त्याने पाहिले , तो पाहत होता ,आणि तो पाहतच राहिला . त्याने अंजलीला पाहिलेच होते . तेव्हाही तो चाट पडला होता. पण या सौंदर्यावर तो मनातून मोहित झाला होता. त्यात वासना नव्हती ,ना प्रेम होतं . त्याच आकर्षण होतं . एक वेगळं समाधान होतं .
" गणेश ......"
तिचे ओठ विलग झाले . थोडी हालचाल झाली , पण गाण्याच्या कानापर्यंत कोणताच आवाज पोहोचला नाही .
तो एका वेगळ्याच विश्वात , एका वेगळ्या मितीत पोहोचला होता . त्याने पूर्वी दोन वेळा अशा सुंदर रूपवतींना पाहिले होते . पहिली म्हणजे शेवंता व दुसरी अंजली . पण या रुपाचे सौंदर्य काही औरच होते . गण्यासाठी जणू आजूबाजूचा स्थल-काल अनंत काळासाठी त्याच क्षणावर थांबला होता . किती वेळ झाला होता काय माहित ? तिचे सौंदर्य , ते रूप कितीही पाहिले तरी जूनं होतच नव्हतं .
इतका वेळ स्तब्ध असणाऱ्या त्या वातावरणात अचानक हालचालींचा वेग वाढला .त्याच्या सर्वांगावर शिरशीरी येऊन गेली . नि इतका वेळ फक्त डोळ्यांच्या संवेदना वाचण्यात गुंग असलेल्या मेंदूला इतर ज्ञानेंद्रियांची संवेदना वाचायला वेळ मिळाला. मग अचानक कानामध्ये आवाज वाढले . त्वचेला वेदना झाल्या . डोळ्यांनाही त्या रूपाला सोडून इतर परिसराची जाणीव झाली .
" तू तर फारच बिघडलेला निघाला की रे ...!
तो पोलीस अधिकारी म्हणाला ज्याने त्याला सोडवून आणलं होतं त्यानेच त्याच्या पाठीत धपाटा घालत गन्याला ताळ्यावर आणले .
" अरे ऐक तर ती काय म्हणते " तोच म्हणाला ..
गन्याने तिच्याकडे पाहिले ...
"आता काही नाही म्हणणार ती , आता मीच सांगतो टेबलावरती गरम-गरम जेवण वाढले आहे , जेवून घे , मग बोलू....
जेवण म्हटल्यानंतर त्याच्या पोटात आगीचा डोंब उसळला . भूक इतकी लागली होती की त्याला काही सुचलं नाही , तो सरळ टेबलाकडे निघाला .
" अरे आंघोळ वगैरे तर कर ...
" करतो , करतो विसरलोच....
सगळा कार्यभाग आटपून तो जेवायला बसला . त्याच्या आयुष्यात त्याने प्रथमच इतके स्वादिष्ट जेवन चाखले असावे . त्याला तिच्या हाताची चव फार आवडली .
" जेवण फार चविष्ट झालेय अं ....
आणि त्याने तिच्याकडे कटाक्ष टाकला .
" तिच्याकडे बघुन नको , तिनं नाही बनवलं . हॉटेलमधून मागून ठेवलं होतं काल , तिने फक्त गरम केलंय....
या प्रात्यक्षिक विनोदावर तिने हळूच हसून आपला प्रतिसाद दिला . हा विनोद जरी गण्या वरती झाला असला , तरी त्याला वाईट वाटलं नाही . उलट तिला हसताना पाहून पुन्हा एकदा त्याच स्थल-काल स्तब्ध होणार होतं , पण यावेळी त्या पोलिस अधिकाऱ्याने अगोदरच सपाटा लावला . त्यामुळे त्याला ठसकाही लागला...
" असू दे , असू दे नाहीतर पुन्हा एकदा स्तब्ध झाला असता...."
जेवण आटोपल्यावर ते तिघेही सोप्या वरती बसले . त्या पोलिस अधिकाऱ्याने बोलायला सुरुवात केली .
' मी रामचंद्र इंगळे शहरात सध्या जी सिरीयल किलींग चालू आहे , त्यासाठी नेमलेल्या विशेष तपासणी पथकाचा प्रमुख आणि ती मुलगी शैला . मलाही तिच्याबद्दल एवढंच माहित आहे . तुझ्या मनात बरेच प्रश्न पडले असतील मी माझ्या परीने त्या प्रश्नांची उत्तरे द्यायचा प्रयत्न करतो . आणि काही गोष्टी शैला तुला सांगणार आहे पण आधी मी सांगतो ...
हे सिरीयल किलिंगचा प्रकरण ऐकून माझ्या कानावर आलं होतं . पण त्याच्या तपासणी पथकात माझी प्रमुख म्हणून निवड होईल असं वाटलं नव्हतं . कारण निवृत्त होऊन मला दोन वर्षे उलटली होती . माझ्या तब्येतीकडे बघून वाटत नसेल तुम्हाला माझं वय इतकं असेल पण वय जरी थांबवता येत नसलं तरी तब्येत सांभाळा येते . त्या दिवशी मंत्री साहेबांचा फोन आला त्यांनी प्रकरण सांगितलं . नाही म्हणायचा विषय नव्हता , कारण मी बऱ्याच अशा केस सोडवल्या आहेत ज्या सर्वांनी अशक्य म्हणून बंद करून टाकल्या होत्या . मग ही तर किरकोळ केस होती .
मी तपासावर रुजू झालो तेव्हा दोन खून झालेच होते . तेही एकाच पद्धतीने . मी ज्या दिवशी रुजू झालो त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी एक खून झाला . मी त्या ठिकाणी पोहोचलो सर्व खोली रक्ताने माखली होती . एक भयानक दुर्गंधी संपूर्ण खोली मध्ये पसरली होती . ज्याचा खून झाला होता त्याच्या शरीरावर मांस शिल्लकच नव्हते . मागच्या दोन्ही वेळेस असे झाले होते . फॉरेन्सिकचा म्हणण्यानुसार खून करण्यासाठी कोणत्या तरी सरपटणाऱ्या प्राण्यांचा वापर केला जात होता . जसं एखाद्या जळवाचा . पण आतापर्यंत दोन्ही ठिकाणी एकही सरपटणारा प्राणी सापडला नव्हता . मात्र यावेळी त्या माणसाच्या हातात काहीतरी होतं . आम्ही उघडून पाहिलं तर त्याच्या हातात एक गोगलगाय होती .
त्या गोगलगाई ची ही आम्ही तपासणी केली . ती काही वेगळी नव्हती . नेहमी असते तशीच होती . मला कळेच ना की गोगलगायीचा वापर एखादा खून करण्यासाठी कसा केला जाऊ शकतो .....? आणि इतक्या मोठ्या प्रमाणावर गोगलगाय आणणार कशा......?
