Monday 23 December 2019

प्रलय-२९

प्रलय-२९

     विश्वनाथ भैरव आणि पार्थव  काळ्या भिंतीपाशी आले  .
   "  तुला लागणाऱ्या सर्व गोष्टी आहेत . लवकर सुरू कर..."  भैरव म्हणाला
  " चिंता नको काही क्षणात ही भिंत कोसळलेली असेल ...." विश्वनाथ म्हणाला . नंतर त्यांनी आणलेल्या गोष्टी मांडायला सुरुवात केली . विचित्र भाषेत कसलेतरी मंत्र तो उच्चारत होता . मधुमोध पेटवलेल्या अग्निकुंडात एकापाठोपाठ एक आहुती देत होता . त्यातूनही चित्रविचित्र आवाज निघत होते .  पण भिंत अजून हलली सुद्धा नव्हती .
 " काही होत नाही वाटतं . किती वेळ झाला ....." भैरव म्हणाला .
" विक्रमासाठी तुम्ही इतकी वर्षे वाट बघितली , अजून काही क्षण वाट पाहू शकत नाही का तुम्ही....
         अजूनही बराच वेळ तो काहीतरी मंत्रोच्चारात राहिला व त्या आगीत काही ना काही टाकत राहिला शेवटी तो उभा राहिला . उजव्या हाताच्या खूप धरत त्याने डावा हाताचा पंजा कापला . ते रक्त अग्निकुंडात पडताच  साप फुत्कारल्याप्रमाणे फुस्ससssss असा आवाज होत अग्निकुंडतून लाल धूर निघू लागला. सर्वत्र जळक्या माणसाचा वास सुटला त्या दोराने दोरखंड सारखा आकार धारण करत भैरव पार्थव व  विश्वनाथ या तिघांनाही काळा भिंतीवरती  काळ्या महलाकडील बाजूला बरोबर मधोमध बांधून टाकले . तिघांनीही सुटण्याची धडपड सुरू केली तसा तसा तो दोरखंड अधिक जाड होत ते लाल मांस त्यांच्या शरीराभोवती सर्वत्र पसरू लागले .

     " जास्त हालचाल करू नका , अन्यथा गुदमरून मराल ...."  कनिष्क भिंतीवरून बोलला .
  " आश्चर्य  वाटले ना , भिंत पडली नाही आणि आपलाच विधी आपल्यावरतीच उलटला ....." चैतन्य आबाजीला डिवचत म्हणाला .
   " आम्हाला वाटलंच होतं त्या बिया मध्ये काहीतरी घोळ आहे म्हणून . पण आयुष्यमानच्या  डोक्यात मोहिनी बसलेली होती . मग आम्ही दोघांनी तपास केला तेव्हा आम्हाला विश्वनाथ उर्फ वेड्या आबाजीचे कारणामे कळाले .  .." कनिष्क बोलत होता . " सर्व ज्येष्ठांचे खून घडवून आणले पण मोहिनीचे वडीलही ज्येष्ठ होते हे तू विसरला वाटतं .  त्यांच्याकडून सारी माहिती काढली व तुझा डाव तुझ्यावरतीच उलटवला.....

       विश्वनाथ मात्र वेड्यासारखा हसत सुटला .
     " मला कल्पना होतीच असं काहीतरी होईल म्हणून.  म्हणूनच मी पूर्वतयारी केली होती ...." त्यांनी त्याच्या गळ्यातला दोर तोंडाने ओढला . कसलीतरी धूळ उडाली व विश्वनाथ तिथून गायब झाला .

