .  आत्म बलिदानाचा विधी पूर्ण झालाय....
" वाटलं होतं आता त्या तिघींना शोधावे लागेल . मारुत आग्नेय आणि जलधि जरी एकत्र आले तरी फार काळ ती एकी टिकत नाही . त्यामुळे त्यांना एकत्र आणण्यासाठी त्या तिघी शिवाय आपल्याला पर्याय नाही....
" कोण तिघी ..? काय बोलताय तुम्ही ....? " आयुष्यमान म्हणाला . 
" कळेल तुला ....  मग येतोय ना तिघांना शोधायला...  तुला माहिती असेल त्या कुठे आहेत ....."  तो म्हातारा  मंदारला  बोलला
" चला मागच्यावेळी मी ज्यांना पाहिलं होतं त्यावेळी त्या उडत्या बेटावरती स्थायिक होत्या . सुरुवात तिथूनच करूया......"  मंदार सुरुकु वरती चढत म्हणाला .  पुन्हा एकदा सुरुकु आकाशात उडाला आणि सैन्य दक्षिणेकडे रवाना झाले......
 
     रक्षक राज्यातील आणि जलधि राज्यातील सैनिकांमध्ये युद्ध सुरू झालं होतं . मध्यरात्रीच्या आसपास सुरू झालेले युद्ध अजूनही चालू होतं . तोफा धडाडत होत्या . धनुष्यातून बाण सुटत होते . तलवारी रक्ताने माखलेल्या होत्या .  सूर्योदय झाला होता .  रक्ताच्या चिखलात अजूनही युद्ध चालूच होतं .  एका साध्या करण्यासाठी हजारो सैनिकांचे प्राण जात होते .  हळूहळू सूर्य अधिकच तळपू लागला . दोन्ही बाजूकडून नव्या दमाचे सैनिक रणांगणात उतरले .  पण अचानक विजेचा कडकडाट झाला . भरदिवसा सूर्यास्त होऊन अंधार पडला . वारे शांत झाले . वातावरण शांत झालं . अचानक झालेला बदल पाहून सैनिकही स्तब्ध झाले...
  " पहिल्या प्रलय पाहिला आणि जिवंत राहिले अशा काही मोजक्या लोकांपैकी माझे वडील म्हणजेच तंत्रज्ञ मंदार ........
     सर्वत्र आवाज घुमत होता तंत्रज्ञ मंदारचा मुलगा शौनक बोलत होता .
    " प्रलय काही एका दिवसात येत नाही . एक-एक घटना त्याला कारणीभूत ठरते . प्रलय येणार हे तेव्हाच नक्की झालं ज्यावेळी महाराज सत्यवर्मानी त्यांच्या राजपुत्राला राजमहालात जाळून दिलं .  पण महाराज विक्रमांनी काळ्या भिंतीला पाडण्याचा आदेश देऊन प्रलयकाळ फारच जवळ आणला . तुम्हाला पाहायचंय का प्रलयकाळ काय असेल ......? "
    आणि आकाशात चित्रे उमटू लागली . सर्व सैनिक ती  दृश्य पाहून  घाबरून गेले....
    " काळी भिंत पाडल्यानंतर या गोष्टी होणार आहेत त्यामुळे लक्षात घ्या ..... आणखी एक गोष्ट . आपल्या साऱ्यांना माहित आहे । महाराज विक्रम त्यांच्यासाठी खास बनवलेल्या सुवर्ण पात्रात त्यांच्यासाठी खास बनवलेली विशिष्ट अशी मदिरा घेत असतात .  ते पात्र व ती मदिरा मारुतांच्या पुजाऱ्यांनी बनवलेली आहे .  त्यामुळे महाराज विक्रमांवरती मारूतांचे नियंत्रण आहे .  तुमच्या राज्याचे खरे महाराज विश्वकर्मा हेच आहेत...."
          हे ऐकताच रक्षक राज्याच्या सैनिकांची तळपायाची आग मस्तकाला गेली . सारे सैनिक विक्रमावरती धावून गेले .  काही क्षणातच विक्रमाचे निपचित पडलेले शरीर त्यांनी भिंतीपलीकडे फेकून दिले . महाराज विश्वकर्माच्या नावाचा जयजयकार सुरु केला .  सैनिकांनी केलेल्या कृतीची महाराज विश्वकर्मा ना जरी गृना वाटत असली तरी आता मात्र आता ते बोलण्याची वेळ नव्हती....
   " जलधी राज्याची सैनात त्रिशुळ सैनिकांसोबत लढण्यासाठी दक्षिणेकडे उभी आहे .  हे त्रिशुळसैनिक दुसरे-तिसरे कुणी नसून जलधि राज्याचे नागरिकच आहेत . बाटी जमातीच्या काही टोळ्यांनी ते सैनिक बनवण्यासाठी मारूतांची मदत केली असावी . त्या टोळ्या मारतांच्या जुन्या महालाकडे जात आहेत . आपल्याला कसेही करून त्या टोळ्यांना पकडायलाच हवं .  प्रलयकात्र थांबवायचा असल्यास हे करायलाच हवं... "
     रक्षक व जलधि राज्याच्या सैनिकांना घेत महाराज विश्वकर्मा जुन्या महलाकडे निघाले . विक्रमाच्या वधाची आणि इतर बातम्या घेऊन महाराज विश्वकर्मानी महाराज कैरव  व महाराणी शकुंतले कडे दूत पाठवले....

No comments:

Post a Comment