सगळा तपास चालू असताना मला त्याच्या (म्हणजे ज्याचा खून झाला होता तो ) टेबलाच्या ड्रॉवरमध्ये एक डायरी सापडली . ती उघडून बघितली की डायरी पूर्ण कोरी होती . मला कधीच काही लिहायचा शौक नाही पण त्यादिवशी मला इतकी तीव्र इच्छा झाली की आपण की डायरी लिहायला हवी . मग मी तिथून चक्क चोरून घरी आली व लिहायला चालू केली
मी पहिल्या दिवशी जरा सविस्तर लिहिले . दुसऱ्या दिवशी फारच तोकडी लिहिली , आणि यावरून मला एक धक्कादायक गोष्ट समजली .
मी पहिल्या दिवशी मंत्री साहेबाबद्दल लिहिलं होतं . दुसऱ्या दिवशी कळालं की हार्ट अटॅक मुळे त्यांचा मृत्यू झाला . पण ते साफ खोटं होतं . मला थोडा तपास करता समजले की त्यांचाही मृत्यू त्याच पद्धतीने झाला होता , आणि ते मुद्दाम लपवलं होतं . ते बरोबरही होतं जितला मंत्री सुरक्षित नाही तिथले लोक कसे सुरक्षित राहतील ..?
मला मनात एक गोष्ट जाणवली की मुळात आपल्याला लिहायची सवय नाही ती डायरी आल्यापासून आपण लिहायला लागलो . पहिल्याच दिवशी मी डायरीमध्ये मंत्री साहेबांबरोबर दोघांचा उल्लेख केला होता आणि ज्यांचा उल्लेख केला होता त्याचापैकी एकाचा मृत्यू झाला . पण मला हा योगायोग वाटला म्हणून मी दुसऱ्या दिवशी त्याची चाचपणी करायची ठरवली . दुसऱ्या दिवशी मी मुद्दामूनच त्रोटक आणि कृत्रिम माहिती लिहिली . त्या माहितीमध्ये मी एका तुरुंगातल्या कैद याबद्दल लिहिलं होतं जी संपूर्णपणे बनावट होती . पण दुसऱ्या दिवशी बरोबर तुरुंगातील एका कैद्याचा मृत्यू झाला .
मला कळालं नाही किमी तुरुंगातल्या कैद्याला भेटलोच नव्हतो . ही हकिकत बनावट व कृत्रिम होती , तरीही तुरुंगातल्या कैद्याचा मृत्यू का झाला ....? नंतर मी जेव्हा विचार केला तेव्हा मला कळलं की मी डायरीत ती कृत्रिम हकीकत लिहीत असताना त्याच कैद्याचा विचार करत होतो ज्याचा दुसऱ्या दिवशी खून झाला होता....!
काल रात्री जेव्हा मला या साऱ्यांचा उलगडा झाला तेव्हा मी लिहिलेली पाने काढून बाजूला ठेवली . नंतर मला वाटलं की ती डायरीच जाळून टाकावी , पण जेव्हा मी हा सर्व विचार करत होतो माझ्या पुढे ती डायरी मी उघडून ठेवली होती . मी उठलो ती डायरी डस्टबिन मधे टाकली . मी लाईटर शोधू लागलो , तेव्हाच तिथे सर्वत्र गोगलगायींचा गराडा पडू लागला . मला वाटतं मी डायरी उघडून तिच्यापुढे बसून सारे विचार केल्यामुळे त्यांना माझे विचार कळाले असावेत त्यामुळे त्यांनी माझा नाश करण्यासाठी गोगलगाईंना पाठवलं असावं असं मला वाटतं .
मला माहित नाही मी त्या ठिकाणी किती वेळ बेशुद्ध होतो . नंतर तू मला सोडवलं . मग मी कसेतरी ऍम्ब्युलन्सला फोन केला आणि बेशुद्ध झालो . मला नंतर कळालं की दवाखान्यातील लोकांनी पोलीस स्टेशनला फोन केला होता.. शैला मला म्हणाली की तुला पोलिसांनी पकडलं आहे आणि हे सगळं निस्तारण्यासाठी तुझी गरज आहे . आणि तू निर्दोषही होता म्हणून मी तुला सोडून बाहेर आणलं...
रामचंद्र इंगळे साहेबांचा बोलून झालं होतं त्यांनी प्रश्नाची उत्तरे दिली पण गण्या मात्र अजूनच बुचकळ्यात पडला.....
तिच्या मधुर आवाजात ऐकत असताना त्याच्या समोर सारे शब्द दृश्यात रूपांतरित होत होते . शैला बोलत होती -
" आता तू म्हणशील कि मला हे सारं कसं कळलं वगैरे ....? तर ऐक , मीही एक प्रतिनिधीच आहे . तुझ्या सारखी . आपलं एकच काम आहे ते म्हणजे त्यांचा विनाश . ज्या दृष्ट आणि पाशवी शक्तींबरोबर आपला संघर्ष चालू आहे त्यांच्यासोबत एकटा-दुकटा लढू शकत नाही . आपल्यासारखे अजूनही असतील त्यांचा ही त्या शक्तींविरुद्ध लढा चालू असेल . ज्याला-त्याला , ज्याच्या-त्याच्या कामगिरी वाटून दिल्या आहेत . आतापर्यंत तु तुझी कामगिरी करत होता ; मी माझी कामगिरी करत होते . आता आपल्याला मिळून एक कार्य पूर्ण करायचं आहे . आपल्याबरोबर अजूनही येथील , पण तूर्तास तरी आपल्यालाच पुढची पावले टाकायला हवीत . तेही अगदी जपून .
" पण शैला मला एक सांग तुला माझ्या आणि गणेश च्या संदर्भात सारं कसं कळालं ...?
तो रामचंद्र इंगळे म्हणजेच पोलिस विचारत होता .
" तुम्हाला एखादं काम दिलं तर ते काम कसं करायचं हे सुद्धा सांगितलं जातं . आपल्याला फक्त सांगितलेलं करायचं असतं . एक मात्र खरं आहे आपल्याला ओळखायला यायला हवं की आपल्याला नक्की काय काम सांगितलेलं आहे....?
आणि सांगण्याच्याही बर्याच पद्धती असतात . ज्या त्या व्यक्तीच्या जाणिवा , मानसिक शक्ती , खंबीरता व कुवतीवर त्याला ते संदेश पोहोचवले जातात . मला म्हणाल तर अंतरात जाणीव होते , काही चित्रे व रेखाटने साकारली जातात , त्याबरोबर काही शब्द लिहिले , जातात बऱ्याच वेळा सारं काही माहित असल्या सारखं मला आपोआप उमगंतं की आता आपल्याला काय करायला पाहिजे.....? "
" तेच म्हणतो मी काय करायचं .....?
पुन्हा इंगळे साहेब म्हणाले
गण्याच्या प्रश्नाची थोडीबहुत उत्तरे त्याला मिळाली होती . पण अजूनही त्याच्यापुढे कृतीचा रस्ता अस्पष्टच होता . त्याला मार्गच दिसत नव्हता . अचानक त्याच्या ध्यानात बप्पां व त्यांचा मठ आला .