   विश्वनाथ गायब झाला होता , पण भैरव आणि पार्थ दोघे तिथेच होते .
   " या दोघांचं काय करायचं...."  चैतन्य म्हणाला .
      " या दोघांनीच तर सारा गोंधळ माजवलाय .  प्रलय काय प्रलयकारिका काय ......"  कनिष्क भिंतीपलीकडे रागाच्या भरात गेला.  त्याने दोघांचेही गुडघ्यापासून पाय व कोपरापासून हात तोडून टाकले.  दोघेही गुरासारखे ओरडत होते .  पण त्यांना काही करताहेत नव्हतं . कारण दोघेही भिंतीला पुतळ्याप्रमाणे चिटकले होते . जखमांमधून रक्त वाहत होतं . वाहणारं रक्त थांबावं म्हणून कनिष्काने कसलीतरी भुकटी त्या जखमांवरती  टाकली . 
            भैरव हा साऱ्या पृथ्वीतलावरती राज्य करायला निघाला होता . साऱ्या काही गोष्टीचं त्यांनं नियोजन केलं होतं . पण प्रत्येक गोष्ट नियोजन करून करता येते असं नाही . सारंकाही नियोजन केल्याप्रमाणे घडतच असं नाही.....

      लोहगड ताब्यात घेतल्यानंतर पुन्हा एकदा असा उठाव होऊ नये म्हणून अंकितने एक उत्सव ठेवला होता .  नाव उत्सवाचे होते खरे पण कारण होते लोक एकत्र यावे .  एकमेकांबद्दलचा द्वेषभाव कमी व्हावा .  हेवेदावे काही असतील तर ते बाहेर पडावेत . पण हा उत्सव रक्तरंजित होणार होता . कारण प्रलयकारीका तिथे पोहचली होती .  भैरवाने सांगितल्याप्रमाणे संसाधन राज्यावरती सत्ता प्रस्थापित करण्यासाठी ती त्या ठिकाणी आली होती .  प्रलयकारीकेला अंकितचा शिरच्छेद सहज करता आला असता .   सार्‍या संसाधन राज्य  सत्ता गाजवण्यासाठी फक्त तिच्या डोळेच भरपूर होते .  पण तिच्या डोक्यात एक क्रूर खेळाची कल्पना भरली होती .

     ती हवेत उंच उडाली . तिचे डोळे आता पूर्णपणे काळेकुट्ट होते .  तिच्या संपूर्ण शरीरावर ती काळसर वलय होते  . त्या ठिकाणचा प्रत्येक जण जागेला स्थिर झाला .  कोणालाही त्याच्या इच्छेप्रमाणे हालचाल करता येईना .
      " मी या क्षणी तुम्हा साऱ्यांना जागीच ठार करू शकते .  पण त्यात काहीच मज्जा नाही . त्यामुळे तुमच्यातल्या काही लोकांना जगण्याची संधी मी देणार आहे . मला फक्त तुमच्या राजाचे मस्तक हवे आहे .  जो कोणी मला ते  मस्तक  देईल , तो पुढचा राजा असेल .  आणि त्याला जे हवे आहेत तेच लोक फक्त जिवंत राहतील .......
   