" आपण बप्पाच्या मठात जाऊया ; बप्पांनी आपल्यासाठी काहीतरी चिट्ठी वगैरे सोडली असेलच . ते स्वत:ही असतील तिथे.
" कोण बप्पा..?
दोघेही एकदमच म्हणाले
" चला गाडी काढा ,.जाता - जाता सांगतो ....
पुन्हा एकदा ते मठाकडे निघाले
गाडी मठापाशी पोहोचली . गण्या उतरून पळतच निघाला . उत्सुकतेपोटी त्याला दोघांचेही भान राहिलं नाही . त्याने दार उघडलं आणि आत पाऊल टाकले . त्याच्या डोळ्यावर विश्वास बसेना तो मठ नव्हताच . अगोदर जे पाहिले ते वेगळेच आणि आता पाहतो तर त्या जागेचे रुपच बदलले होते . सर्वत्र जाळ्या लागल्या होत्या . जणु काही तो बंगला कैक वर्षे बंद होता . सर्वत्र धूळ नि पालापाचोळा साचला होता . कोणीही ती जागा पाहून जराही विचार न करता सांगितलं असतं की ती जागा कैक वर्षे मानवी वापरात नव्हती . मानवी वास्तव्याची पुसटशीही खून त्याठिकाणी दिसत नव्हती . गाण्याला कळालच नाही की तो फक्त एकटाच त्या खोलीत आला होता . ती खोली बाप्पांच्या माठातील नव्हतीच . त्याला अंजलीने येथे आणले होते . फक्त त्यालाच.....
" गणेश .....
कातळ काळोखातील घनगंभीर शांततेला चिरत आलेल्या आवाजाने गण्या दचकला . जेव्हा अंजलीचा आवाज त्याने ओळखला तेव्हा निर्धास्त होऊन त्या आवाजाला त्याने प्रतिसाद दिला
" मला इथे का आणले ...?
" तुला काहीतरी सांगायचं , काही तरी दाखवायचंय.....
" काय...?
ती सांगू लागली -
" तू मला नेहमी विचारतोस ना ... लहानपणा नंतर मी कुठे गेले...? माझ्यासोबत नंतर काय झालं ...? मी ही अशी का झाले ..? आणि माझी मुक्ती कशी होणार...? मला तुला सारे काही सांगायचं . सांगायचं आहे म्हणण्यापेक्षा , दाखवायचं आहे . तुला मी सारं काही दाखवते ; त्यानंतरच तू ठरव तुला व तुझ्या साथीदारांना काय करायला पाहिजे .
तो मध्यभागी एका सिंहासन सारख्या दिसणाऱ्या सोनेरी , मखमली खुर्चीवर बसला . त्याच्या चारी बाजूंना अंधार होता . कुठेतरी एक सोनेरी प्रकाश शलाका चमकली ; व छोटासा विस्फोट झाला . त्यानंतर त्याच्या चारी बाजूला तेच सोनेरी रंगाचे विस्फोट होत गेले . त्यातून विविध रंग बाहेर पडू लागले व पसरू लागले . जणू काही कोणतातरी चित्रकार त्याच्या कुंचल्याच्या फटक्याने त्रिमितीय चित्र काढत होता....
किती रमणीय देखावा होता . ते मोठे वडाचे झाड होते . त्याच्या पारंब्या जमिनीपर्यंत पसरल्या होत्या . त्या वडाच्या झाडाला कितीतरी पक्षांनी आपलं घर बनवलं होतं . त्यांच्या त्या किलबिल आवाजाला दोन मुलांच्या खेळण्या चा आवाज साथ देत होता . त्यात एक मुलगा व एक मुलगी होती . त्यांचा शिवाशिवीचा खेळ चालू होता . मुलगा पुढे पळत होता व मुलगी मागे . मुलगा भरभर पारंब्यावरून चढत जात होता . तोच गणेश , त्याने स्वतःला ओळखलं . त्याच्यामागे तीच होती , अंजली . तीपण पारंब्या वर चढत होती . तो वरपर्यंत पोहोचला . तिला सापडू नये म्हणून तो जोरात पळू लागला . पण त्याचा पाय घसरला . तो पडणारच होता , पण किती चपळतेने उडी मारून त्याचा हात धरून तिने त्याला वर घेतले .....
पुन्हा एकदा डोळे दिपवणारा प्रकाश चकाकला . त्याची तीव्रता इतकी होती , की काही सेकंद त्याने डोळे उघडले नाहीत . त्याच्या झाकलेल्या डोळ्यापुढे काळ्या , निळ्या जांभळ्या , लाल नि गुलाबी ज्वाला झळकत होत्या . त्याने डोळे उघडले तेव्हा त्याच्यापुढे एक खोली होती . त्याला आठवलं की ती अंजलीच्या घरातील खोली होती . एक दारुडा रंग झडून गेलेल्या सतरंजीवर आणि पापुद्रे निघालेल्या भिंतीला टेकून ; त्याच्या घाणेरड्या हाताला न शोभणाऱ्या चकाकणाऱ्या काचेच्या ग्लासात उंची दारू पीत होता . त्याच्यापुढे रंग उडालेल्या खुर्चीत एक माणूस सिगारेट फुकत बसला होता . त्या खोलीत डोकावून दुसरे एका माणसाने सांगितले ....' चल बे काम झाले ' . दूर कुठेतरी लहान मुलीच्या रडण्याचा आवाज येत होता . त्याला कळालं अंजलीच्या दारुड्या बापाने काही पैशासाठी स्वतःच्या मुलीला म्हणजे अंजली विकलं होतं .....!
पुन्हा एकदा समोरचा देखावा पालटला . आता ते एखाद्या संस्थेच्या कार्यालयात होते . एका खुर्चीवर पन्नाशी ओलांडलेला म्हातारा बसला होता . त्याच्या पुढे दोन इसम होते . तेच ते दोघे ज्यांनी अंजलीला विकत घेतलं होतं .
" थोड्या दिवस राहू दे तुझ्या अनाथाश्रमात , कळीचं फूल होईपर्यंत ....
" आता रेट वाढवलेला आहे आपण , जास्त पैसे द्यावे लागतील ....
तो पन्नाशी उलटलेल्या माणूस बोलला
" ठीक आहे...... कळतात सारे तुझे पण नखरे ......असू दे तरीपण .....
पुन्हा एकदा देखावा बदलला जिथे तो बसला होता त्या खोलीत आला......
" मी इतकी ही लहान नव्हते की काय चाललंय ते कळू नये.... मला सारं कळत होतं . पण मी काय करू शकत होते..? कुठे जाऊ शकत होते ..? माझा एकुलता एक आधार तो माझा बाप . त्यांनेच मला विकलं , मी त्यावेळी खरच अबला होते . मला कोणाचाच आधार नव्हता . बाहेरच्या जगात जगण्यासाठी ना माझ्याकडे कोणती कला होती , ना काम होतं , ना मला काही करता येत होतं ..... बाहेरच्या जगात माझ्या शरीरांवरती बोचणाऱ्या नजरा मला पदोपदी जाणवत होत्या . त्यामुळे तिथून पळून जायचं मी मुळीच प्रयत्न केला नाही . उलट तिथेच जमवून घेतलं अनाथाश्रमाच्या शाळेत शिकू लागले . चांगले गुण मिळवू लागले . मी मॅट्रिकला पहिला नंबर काढला . अनाथाश्रम चालवत होते त्यांच्या नजरेत मी आले . त्यांनी मला तिथून काढून दुसऱ्या वस्तीगृहात टाकले . मी त्या दलदलीतून इतक्या सहज सुटले कि मला आकाशही ठेंगणे वाटू लागले . मला घेऊन जाताना त्या म्हातारऱ्याने विरोध करायचा प्रयत्न केला . पण शेवटी त्याला झुकावं लागलं . नंतर मला कळाले की त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली ; पण मला माहित होतं ज्या दोघांनी मला विकत घेतलं होतं त्या दोघांच्या हातून मी नसल्यामुळे त्या म्हाताऱ्याचा त्यांनीच खून केला होता ....
कॉलेज झालं . तिथेही मी चमकलेच . नंतर ग्रॅज्युएशनसाठी माझा नंबर एमबीबीएसला मेरीट मध्ये बसला . तिथेच असताना माझ्या आयुष्यात तो आला . माझ्या निराधार मनाला त्याने आधार दिला . तो माझा , माझ्या आयुष्याचा साथीदार बनला . आमच्या लपून-छपून गाठीभेटी होऊ लागल्या ....
आणि आवाज थांबला . पुन्हा एकदा आजूबाजूचा देखावा पालटला
ती एक बेडरूम होती . मधुचंद्रासाठी सजवतात तशी सजवली होती . तीच ती रूपवती अंजली बसली होती . गाण्याच्या काळजात नकळत एक घाव पडलाच पण पुढची दृश्य पाहून त्याचं ह्रदयच पिळवटून निघाले . त्या खोलीत तिचा तथाकथित साथीदार आलाच नाही . आलं होतं ते दुसरीच कुणीतरी , कोणीतरी म्हणण्यापेक्षा काहीतरी ....
काळा आकार, पोत्यामध्ये माती भरावी तसा , अवाढव्य अस्ता- व्यस्त ,संपूर्ण शरीरावर ती लांब लांब काळे केस ते मानवी शरीर नव्हतंच .... काही दृश्य त्याच्या अंतर्मनावर उमटताच त्याने डोळे मिटून घेतले . नंतर खोली तिच्या किंचाळण्याने , भयानक दुर्गंधीने , रक्ताचे शिंतोडे आणि ग्लब-ग्लब करून काहीतरी खाण्याच्या आवाजाने भरून गेली.....
मी ज्याच्यावर ती सर्वस्व अर्पण केलं होतं ; त्यानं मला एका बळीसाठी अर्पण केलं . तो एका नीच , अधम पंथाचा उपासक होता . त्याने बळीसाठी ठराविक अटींमुळे माझी निवड केली होती . हेतुपूर्वक माझ्याभोवती जाळे गुंफले होते . त्या पिशाच्याच्याने माझा उपभोग घेऊन मलाच भक्ष्य बनवलं . माझा मृत्यू झाला खरा पण मी मुक्त झालेच नाही . मला कळालं नाही की मी भूत बनून का वावरत होते ....? मला राग आला . भयानक राग आला . माझा बळी दिला होता आणि ज्याने घेतला होता त्यांचा.... मी रागाने दोघांवरही चाल करून जाणार होते . माझं काहीही हो, मला त्यांना सोडायचं नव्हंतं . पण मला तेव्हाच इतकी तीव्र अंतर-प्रेरणा झाली की ~' योग वेळेसाठी थांब . प्रत्येकाला त्याने केलेल्या कर्माचे फळ मिळतं . कुणीही कितीही वाईट असू दे , पापाचा घडा भरला की तो संपतोच . म्हणून तू प्रतीक्षा कर. योग्य वेळेची वाट पहा .' मग वेळोवेळी अशा गोष्टी जाणवतच गेल्या . अशा गोष्टी मुळेच मी तुला वाचवायला त्या टेकडीवर पोहोचलो जिथे तू स्वतःहून बळी जायला निघाला होता . नंतर मी वेळोवेळी तुझ्या स्वप्नात आले , घडणाऱ्या गोष्टी सांगितल्या , या सर्व गोष्टी त्यांनी घडवून आणल्या आहेत . या सर्व गोष्टी मागे त्यांचा हात आहे . त्याच शक्ती , ज्या दुष्ट अमानवी पाशवी अमंगलमय शक्ती विरुद्ध लढत आहेत.
आत्ताच ती वेळ आली आहे . त्यांच्या नाशाचा काळ जवळ आला आहे . त्यांचे विनाशक आपणच आहोत . आपल्यामागे त्या शक्तींचा बळ आहे . फक्त तु तुझ्या साथीदारांना घेऊन योग्य जागी पोहोचायचयं....
" कोणती जागा ....?
" तीच ती , मी पहिल्यांदा तुला घेऊन गेले होते ती ...
" _ _ व फार्महाउस .... ?
" हो तेच तेच ते फार्महाउस आहे जिथे माझा व माझ्यासारख्या कित्येकांच्या बळी दिला गेला आहे.....!
तो शुद्धीवर आला तो बप्पांच्या मठाच्या हॉलमध्येच होता .
" म्हणजे मला हे सारं सांगण्यासाठी अंजलीने केलं होतं ....
" काय बोलतोय गणेश ...? काय केलं होतं ...? कोण अंजली....? "
आपल्या मधुर आवाजात शैला विचारत होती . गण्याने तिला जत्रेपासूनची कहाणी व आता कळलेला सारा वृत्तांत सांगितला .
" मग आपल्याला लवकरात लवकर त्या फार्महाउस ला पोहोचलं पाहिजे...
रामचंद्र इंगळे साहेब म्हणत होते .
" हो जायलाच पाहिजे ....." शैला ही म्हणाली
" थांबा जरा ... बप्पांनी माझ्या नावाची डायरी लिहिली होती. त्यामध्ये आपल्याला काहीतरी सापडेल.....
तीच ती डायरी जेव्हा गण्या पहिल्यांदा आला होता आणि इकडे तिकडे शोधाशोध करताना त्याचं नाव लिहिलेलं ती डायरी त्याला सापडली होती . त्या डायरीत त्याच्याबरोबर घडलेल्या घटना लिहिल्या होत्या . त्यांनी शोधाशोध केली पण डायरी काही सापडली नाही .