      आणि तिने साऱ्यांना हालचाल करण्याची मुभा दिली .  त्याबरोबर दहा-पंधरा सैनिक शस्त्रांकडे  धावले .     
       " अरे वा  इतक्या लवकर तुटली का तुमची ऐकी....... "  सैनिकांनी घेतलेले  भाले प्रलयकारिकेकडे  फेकून मारले .  तिने ते सहजपणे चुकवले . " ही मात्र फार मोठी चूक केली .......
     असं म्हणत तिने  तिच्या त्यांची हालचाल केली . ते पंधरा सैनिक एकमेकांवर धावून गेले . स्वतःची इच्छा नसतानाही त्यांनी स्वतःच्याच मित्रांना जीवे मारले .  एकमेकांची मस्तके धडावेगळी केली .  बाकीचे लोक अजूनही जागेला स्थिर होते .
       " या खेळात काही मज्जा आली नाही . आपण एक नवीन खेळ खेळूया .  जर तुमच्या राजाने उजव्या हातातील तलवारीने त्याचा डावा हात कापला नाही तर ही लहान मुले मरतील ......     त्याचवेळी तेथील सैनिकांनी लहान मुलांना उचलून घेतले व  त्यांच्या गळ्याला चाकू लावला . त्यांच्या इच्छेविरुद्ध त्यांचे शरीर काम करत होते.  साऱ्यांच्या शरीरावर तिचे  नियंत्रण होते .
           " अंकित मला सांग बर तुझा हात महत्वाचा आहे की या लहान मुलांचे आयुष्य  .... लवकर ठरव नाहीतर एक एक  लहान मूल मरेल बघ ......
         अंकितने तलवार घेतली व हात जमिनीवर ठेवला .  तो हात तोडण्यासाठी तयार होता . त्याला हात तोडावाच लागणार होता . कारण ती लहान मुलांचा जीव घ्यायला मागेपुढे बघणार नव्हती . त्याने तलवार जोरात उचलली आणि एक किंकाळी घुमली .  त्याचा हात मनगटापासून तुटून  पडला होता .  रक्ताच्या धारा वहात होत्या .
     "   अरे वा राजाचे खरेच प्रेम आहे म्हणायचे.... "  सैनिकांनी त्या लहान मुलांना खाली सोडले .  मात्र  तिच्या डोक्यात आता वेगळीच युक्ती आली होती . तिने त्या लहान मुलांच्या हातात तलवारी उचलायला लावल्या होत्या . त्या  तलवारींनी तिने सैनिकांना मारून टाकले .  तिने लहान मुलांच्या हस्ते त्या सैनिकांच्या हत्या घडवल्या होत्या .

     संसाधन राज्यात रक्तरंजित खेळ सुरू असतानाच आग्नेय राज्यात त्या तीन बहिणींनी प्रलयकारिकेला थांबवण्यासाठी विधी सुरू केला होता . प्रत्येकीच्या गर्भाशयात एका राजाची बीज होते . तिघांचेही हात  एकमेकींच्या हातात  होते व तिघीही कोणतातरी मंत्र गुणगुणत होत्या .  त्या ठिकाणी काही वेळानंतर अग्नि जल आणि वायूचा एकावेळी तांडव सुरू झाला .  प्रत्येकीच्या गर्भातून एक दिव्य प्रकाश बाहेर पडत होता .  एक तांबडा अग्नीसारखा , एक निळा  पाण्यासारखा आणि पांढरट वायुसारखा . तीन रंगाचे तीन धागे एकत्र येत एक मानवी आकृती तयार झाली व हवेत विरून गेली . त्या तिघीही जागीच बेशुद्ध झाल्या .
             त्याच अग्नि जल आणि वायू च्या शक्तीपासून बनलेल्या मानवी आकृती ने अंकितची निवड केली होती .  तुटलेला हात नीट होत त्याने त्याचे रूप बदलले . तो अधिक उंच धिप्पाड होत गेला . साधारण मानवापेक्षा तीन ते चार पटीने तो उंच धिप्पाड होता . त्याची शक्तीही कितीतरी पटीने अधिक होती . त्याच्यावरती आता प्रलयकारिकेचे नियंत्रण चालत नव्हते . तो सरळ तिच्या वरती धावून गेला . हवेत मध्यंतरी तरंगणाऱ्या प्रलयकारीकेला खाली पाडत त्याने तिला  दगडावरती जोरात आपटले . ती पडलेली असताना त्यांनी बाजूला पडलेला एक मोठा दगड घेऊन तिच्यावरती फेकला पण तिने तो दगड चुकवला . तिने तिच्या नियंत्रणाखाली असलेली सामान्य माणसे अंकितवरती पाठवून दिली व ती पळून जाऊ लागली . पण अंकितने उंच उडी मारत हवेतच तिला पकडले . एका हातात तलवार घेऊन तो तिच्यावर ती चालवणार तेव्हाच सुरूकु तिथे आला .

    अंकितला तोंडात पकडत त्याने लांब फेकून दिले .  तोपर्यंत आयुष्यमान प्रलयकारी केला घेत सुरूकू रती बसला व तिघेही तिथून निघून गेले ...

No comments:

Post a Comment