शेवटी गण्या , शैला व तो पोलीस रामचंद्र इंगळे तिघेही फार्महाऊसकडे निघाले . तेथेच साऱ्या गोष्टींचा उलगडा होणार होता
" गणेश ......"
तिचे ओठ विलग झाले . थोडी हालचाल झाली , पण गाण्याच्या कानापर्यंत कोणताच आवाज पोहोचला नाही .
तो एका वेगळ्याच विश्वात , एका वेगळ्या मितीत पोहोचला होता . त्याने पूर्वी दोन वेळा अशा सुंदर रूपवतींना पाहिले होते . पहिली म्हणजे शेवंता व दुसरी अंजली . पण या रुपाचे सौंदर्य काही औरच होते . गण्यासाठी जणू आजूबाजूचा स्थल-काल अनंत काळासाठी त्याच क्षणावर थांबला होता . किती वेळ झाला होता काय माहित ? तिचे सौंदर्य , ते रूप कितीही पाहिले तरी जूनं होतच नव्हतं .
इतका वेळ स्तब्ध असणाऱ्या त्या वातावरणात अचानक हालचालींचा वेग वाढला .त्याच्या सर्वांगावर शिरशीरी येऊन गेली . नि इतका वेळ फक्त डोळ्यांच्या संवेदना वाचण्यात गुंग असलेल्या मेंदूला इतर ज्ञानेंद्रियांची संवेदना वाचायला वेळ मिळाला. मग अचानक कानामध्ये आवाज वाढले . त्वचेला वेदना झाल्या . डोळ्यांनाही त्या रूपाला सोडून इतर परिसराची जाणीव झाली .
" तू तर फारच बिघडलेला निघाला की रे ...!
तो पोलीस अधिकारी म्हणाला ज्याने त्याला सोडवून आणलं होतं त्यानेच त्याच्या पाठीत धपाटा घालत गन्याला ताळ्यावर आणले .
" अरे ऐक तर ती काय म्हणते " तोच म्हणाला ..
गन्याने तिच्याकडे पाहिले ...
"आता काही नाही म्हणणार ती , आता मीच सांगतो टेबलावरती गरम-गरम जेवण वाढले आहे , जेवून घे , मग बोलू....
जेवण म्हटल्यानंतर त्याच्या पोटात आगीचा डोंब उसळला . भूक इतकी लागली होती की त्याला काही सुचलं नाही , तो सरळ टेबलाकडे निघाला .
" अरे आंघोळ वगैरे तर कर ...
" करतो , करतो विसरलोच....
सगळा कार्यभाग आटपून तो जेवायला बसला . त्याच्या आयुष्यात त्याने प्रथमच इतके स्वादिष्ट जेवन चाखले असावे . त्याला तिच्या हाताची चव फार आवडली .
" जेवण फार चविष्ट झालेय अं ....
आणि त्याने तिच्याकडे कटाक्ष टाकला .
" तिच्याकडे बघुन नको , तिनं नाही बनवलं . हॉटेलमधून मागून ठेवलं होतं काल , तिने फक्त गरम केलंय....
या प्रात्यक्षिक विनोदावर तिने हळूच हसून आपला प्रतिसाद दिला . हा विनोद जरी गण्या वरती झाला असला , तरी त्याला वाईट वाटलं नाही . उलट तिला हसताना पाहून पुन्हा एकदा त्याच स्थल-काल स्तब्ध होणार होतं , पण यावेळी त्या पोलिस अधिकाऱ्याने अगोदरच सपाटा लावला . त्यामुळे त्याला ठसकाही लागला...
" असू दे , असू दे नाहीतर पुन्हा एकदा स्तब्ध झाला असता...."
जेवण आटोपल्यावर ते तिघेही सोप्या वरती बसले . त्या पोलिस अधिकाऱ्याने बोलायला सुरुवात केली .
' मी रामचंद्र इंगळे शहरात सध्या जी सिरीयल किलींग चालू आहे , त्यासाठी नेमलेल्या विशेष तपासणी पथकाचा प्रमुख आणि ती मुलगी शैला . मलाही तिच्याबद्दल एवढंच माहित आहे . तुझ्या मनात बरेच प्रश्न पडले असतील मी माझ्या परीने त्या प्रश्नांची उत्तरे द्यायचा प्रयत्न करतो . आणि काही गोष्टी शैला तुला सांगणार आहे पण आधी मी सांगतो ...
हे सिरीयल किलिंगचा प्रकरण ऐकून माझ्या कानावर आलं होतं . पण त्याच्या तपासणी पथकात माझी प्रमुख म्हणून निवड होईल असं वाटलं नव्हतं . कारण निवृत्त होऊन मला दोन वर्षे उलटली होती . माझ्या तब्येतीकडे बघून वाटत नसेल तुम्हाला माझं वय इतकं असेल पण वय जरी थांबवता येत नसलं तरी तब्येत सांभाळा येते . त्या दिवशी मंत्री साहेबांचा फोन आला त्यांनी प्रकरण सांगितलं . नाही म्हणायचा विषय नव्हता , कारण मी बऱ्याच अशा केस सोडवल्या आहेत ज्या सर्वांनी अशक्य म्हणून बंद करून टाकल्या होत्या . मग ही तर किरकोळ केस होती .
मी तपासावर रुजू झालो तेव्हा दोन खून झालेच होते . तेही एकाच पद्धतीने . मी ज्या दिवशी रुजू झालो त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी एक खून झाला . मी त्या ठिकाणी पोहोचलो सर्व खोली रक्ताने माखली होती . एक भयानक दुर्गंधी संपूर्ण खोली मध्ये पसरली होती . ज्याचा खून झाला होता त्याच्या शरीरावर मांस शिल्लकच नव्हते . मागच्या दोन्ही वेळेस असे झाले होते . फॉरेन्सिकचा म्हणण्यानुसार खून करण्यासाठी कोणत्या तरी सरपटणाऱ्या प्राण्यांचा वापर केला जात होता . जसं एखाद्या जळवाचा . पण आतापर्यंत दोन्ही ठिकाणी एकही सरपटणारा प्राणी सापडला नव्हता . मात्र यावेळी त्या माणसाच्या हातात काहीतरी होतं . आम्ही उघडून पाहिलं तर त्याच्या हातात एक गोगलगाय होती .
त्या गोगलगाई ची ही आम्ही तपासणी केली . ती काही वेगळी नव्हती . नेहमी असते तशीच होती . मला कळेच ना की गोगलगायीचा वापर एखादा खून करण्यासाठी कसा केला जाऊ शकतो .....? आणि इतक्या मोठ्या प्रमाणावर गोगलगाय आणणार कशा......?
सगळा तपास चालू असताना मला त्याच्या (म्हणजे ज्याचा खून झाला होता तो ) टेबलाच्या ड्रॉवरमध्ये एक डायरी सापडली . ती उघडून बघितली की डायरी पूर्ण कोरी होती . मला कधीच काही लिहायचा शौक नाही पण त्यादिवशी मला इतकी तीव्र इच्छा झाली की आपण की डायरी लिहायला हवी . मग मी तिथून चक्क चोरून घरी आली व लिहायला चालू केली
मी पहिल्या दिवशी जरा सविस्तर लिहिले . दुसऱ्या दिवशी फारच तोकडी लिहिली , आणि यावरून मला एक धक्कादायक गोष्ट समजली .
मी पहिल्या दिवशी मंत्री साहेबाबद्दल लिहिलं होतं . दुसऱ्या दिवशी कळालं की हार्ट अटॅक मुळे त्यांचा मृत्यू झाला . पण ते साफ खोटं होतं . मला थोडा तपास करता समजले की त्यांचाही मृत्यू त्याच पद्धतीने झाला होता , आणि ते मुद्दाम लपवलं होतं . ते बरोबरही होतं जितला मंत्री सुरक्षित नाही तिथले लोक कसे सुरक्षित राहतील ..?
मला मनात एक गोष्ट जाणवली की मुळात आपल्याला लिहायची सवय नाही ती डायरी आल्यापासून आपण लिहायला लागलो . पहिल्याच दिवशी मी डायरीमध्ये मंत्री साहेबांबरोबर दोघांचा उल्लेख केला होता आणि ज्यांचा उल्लेख केला होता त्याचापैकी एकाचा मृत्यू झाला . पण मला हा योगायोग वाटला म्हणून मी दुसऱ्या दिवशी त्याची चाचपणी करायची ठरवली . दुसऱ्या दिवशी मी मुद्दामूनच त्रोटक आणि कृत्रिम माहिती लिहिली . त्या माहितीमध्ये मी एका तुरुंगातल्या कैद याबद्दल लिहिलं होतं जी संपूर्णपणे बनावट होती . पण दुसऱ्या दिवशी बरोबर तुरुंगातील एका कैद्याचा मृत्यू झाला .
मला कळालं नाही किमी तुरुंगातल्या कैद्याला भेटलोच नव्हतो . ही हकिकत बनावट व कृत्रिम होती , तरीही तुरुंगातल्या कैद्याचा मृत्यू का झाला ....? नंतर मी जेव्हा विचार केला तेव्हा मला कळलं की मी डायरीत ती कृत्रिम हकीकत लिहीत असताना त्याच कैद्याचा विचार करत होतो ज्याचा दुसऱ्या दिवशी खून झाला होता....!
काल रात्री जेव्हा मला या साऱ्यांचा उलगडा झाला तेव्हा मी लिहिलेली पाने काढून बाजूला ठेवली . नंतर मला वाटलं की ती डायरीच जाळून टाकावी , पण जेव्हा मी हा सर्व विचार करत होतो माझ्या पुढे ती डायरी मी उघडून ठेवली होती . मी उठलो ती डायरी डस्टबिन मधे टाकली . मी लाईटर शोधू लागलो , तेव्हाच तिथे सर्वत्र गोगलगायींचा गराडा पडू लागला . मला वाटतं मी डायरी उघडून तिच्यापुढे बसून सारे विचार केल्यामुळे त्यांना माझे विचार कळाले असावेत त्यामुळे त्यांनी माझा नाश करण्यासाठी गोगलगाईंना पाठवलं असावं असं मला वाटतं .
मला माहित नाही मी त्या ठिकाणी किती वेळ बेशुद्ध होतो . नंतर तू मला सोडवलं . मग मी कसेतरी ऍम्ब्युलन्सला फोन केला आणि बेशुद्ध झालो . मला नंतर कळालं की दवाखान्यातील लोकांनी पोलीस स्टेशनला फोन केला होता.. शैला मला म्हणाली की तुला पोलिसांनी पकडलं आहे आणि हे सगळं निस्तारण्यासाठी तुझी गरज आहे . आणि तू निर्दोषही होता म्हणून मी तुला सोडून बाहेर आणलं...
रामचंद्र इंगळे साहेबांचा बोलून झालं होतं त्यांनी प्रश्नाची उत्तरे दिली पण गण्या मात्र अजूनच बुचकळ्यात पडला.....
तिच्या मधुर आवाजात ऐकत असताना त्याच्या समोर सारे शब्द दृश्यात रूपांतरित होत होते . शैला बोलत होती -
" आता तू म्हणशील कि मला हे सारं कसं कळलं वगैरे ....? तर ऐक , मीही एक प्रतिनिधीच आहे . तुझ्या सारखी . आपलं एकच काम आहे ते म्हणजे त्यांचा विनाश . ज्या दृष्ट आणि पाशवी शक्तींबरोबर आपला संघर्ष चालू आहे त्यांच्यासोबत एकटा-दुकटा लढू शकत नाही . आपल्यासारखे अजूनही असतील त्यांचा ही त्या शक्तींविरुद्ध लढा चालू असेल . ज्याला-त्याला , ज्याच्या-त्याच्या कामगिरी वाटून दिल्या आहेत . आतापर्यंत तु तुझी कामगिरी करत होता ; मी माझी कामगिरी करत होते . आता आपल्याला मिळून एक कार्य पूर्ण करायचं आहे . आपल्याबरोबर अजूनही येथील , पण तूर्तास तरी आपल्यालाच पुढची पावले टाकायला हवीत . तेही अगदी जपून .
" पण शैला मला एक सांग तुला माझ्या आणि गणेश च्या संदर्भात सारं कसं कळालं ...?
तो रामचंद्र इंगळे म्हणजेच पोलिस विचारत होता .
" तुम्हाला एखादं काम दिलं तर ते काम कसं करायचं हे सुद्धा सांगितलं जातं . आपल्याला फक्त सांगितलेलं करायचं असतं . एक मात्र खरं आहे आपल्याला ओळखायला यायला हवं की आपल्याला नक्की काय काम सांगितलेलं आहे....?
आणि सांगण्याच्याही बर्याच पद्धती असतात . ज्या त्या व्यक्तीच्या जाणिवा , मानसिक शक्ती , खंबीरता व कुवतीवर त्याला ते संदेश पोहोचवले जातात . मला म्हणाल तर अंतरात जाणीव होते , काही चित्रे व रेखाटने साकारली जातात , त्याबरोबर काही शब्द लिहिले , जातात बऱ्याच वेळा सारं काही माहित असल्या सारखं मला आपोआप उमगंतं की आता आपल्याला काय करायला पाहिजे.....? "
" तेच म्हणतो मी काय करायचं .....?
पुन्हा इंगळे साहेब म्हणाले
गण्याच्या प्रश्नाची थोडीबहुत उत्तरे त्याला मिळाली होती . पण अजूनही त्याच्यापुढे कृतीचा रस्ता अस्पष्टच होता . त्याला मार्गच दिसत नव्हता . अचानक त्याच्या ध्यानात बप्पां व त्यांचा मठ आला .
" आपण बप्पाच्या मठात जाऊया ; बप्पांनी आपल्यासाठी काहीतरी चिट्ठी वगैरे सोडली असेलच . ते स्वत:ही असतील तिथे.
" कोण बप्पा..?
दोघेही एकदमच म्हणाले
" चला गाडी काढा ,.जाता - जाता सांगतो ....
पुन्हा एकदा ते मठाकडे निघाले
गाडी मठापाशी पोहोचली . गण्या उतरून पळतच निघाला . उत्सुकतेपोटी त्याला दोघांचेही भान राहिलं नाही . त्याने दार उघडलं आणि आत पाऊल टाकले . त्याच्या डोळ्यावर विश्वास बसेना तो मठ नव्हताच . अगोदर जे पाहिले ते वेगळेच आणि आता पाहतो तर त्या जागेचे रुपच बदलले होते . सर्वत्र जाळ्या लागल्या होत्या . जणु काही तो बंगला कैक वर्षे बंद होता . सर्वत्र धूळ नि पालापाचोळा साचला होता . कोणीही ती जागा पाहून जराही विचार न करता सांगितलं असतं की ती जागा कैक वर्षे मानवी वापरात नव्हती . मानवी वास्तव्याची पुसटशीही खून त्याठिकाणी दिसत नव्हती . गाण्याला कळालच नाही की तो फक्त एकटाच त्या खोलीत आला होता . ती खोली बाप्पांच्या माठातील नव्हतीच . त्याला अंजलीने येथे आणले होते . फक्त त्यालाच.....
" गणेश .....
कातळ काळोखातील घनगंभीर शांततेला चिरत आलेल्या आवाजाने गण्या दचकला . जेव्हा अंजलीचा आवाज त्याने ओळखला तेव्हा निर्धास्त होऊन त्या आवाजाला त्याने प्रतिसाद दिला
" मला इथे का आणले ...?
" तुला काहीतरी सांगायचं , काही तरी दाखवायचंय.....
" काय...?
ती सांगू लागली -
" तू मला नेहमी विचारतोस ना ... लहानपणा नंतर मी कुठे गेले...? माझ्यासोबत नंतर काय झालं ...? मी ही अशी का झाले ..? आणि माझी मुक्ती कशी होणार...? मला तुला सारे काही सांगायचं . सांगायचं आहे म्हणण्यापेक्षा , दाखवायचं आहे . तुला मी सारं काही दाखवते ; त्यानंतरच तू ठरव तुला व तुझ्या साथीदारांना काय करायला पाहिजे .
तो मध्यभागी एका सिंहासन सारख्या दिसणाऱ्या सोनेरी , मखमली खुर्चीवर बसला . त्याच्या चारी बाजूंना अंधार होता . कुठेतरी एक सोनेरी प्रकाश शलाका चमकली ; व छोटासा विस्फोट झाला . त्यानंतर त्याच्या चारी बाजूला तेच सोनेरी रंगाचे विस्फोट होत गेले . त्यातून विविध रंग बाहेर पडू लागले व पसरू लागले . जणू काही कोणतातरी चित्रकार त्याच्या कुंचल्याच्या फटक्याने त्रिमितीय चित्र काढत होता....
किती रमणीय देखावा होता . ते मोठे वडाचे झाड होते . त्याच्या पारंब्या जमिनीपर्यंत पसरल्या होत्या . त्या वडाच्या झाडाला कितीतरी पक्षांनी आपलं घर बनवलं होतं . त्यांच्या त्या किलबिल आवाजाला दोन मुलांच्या खेळण्या चा आवाज साथ देत होता . त्यात एक मुलगा व एक मुलगी होती . त्यांचा शिवाशिवीचा खेळ चालू होता . मुलगा पुढे पळत होता व मुलगी मागे . मुलगा भरभर पारंब्यावरून चढत जात होता . तोच गणेश , त्याने स्वतःला ओळखलं . त्याच्यामागे तीच होती , अंजली . तीपण पारंब्या वर चढत होती . तो वरपर्यंत पोहोचला . तिला सापडू नये म्हणून तो जोरात पळू लागला . पण त्याचा पाय घसरला . तो पडणारच होता , पण किती चपळतेने उडी मारून त्याचा हात धरून तिने त्याला वर घेतले .....
पुन्हा एकदा डोळे दिपवणारा प्रकाश चकाकला . त्याची तीव्रता इतकी होती , की काही सेकंद त्याने डोळे उघडले नाहीत . त्याच्या झाकलेल्या डोळ्यापुढे काळ्या , निळ्या जांभळ्या , लाल नि गुलाबी ज्वाला झळकत होत्या . त्याने डोळे उघडले तेव्हा त्याच्यापुढे एक खोली होती . त्याला आठवलं की ती अंजलीच्या घरातील खोली होती . एक दारुडा रंग झडून गेलेल्या सतरंजीवर आणि पापुद्रे निघालेल्या भिंतीला टेकून ; त्याच्या घाणेरड्या हाताला न शोभणाऱ्या चकाकणाऱ्या काचेच्या ग्लासात उंची दारू पीत होता . त्याच्यापुढे रंग उडालेल्या खुर्चीत एक माणूस सिगारेट फुकत बसला होता . त्या खोलीत डोकावून दुसरे एका माणसाने सांगितले ....' चल बे काम झाले ' . दूर कुठेतरी लहान मुलीच्या रडण्याचा आवाज येत होता . त्याला कळालं अंजलीच्या दारुड्या बापाने काही पैशासाठी स्वतःच्या मुलीला म्हणजे अंजली विकलं होतं .....!
पुन्हा एकदा समोरचा देखावा पालटला . आता ते एखाद्या संस्थेच्या कार्यालयात होते . एका खुर्चीवर पन्नाशी ओलांडलेला म्हातारा बसला होता . त्याच्या पुढे दोन इसम होते . तेच ते दोघे ज्यांनी अंजलीला विकत घेतलं होतं .
" थोड्या दिवस राहू दे तुझ्या अनाथाश्रमात , कळीचं फूल होईपर्यंत ....
" आता रेट वाढवलेला आहे आपण , जास्त पैसे द्यावे लागतील ....
तो पन्नाशी उलटलेल्या माणूस बोलला
" ठीक आहे...... कळतात सारे तुझे पण नखरे ......असू दे तरीपण .....
पुन्हा एकदा देखावा बदलला जिथे तो बसला होता त्या खोलीत आला......
" मी इतकी ही लहान नव्हते की काय चाललंय ते कळू नये.... मला सारं कळत होतं . पण मी काय करू शकत होते..? कुठे जाऊ शकत होते ..? माझा एकुलता एक आधार तो माझा बाप . त्यांनेच मला विकलं , मी त्यावेळी खरच अबला होते . मला कोणाचाच आधार नव्हता . बाहेरच्या जगात जगण्यासाठी ना माझ्याकडे कोणती कला होती , ना काम होतं , ना मला काही करता येत होतं ..... बाहेरच्या जगात माझ्या शरीरांवरती बोचणाऱ्या नजरा मला पदोपदी जाणवत होत्या . त्यामुळे तिथून पळून जायचं मी मुळीच प्रयत्न केला नाही . उलट तिथेच जमवून घेतलं अनाथाश्रमाच्या शाळेत शिकू लागले . चांगले गुण मिळवू लागले . मी मॅट्रिकला पहिला नंबर काढला . अनाथाश्रम चालवत होते त्यांच्या नजरेत मी आले . त्यांनी मला तिथून काढून दुसऱ्या वस्तीगृहात टाकले . मी त्या दलदलीतून इतक्या सहज सुटले कि मला आकाशही ठेंगणे वाटू लागले . मला घेऊन जाताना त्या म्हातारऱ्याने विरोध करायचा प्रयत्न केला . पण शेवटी त्याला झुकावं लागलं . नंतर मला कळाले की त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली ; पण मला माहित होतं ज्या दोघांनी मला विकत घेतलं होतं त्या दोघांच्या हातून मी नसल्यामुळे त्या म्हाताऱ्याचा त्यांनीच खून केला होता ....
कॉलेज झालं . तिथेही मी चमकलेच . नंतर ग्रॅज्युएशनसाठी माझा नंबर एमबीबीएसला मेरीट मध्ये बसला . तिथेच असताना माझ्या आयुष्यात तो आला . माझ्या निराधार मनाला त्याने आधार दिला . तो माझा , माझ्या आयुष्याचा साथीदार बनला . आमच्या लपून-छपून गाठीभेटी होऊ लागल्या ....
आणि आवाज थांबला . पुन्हा एकदा आजूबाजूचा देखावा पालटला
ती एक बेडरूम होती . मधुचंद्रासाठी सजवतात तशी सजवली होती . तीच ती रूपवती अंजली बसली होती . गाण्याच्या काळजात नकळत एक घाव पडलाच पण पुढची दृश्य पाहून त्याचं ह्रदयच पिळवटून निघाले . त्या खोलीत तिचा तथाकथित साथीदार आलाच नाही . आलं होतं ते दुसरीच कुणीतरी , कोणीतरी म्हणण्यापेक्षा काहीतरी ....
काळा आकार, पोत्यामध्ये माती भरावी तसा , अवाढव्य अस्ता- व्यस्त ,संपूर्ण शरीरावर ती लांब लांब काळे केस ते मानवी शरीर नव्हतंच .... काही दृश्य त्याच्या अंतर्मनावर उमटताच त्याने डोळे मिटून घेतले . नंतर खोली तिच्या किंचाळण्याने , भयानक दुर्गंधीने , रक्ताचे शिंतोडे आणि ग्लब-ग्लब करून काहीतरी खाण्याच्या आवाजाने भरून गेली.....
मी ज्याच्यावर ती सर्वस्व अर्पण केलं होतं ; त्यानं मला एका बळीसाठी अर्पण केलं . तो एका नीच , अधम पंथाचा उपासक होता . त्याने बळीसाठी ठराविक अटींमुळे माझी निवड केली होती . हेतुपूर्वक माझ्याभोवती जाळे गुंफले होते . त्या पिशाच्याच्याने माझा उपभोग घेऊन मलाच भक्ष्य बनवलं . माझा मृत्यू झाला खरा पण मी मुक्त झालेच नाही . मला कळालं नाही की मी भूत बनून का वावरत होते ....? मला राग आला . भयानक राग आला . माझा बळी दिला होता आणि ज्याने घेतला होता त्यांचा.... मी रागाने दोघांवरही चाल करून जाणार होते . माझं काहीही हो, मला त्यांना सोडायचं नव्हंतं . पण मला तेव्हाच इतकी तीव्र अंतर-प्रेरणा झाली की ~' योग वेळेसाठी थांब . प्रत्येकाला त्याने केलेल्या कर्माचे फळ मिळतं . कुणीही कितीही वाईट असू दे , पापाचा घडा भरला की तो संपतोच . म्हणून तू प्रतीक्षा कर. योग्य वेळेची वाट पहा .' मग वेळोवेळी अशा गोष्टी जाणवतच गेल्या . अशा गोष्टी मुळेच मी तुला वाचवायला त्या टेकडीवर पोहोचलो जिथे तू स्वतःहून बळी जायला निघाला होता . नंतर मी वेळोवेळी तुझ्या स्वप्नात आले , घडणाऱ्या गोष्टी सांगितल्या , या सर्व गोष्टी त्यांनी घडवून आणल्या आहेत . या सर्व गोष्टी मागे त्यांचा हात आहे . त्याच शक्ती , ज्या दुष्ट अमानवी पाशवी अमंगलमय शक्ती विरुद्ध लढत आहेत.
आत्ताच ती वेळ आली आहे . त्यांच्या नाशाचा काळ जवळ आला आहे . त्यांचे विनाशक आपणच आहोत . आपल्यामागे त्या शक्तींचा बळ आहे . फक्त तु तुझ्या साथीदारांना घेऊन योग्य जागी पोहोचायचयं....
" कोणती जागा ....?
" तीच ती , मी पहिल्यांदा तुला घेऊन गेले होते ती ...
" _ _ व फार्महाउस .... ?
" हो तेच तेच ते फार्महाउस आहे जिथे माझा व माझ्यासारख्या कित्येकांच्या बळी दिला गेला आहे.....!
तो शुद्धीवर आला तो बप्पांच्या मठाच्या हॉलमध्येच होता .
" म्हणजे मला हे सारं सांगण्यासाठी अंजलीने केलं होतं ....
" काय बोलतोय गणेश ...? काय केलं होतं ...? कोण अंजली....? "
आपल्या मधुर आवाजात शैला विचारत होती . गण्याने तिला जत्रेपासूनची कहाणी व आता कळलेला सारा वृत्तांत सांगितला .
" मग आपल्याला लवकरात लवकर त्या फार्महाउस ला पोहोचलं पाहिजे...
रामचंद्र इंगळे साहेब म्हणत होते .
" हो जायलाच पाहिजे ....." शैला ही म्हणाली
" थांबा जरा ... बप्पांनी माझ्या नावाची डायरी लिहिली होती. त्यामध्ये आपल्याला काहीतरी सापडेल.....
तीच ती डायरी जेव्हा गण्या पहिल्यांदा आला होता आणि इकडे तिकडे शोधाशोध करताना त्याचं नाव लिहिलेलं ती डायरी त्याला सापडली होती . त्या डायरीत त्याच्याबरोबर घडलेल्या घटना लिहिल्या होत्या . त्यांनी शोधाशोध केली पण डायरी काही सापडली नाही .
शेवटी गण्या , शैला व तो पोलीस रामचंद्र इंगळे तिघेही फार्महाऊसकडे निघाले . तेथेच साऱ्या गोष्टींचा उलगडा होणार होता
No comments:
Post a Comment